AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी

सिडनीतील वनडेदरम्यान क्रिकेटर श्रेयस अय्यरला झालेल्या दुखापतीमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या दुखापतीतून बरा झाल्यानंतर तो मैदानावर परतू शकेल का, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.

श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी
श्रेयस अय्यरImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2025 | 3:42 PM
Share

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कॅच पकडताना क्रिकेटर श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यानंतर त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. ड्रेसिंग रुममध्ये जाताच श्रेयस बेशुद्ध पडला आणि त्याची स्थिती चिंताजनक होती. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आणि स्कॅनमध्ये त्याच्या ‘प्लीहा’ला जखम झाल्याचं समोर आलं.

प्लीहा म्हणजे काय आणि शरीरात त्याचं काम काय?

प्लीहा हा एक मूठीच्या आकाराचा मऊ अवयव आहे, जो बरगड्यांच्या डाव्या बाजूला खाली असतो. प्लीहाची दोन प्रमुख कार्ये आहेत. पहिलं म्हणजे ते संसर्गाशी लढण्यास मदत करतं आणि दुसरं, ते जुन्या किंवा खराब झालेल्या लाल रक्तपेशी काढून रक्त स्वच्छ करं. रक्तवाहिन्यांनी वेढलेलं हे शरीरातील सर्वांत नाजूक अवयवांपैकी एक आहे. प्लीहा रक्त फिल्टर करण्याचं काम करतं. ते रक्तातून बॅक्टेरिया, विषाणू आणि खराब झालेल्या रक्तवाहिन्या काढून टाकतं. जेव्हा रक्त प्लीहामधून शुद्ध होऊन शरीरात वाहू लागतं, तेव्हा पांढऱ्या रक्तपेशी कोणत्याही संसर्गाशी लढण्यास समर्थ होतात. लाल रक्तपेशींचं आयुष्य अंदाजे 120 दिवस असतं, त्यानंतर प्लीहा त्यांना नष्ट करते.

डाव्या बाजूला जोरात पडल्याने किंवा बरगडीला गंभीर दुखापत झाल्याने प्लीहाला इजा पोहोचू शकते आणि शरीरात रक्तस्राव होऊ शकतं. डॉक्टर यालाच splenic laceration असं म्हणतात.

प्लीहाची दुखापत किती गंभीर असते?

मेडिकल प्रोफेशनशी संबंधित UpToDate या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका मेडिकल पेपरमध्ये म्हटलंय की, प्लीहाच्या दुखापती या सामान्य ते जीवघेण्याही असू शकतात. जखम किती खोल आहे, त्यातून रक्तस्राव किती झाला, यावरून दुखापतीचा अंदाज लावला जाऊ शकतो. हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर सिटी स्कॅनचा वापर करतात.

किरकोळ दुखापत असेल तर ते औषधांनी बरं होऊ शकतं. परंतु गंभीर दुखापत किंवा अंतर्गत रक्तस्राव झाल्यास त्वरित शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते. रक्तस्राव सुरूच राहिला किंवा वाढला तर डॉक्टरांना एम्बोलायझेशन नावाच्या प्रक्रियेद्वारे ते थांबवावं लागू शकतं. काही प्रसंगी प्लीहा काढून टाकण्यासाठीही शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.

उपचारानंतर पहिले 24 आणि 48 तास हे सर्वांत महत्त्वाचे असतात. सर्वकाही सुरळीत असेल तर डॉक्टर रुग्णाला हळूहळू हालचाल करण्यास, खाण्या-पिण्यास परवानगी देतात. प्लीहाची स्थिती जाणून घेण्यासाठी दररोज स्कॅन केले जातात. रक्तस्राव थांबल्यानंतर रुग्णाला जवळपास एक आठवडा निरीक्षणासाठी रुग्णालयात ठेवलं जातं. त्यानंतर त्याला डिस्चार्ज दिला जातो. परंतु काही महिने त्याला खूप हळू चालावं लागतं.

बरं होण्यासाठी किती वेळ लागतो?

प्लीहाची दुखापत बरी होण्यासाठी किमान सहा ते बारा आठवडे लागतात. म्हणजेच श्रेयस अय्यर जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर राहील. श्रेयसला त्वरित वैद्यकीय मदत मिळाल्याने त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतंय.

श्रेयस भविष्यात क्रिकेट खेळू शकेल का?

प्लीहाची दुखापत असलेले बहुतेक लोक कोणत्याही दीर्घकालीन समस्यांशिवाय पूर्णपणे बरे होऊ शकतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यातही श्रेयस खेळाडू आणि तंदुरुस्त असल्याने त्याच्याबाबत डॉक्टर बरेच सकारात्मक आहेत. श्रेयसला डिस्चार्ज कधी मिळेल, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु डिस्चार्जनंतरही त्याला विश्रांती आणि देखरेखीची आवश्यकता असेल.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......