AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Care | पावसाळी हंगामात रोगप्रतिकारक शक्ती आणि पाचनतंत्र बळकट ठेवायचेय? मग, ‘हे’ 7 उपाय लक्षात ठेवा!

या हंगामात, अनेकदा पाचन प्रणाली विचलित होते, तसेच रोग प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. अशा परिस्थितीत, गॅस, अपचन, पोटदुखी, डोकेदुखीसारख्या समस्यांबरोबरच, इतर आजारांना बळी पडण्याचा धोकाही लक्षणीय वाढतो.

Monsoon Care | पावसाळी हंगामात रोगप्रतिकारक शक्ती आणि पाचनतंत्र बळकट ठेवायचेय? मग, ‘हे’ 7 उपाय लक्षात ठेवा!
पाचन प्रणाली
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 7:06 AM
Share

मुंबई : पावसाळ्याचा हंगाम हा आनंददायी वाटतो, परंतु तो आपल्याबरोबर बर्‍याच समस्या देखील आणतो. या हंगामात, अनेकदा पाचन प्रणाली विचलित होते, तसेच रोग प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. अशा परिस्थितीत, गॅस, अपचन, पोटदुखी, डोकेदुखीसारख्या समस्यांबरोबरच, इतर आजारांना बळी पडण्याचा धोकाही लक्षणीय वाढतो. आपल्या पाचन तंत्राच्या दुरुस्तीसाठी, तसेच आपल्या रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी प्रभावी ठरेल, असे काही उपाय येथे जाणून घ्या (Monsoon Care use these tips to keep immune and digestion system healthy).

प्रभावी उपाय :

  1. तांबेच्या भांड्यात पाणी पिण्यामुळे चमत्कारिक परिणाम होतात. पोटाच्या सर्व समस्यांसाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे फायदेशीर आहे. हे बर्‍याच संशोधनातही सिद्ध झाले आहे. म्हणून आतापासून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची सवय लावून घ्या. परंतु, तांब्याची भांडी लाकडावर किंवा टेबलावर ठेवा.
  2. फायबर समृद्ध आहार पाचन तंत्राला बळकट करण्याचे काम करते. म्हणून, तंतुमय फळं, संपूर्ण धान्य, भाज्या, शेंगदाण्यांसारख्या फायबर समृद्ध घटकांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा.
  3. आजकाल उशिरा खाणे लोकांच्या सवयीचा एक भाग बनला आहे. उशिरा खाल्ल्यानंतर, लोक थेट झोपायला जातात. अशा परिस्थितीत अन्न पचनासाठी वेळ मिळत नाही आणि पाचन तंत्राला त्रास होतो. पावसाळ्यात पाचन तंत्र अधिक संवेदनशील असल्याने सामान्य दिवसांपेक्षा, या दिवसांत अधिक त्रास होण्याची शक्यताही जास्त असते. म्हणून, दररोज वेळेवर खाण्याची सवय लावा. तसेच, प्रत्येक अन्न चावून खा.
  4. अन्न खाल्यानंतर किमान अर्ध्या तासाने कोमट पाणी प्यावे, यामुळे पाचक प्रणालीला अन्न पचवण्यास मदत होते. यामुळे पाचन शक्ती मजबूत होते. दररोज सकाळी रिक्त पोटी आणि दोन्ही वेळा जेवल्यानंतर अर्धा तासाने कोमट पाणी प्या.
  5. जर पाचक प्रणाली निरोगी ठेवायची असेल, तर प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस उपवास केला पाहिजे. उपवासाच्या दिवशी फळं आणि रस इत्यादि सेवन करा. लांघनामुळे पाचक प्रणालीला विश्रांती मिळते आणि शरीराला स्वतःला रीसेट करण्यासाठी वेळ मिळतो.
  6. थंड गोष्टी पाचनशक्ती कमी करतात, म्हणून पावसाळ्यात थंड गोष्टी घेणे टाळा. जर तुम्हाला थंड पाणी प्यायचे असेल, तर मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणीच प्या.
  7. दररोज सकाळी आणि संध्याकाळी चाला. सकाळी योग आणि प्राणायाम केल्यास पाचन तंत्र मजबूत होते. पाचन तंत्रासाठी त्रिकोणासन, पश्चीमोत्तानासन आणि पवनमुक्तासन अत्यंत फायदेशीर आहेत. सकाळी चालत असताना, वेगवान चालण्याचा प्रयत्न करा आणि संध्याकाळी सामान्य वेगाने चाला. जेवण झाल्यानंतरही शतपावली घाला.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Monsoon Care use these tips to keep immune and digestion system healthy)

हेही वाचा :

COVID-19 : ही असू शकतात मुलांमध्ये कोरोना व्हायरसची सुरुवातीची लक्षणे, जाणून घ्या याबाबत अधिक माहिती

Skin Care : तुमची त्वचा सेन्सिटिव्ह आहे? मग, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.