AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Patanjali’s Ashmarihar Kwath: मुतखड्याच्या त्रासामुळे हैराण झालात? पतंजलीचे है औषध ठरेल फायदेशीर

पाण्याचे कमी सेवन, जंक फूड आणि शरीरात युरिक अॅसिड किंवा खनिजांचे वाढतं असंतुलन यामुळे किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास वाढला आहे. पतंजलीने यावर उपाय सुचवला आहे.

Patanjali’s Ashmarihar Kwath: मुतखड्याच्या त्रासामुळे हैराण झालात? पतंजलीचे है औषध ठरेल फायदेशीर
patanjali
| Updated on: Aug 22, 2025 | 7:36 PM
Share

आधुनिक काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहे. पाण्याचे कमी सेवन, जंक फूड आणि शरीरात युरिक अॅसिड किंवा खनिजांचे वाढतं असंतुलन यामुळे किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास वाढला आहे. खराब खाद्यपदार्थांमुळे कॅल्शियम, ऑक्सलेट किंवा युरिक अॅसिड क्रिस्टल्स किडनी किंवा मूत्राशयात गोळा होतात आणि त्याचे खडे तयार होतात. हे खडे लहान असतील तर ते लघवीसोबत बाहेर येतात, मात्र मोठ्या खड्यांमुळे तीव्र वेदना होतात, लघवी थांबते आणि संसर्ग होतो. यावर पतंजलीचे अश्मरीहर क्वाथ हे रामबाण उपाय आहे.

मूत्रमार्गातील खड्यांमुळे केवळ वेदना होतात असे नाही तर यामुळे शरीराच्या कार्यावरही परिणाम होता. मोठ्या खड्यांमुळे लघवीचा प्रवाह थांबतो, ज्यामुळे किडनीवर दबाव वाढतो आणि ती खराब होऊ लागते. तसेच वारंवार लघवी थांबल्याने संसर्गाचा धोका वाढतो. जर ही समस्या जास्त काळ राहिली तर किडनीचे नुकसान होते किंवा मूत्राशयाच्या स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. यामुळे तीव्र वेदना, उलट्या, मळमळ आणि अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे वेळेवर योग्य उपचार घेणे खूप महत्वाचे आहे.

अश्मरीहर क्वाथ मुतखड्यावर प्रभावी

पतंजलीचे अश्मरीहर क्वाथ हे एक आयुर्वेदिक औषध आहे, जे विशेषतः मूत्रपिंडातील खडे, मूत्राशयातील खडे आणि मूत्राशी संबंधित समस्यांसाठी तयार करण्यात आलेले आहे. यात गोक्षुरा, पाषाणभेद, वरुण आणि पुनर्नवा अशा अनेक प्रभावी औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या सर्व गोष्टींमध्ये लघवी वाढवणारे, जळजळ कमी करणारे आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणारे गुणधर्म आढळतात.

यातील गोक्षुरा मूत्र शुद्ध करते, लघवीचा प्रवाह वाढवते आणि खडे काढून टाकण्यास मदत करते. पाषाणभेद ही वनस्पती हळूहळू खडे वितळण्यास आणि काढून टाकण्यास मदत करते. वरुण वनस्पतीची साल मूत्रमार्गाची जळजळ कमी करते आणि संसर्ग रोखते. तसेच पुनर्नवा वनस्पती शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. ते औषध प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज उपलब्ध आहे, जे मुतखड्यावर प्रभावी मानले जाते.

या गोष्टींची काळजी घ्या

  • मूत्र स्वच्छ राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या.
  • जास्त खारट आणि तेलकट अन्न टाळा.
  • जंक फूड आणि कोल्ड्रिंक्स टाळा
  • डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच अश्मरीहर क्वाथ नियमितपणे घ्या.
  • जर वेदना तीव्र असतील किंवा लघवी पूर्णपणे थांबली असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

टीप: हे औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा घेणे आवश्यक आहे. स्वतःहून औषध घेऊ नका.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.