AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग आत्ताच करा हे घरगुती उपाय

तोंड आल्यावर प्रचंड वेदना होतात. त्यामुळे जेवण करताना आणि बोलताना देखील त्रास होतो. यासाठी बाजारात अनेक प्रकारचे औषध उपलब्ध आहे. पण अनेक वेळा त्याचा काहीही उपयोग होत. नाही परंतु तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग आत्ताच करा हे घरगुती उपाय
tongue blistersImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 13, 2025 | 9:10 AM
Share

तोंड येणे ही एक सामान्य समस्या आहे जी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकते. या समस्येमुळे खाण्यापिण्यात अडचण निर्माण होते आणि कधी कधी इतकी वेदना होते की बोलणे ही कठीण होते. ही समस्या गंभीर नसली तरी योग्यवेळी उपचार न केल्याने ही समस्या वाढू शकते. व्हिटॅमिनची कमी, मसालेदार अन्न, पोटाच्या समस्या किंवा खूप गरम अन्न खाल्ल्याने तोंड येण्याची समस्या निर्माण होते. औषधांशिवाय घरगुती उपाय केल्याने देखील ही समस्या दूर करता येते.

नैसर्गिक आणि सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करून तोंड येण्यावर उपाय करता येतात. ज्यामुळे केवल हे बरे होत नाही तर वेदना आणि जळजळ कमी होते. जाणून घेवू असे पाच प्रभावी उपाय जे केल्याने तोंड येण्याची समस्या कायमची दूर होईल.

मध आणि हळद

मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो. ज्यामुळे आलेले तोंड लवकर बरे होण्यास मदत होते. हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात ज्यामुळे वेदना, सूज कमी होते. अर्धा चमचा हळदीमध्ये एक चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण जिथे तोंड आले असेल तिथे लावा आणि दहा मिनिटांनी तोंड धुवा. हे दिवसातून दोन ते तीन वेळा करा.

खोबरेल तेल

खोबऱ्याच्या तेलामध्ये दहाक विरोधी आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असतात जे तोंड आल्यावर आराम मिळवून देतात. कापसाच्या मदतीने तोंड आलेल्या ठिकाणी थोडेसे खोबरेल तेल लावा हे दिवसातून दोन ते वेळा अवश्य लावा.

लवंगाचे तेल

लवंग तेल नैसर्गिक भूल देण्याचे काम करते आणि तोंड आल्यास त्यावर लगेच आराम मिळवून देते. लवंगाचे थोडे तेल कापसावर लावून जिथे तोंड आले आहे त्या भागावर लावा. पाच ते दहा मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर स्वच्छ तोंड धुवा. हे दिवसातून एक वेळ लावा.

कोरफडीचा गर

कोरफड मध्ये थंड करण्याचे गुणधर्म आहेत. जे तोंड आल्यावर होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी करतात. कोरफडीच्या ताज्या पानांपासून त्याचा गर काढा. हा गर तोंड आलेल्या भागावर दिवसातून दोन ते तीन वेळा लावा.

थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे

थंड पाणी आणि बर्फामुळे वेदना आणि सूज लगेच कमी होते. बर्फाचा तुकडा घ्या आणि तोंड आलेल्या भागावर हलक्या हाताने फिरवा. थंड पाणी पिल्याने देखील आराम मिळतो. हे दिवसातून तुम्ही कितीही वेळा करू शकता.

Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....