AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरताय का? स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा

तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरताय का? असं असेल तर स्मृतिभ्रंश होऊ शकतो. स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला आज काही उपाय सांगणार आहोत. म्हातारपणी स्मरणशक्ती कमी होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु तरुण आणि मध्यम वयात जर तुम्हाला विसर पडत असेल तर त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. याविषयी तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया.

तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी विसरताय का? स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा
| Edited By: Mayuri Sajerao | Updated on: Jan 11, 2025 | 8:05 PM
Share

तरुण वयात अनेकांना लक्षात राहत नाही, काही लोक गोष्टी विसरूही लागतात. तुम्हाला माहिती आहे का की हा प्रकार स्मृतिभ्रंशचा असू शकतो. म्हातारपणी स्मरणशक्ती कमी होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु तरुण आणि मध्यम वयात जर तुम्हाला विसर पडत असेल तर त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे. याविषयी विस्ताराने जाणून घेऊया.

अनेकदा लोकांना छोट्या छोट्या गोष्टी विसरण्याची समस्या असते हे तुमच्या लक्षात आले असेलच. सुरवातीला अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात, पण नंतर यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

‘फॉरगेट फ्लू’ आजार या आजाराला मानसोपचारतज्ज्ञांच्या भाषेत ‘फॉरगेट फ्लू’ आजार म्हणतात. माणूस सहसा अनेक छोट्या छोट्या गोष्टी विसरून जातो. छोट्या छोट्या गोष्टी विसरण्यापासून त्याची सुरुवात होते, पण, नंतर हळूहळू त्याचं गांभीर्य इतकं वाढत जातं की त्यानंतर तो अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी विसरायला लागतो, ज्यामुळे त्याला नंतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

स्मृतिभ्रंश का होतो? कधीकधी एखाद्या गोष्टीबद्दल तणाव किंवा चिंता यासारख्या घटकांमुळे होते. या दोन्ही परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा मेंदू नीट काम करणे बंद केल्यास ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागते.

विस्मृतीच्या समस्येवर उपाय काय?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. उदाहरणार्थ, आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. आपण आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा वापर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपण अशा रोगांपासून मुक्त होऊ शकाल.

याशिवाय नियमित व्यायाम करा, कारण वर्कआऊट च्या कमतरतेमुळे लोकांमध्ये विस्मृतीची समस्या निर्माण होते हे सहसा दिसून येते, त्यापासून सुटका मिळवण्यासाठी व्यक्तीने आपल्या शारीरिक हालचालींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते.

तणावापासून दूर राहा

टेन्शन आणि स्ट्रेसपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आपली मानसिक स्थिती शिथिल करा, कारण सतत जेव्हा तुमचे मन एखाद्या विशिष्ट कामात गुंतलेले असते, अशा परिस्थितीतही ती व्यक्ती विस्मृतीला बळी पडते. जर खास टिप्स फॉलो केल्या तर हा फार गंभीर आजार नाही. आपल्या काही सवयी सुधारून तुम्ही अशा विस्मरणापासून मुक्त होऊ शकता.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ