AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाडांमध्ये दुखणे Blood cancer तर नाही? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको…

Blood cancer symptom : कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास रुग्णाला सहज वाचवता येऊ शकते. कॅन्सरच्या लक्षणांबाबत लोकांकडून दुर्लक्ष केले जात असते. मुळात त्यांना लक्षणांबाबत कमी माहिती असते. यामुळेच बहुतांश रुग्ण कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतात.

हाडांमध्ये दुखणे Blood cancer तर नाही? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको...
काही ड्रिंक्समुळे होऊ शकतो कॅन्सरImage Credit source: twitter
| Updated on: Feb 18, 2022 | 1:20 PM
Share

Blood cancer symptom : दरवर्षी देशभरात लाखो लोकांचा कॅन्सर या रोगाने मृत्यू होतो. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्लड कॅन्सर. या कॅन्सरमुळे देखील मृत्यूची संख्या बरीच आहे. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे रक्ताचा कर्करोग (Blood cancer) होतो. त्याला ‘ल्युकेमियाला ब्लड कॅन्सर’ असेही म्हणतात. या आजारात शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वेगाने वाढू लागतात. वेळेवर उपचार न केल्यास हा आजार जीवघेणा ठरतो. ब्लड कॅन्सरचा आजार जनुकीय म्हणजे जेनेटीक (Genetic) नसल्याचे डॉक्टर सांगतात. बदलती जीवनशैली, योग्य व सकस आहार न घेणे, प्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळेही कॅन्सरची शक्यता वाढत असते. ब्लड कॅन्सरचा रुग्ण ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’द्वारे (Bone Marrow) बरा होऊ शकतो, फक्त त्याची लक्षणे दिसताच त्वरित तज्ज्ञांकडे जाउन उपचार सुरू करायला हवा.

रुग्णाच्या स्टेजनुसार त्यावर उपचार

कॅन्सर तज्ज्ञ डॉ. विनीत कुमार सांगतात, जेव्हा पांढऱ्या रक्त पेशी वाढतात तेव्हा आपला डीएनए बिघडतो. यामुळे रक्ताचा कर्करोग होतो. या कर्करोगाच्या पेशी बोन मॅरोमध्ये वाढतात. त्यामध्ये राहून निरोगी रक्त पेशींची वाढ आणि त्यांच्या कार्यात बाधा निर्माण करण्याचे काम करतात. म्हणूनच ब्लड कॅन्सरला बोन मॅरो कॅन्सर असेही म्हणतात. हे सायटोमेट्री तंत्राद्वारे ओळखले जाते. चाचणीत कॅन्सरची पुष्टी झाल्यानंतर रुग्णाच्या स्टेजनुसार त्यावर उपचार केले जातात.

तोपर्यंत निघून गेलेला असतो बराच वेळ

सुरुवातीच्या टप्प्यात केमोथेरपी आणि रेडिओथेरपी असते. गंभीर प्रकरणांमध्ये, बोन मॅरो बदलले जातात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्णाला सहज वाचवता येऊ शकते, परंतु लोकांना कर्करोगाच्या लक्षणांबद्दल फारशी माहिती नसते. यामुळेच बहुतांश रुग्ण शेवटच्या टप्प्यात पोचल्यावर त्यांना आजाराची माहिती होत असते, परंतु तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो.

‘ही’ लक्षणे आहेत

वारंवार ताप येणे, शरीराच्या कोणत्याही भागात गाठ होणे, अचानक वजन कमी होणे, अशक्तपणा, रात्री अचानक घाम येणे, सांधे व हाडे दुखणे, सूज येणे अशा समस्या दिसू शकतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, यातील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा :

बदलत्या ऋतूत पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर या पदार्थांचे नक्की सेवन करा!

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नेमकी कोणती डाळ खायची? उत्तर इथे मिळेल!

मासिक पाळीच्या काळात दही खाताय?, जाणून घ्या फायद्याचे आहे की नुकसानदायक!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.