AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरोगी जीवनशैलीसाठी आहारात करा हे बदल, आजार राहतील चार हात दूर

निरोगी राहण्यासाठी उत्तम आहार घेणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपण निरोगी आणि खाण्या योग्य समजतो ते दररोज खाल्ल्यास काही आजार होण्याची शक्यता असते. अनेकदा आपण पॅकिंग फूड आणि फास्टफूडचा आहारात समावेश करतो पण ते आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे आहारात काही बदल करणे आवश्यक आहेत. तज्ञांकडून जाणून घेऊया आहारात कोणते बदल करणे आवश्यक आहेत.

निरोगी जीवनशैलीसाठी आहारात करा हे बदल, आजार राहतील चार हात दूर
healthy lifestyleImage Credit source: tv9 marathi
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Dec 31, 2024 | 9:42 PM
Share

आपल्या आरोग्याचा थेट संबंध आपल्या आहाराशी येत असतो. आजकाल आपला खाण्याच्या सवयी अशा झाल्या आहेत की त्या रोगांचे कारण बनतात. अनेकवेळा आपण विचार न करता अनेक गोष्टी खातो त्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचते.हिवाळ्यात आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते असे आरोग्य तज्ञ सांगतात. श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट दिल्ली येथील डॉक्टर अरविंद अग्रवाल म्हणतात की आजच्या अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आपले शरीर हे हळूहळू रोगांचे घर बनत आहे. आहारामध्ये अनेकदा जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता असते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याची आवश्यकता आहे. आहारातील कोणते खाद्यपदार्थ बदलले पाहिजे याबद्दल जाणून घेऊया तज्ञांकडून.

काय सांगतात तज्ज्ञ?

तज्ञांच्या मते मैदा, ब्रेड, बर्गर आणि पिझ्झा यासारख्या गोष्टी तुमच्या शरीराला हानी पोहोचवत असतात. या गोष्टींपेक्षा संपूर्ण धान्यांपासून बनवलेल्या गोष्टी जसे की मल्टीग्रेन ब्रेड आणि घरी बनवलेली पोळी किंवा पराठे खाणे आणि फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे साखरेचे जास्त सेवन केल्याने मधुमेह आणि लठ्ठपणा देखील येवू शकतो.

साखर खाण्याऐवजी तुम्ही गुळ किंवा मधाचे सेवन करू शकतात. तसेच पॅकिंगच्या ज्यूस ऐवजी तुम्ही फळांचा रस किंवा नारळ पाणी, लिंबू पाणी पिऊ शकतात. समोसा फास्ट फूड खाण्याऐवजी हरभरे, मखाना किंवा ड्रायफ्रूट्स खाणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

या गोष्टींची ही घ्या काळजी

नूडल्स आणि केक सारखे प्रक्रिया केलेले तसेच पॅकबंद असलेले पदार्थ खाणे टाळा. या पदार्थांमध्ये प्रिज़र्वेटिव आणि जास्त मीठ असते ते शरीराला हानी पोहचवू शकतात. तसेच पांढरा तांदूळ वापरण्याऐवजी ब्राऊन राईस किंवा क्विनोआचे सेवन करा.

साध्या मिठाऐवजी सेंदी मीठ वापरा. बाजारातील मिठाई खण्याऐवजी आरोग्यदायी घरगुती पदार्थ जसे की रव्याची खीर किंवा गुळाची मिठाई खा. रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे आणि कडधान्यांचा समावेश करा. या छोट्या छोट्या गोष्टीत बदल केल्याने आरोग्याला याचा फायदा होईल.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार