AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

C Voters Survey : महाराष्ट्रासमोरील सर्वात धगधगता प्रश्न कोणता? राज्याच्या जनतेकडून एका वर्षात सरकारला किती गुण? वाचा सर्व्हे

Maharashtra Government 1 Year Complete Survey : सी व्होटर्सने राज्य सरकारच्या एका वर्षाच्या कामगिरीवर एक सर्व्हे केला आहे. यात विविध मुद्द्यांवर जनतेला प्रश्न विचारण्यात आले होते. यातून राज्यासमोरील महत्त्वाची आव्हाने कोणती हे समोर आले आहे.

C Voters Survey : महाराष्ट्रासमोरील सर्वात धगधगता प्रश्न कोणता? राज्याच्या जनतेकडून एका वर्षात सरकारला किती गुण? वाचा सर्व्हे
C voters Survey on Maharashtra GovernmentImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 05, 2025 | 9:45 PM
Share

Mood Of Maharashtra : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबरला मुंख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. गेल्या वर्षभरात राज्य सरकारने राज्यातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच राज्य सरकारला महापुरासारख्या आपत्तीचाही सामना करावा लागला आहे. अशातच आता सी व्होटर्सने फडणवीस सरकारच्या एका वर्षाचा लेखाजोखा मांडणारा एक सर्व्हे केला आहे. यात अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले असून जनतेच्या मनात काय आहे हे समोर आले आहे. राज्यासमोरील सर्वात मोठा प्रश्न कोणता? सर्वात आवडता नेता कोणता? अशा विविध प्रश्नांवर जनतेना आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता?

महाराष्ट्रासमोरील सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता यावर राज्यातील जनतेने आपले मत व्यक्त केले आहे. यानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बेरोजगारी हे दोन सर्वात मोठे प्रश्न सरकारसमोर आहेत. 31.9 टक्के लोकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. 30.2 टक्के लोकांनी बेराजगारी हा सर्वात मोठा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर 10.5 टक्के लोकांनी वीज पाणी रस्ते हे मुद्दे महत्त्वाचे आहेत असं म्हटलं आहे. तर 1.9 टक्के लोकांनी हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती हा मोठा मुद्दा असल्याचे म्हटले आहे.

कायदा आणि सुव्यवस्था तसेच महिलांची सुरक्षा हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असल्याचे 6.8 टक्के लोकांनी म्हटले आहे. 7.7 टक्के लोकांनी भ्रष्टाचार हा सर्वात मोठा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. 2.2 टक्के लोकांना CAA/NRC/NCPR हे मुद्दे महत्त्वाचे वाटत आहेत. त्याचबरोबर 4.8 टक्के लोकांना महागाई हा महत्त्वाचा मुद्दा वाटत आहे. 2.8 टक्के लोकांना राज्याचा सर्वांगिण विकास आणि 2.4 टक्के लोकांना इतर मुद्दे महत्त्वाचे वाटत आहेत.

राज्य सरकारला विकास कामांसाठी किती गुण?

सी व्होटर्सने आपल्या सर्व्हेमध्ये नागरिकांना तुमच्या भागातील विकास कामांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर लोकांनी सरकारच्या कामाचे वेगवेगळे वर्गीकरण केले आहे. 31.7 टक्के लोकांनी सरकारने चांगली विकास कामे केली असल्याचे म्हटले आहे. 28.7 टक्के लोकांनी विकासाबाबत सरकारची कामगिरी सरासरा असल्याचे म्हटले आहे. 28.5 टक्के लोकांनी सरकारची कामगिरी वाईट असल्याचे म्हटले आहे. तर 11 टक्के लोकांनी माहिती नाही असं म्हटलं आहे.

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.