AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 तास 54 मिनिटाचा ब्लॉकबस्टर चित्रपट, बनवण्यासाठी लागली 7 वर्षे, आजही प्रेक्षक आवडीने बघतात

दहशतवाद आणि देशभक्तीवरील 2 तास 54 मिनिटाचा हा चित्रपट बनवण्यासाठी लागली होती 7 वर्षे. प्रदर्शित होताच ठरला होता ब्लॉकबस्टर, जिंकला होता नॅशनल अवॉर्ड.

2 तास 54 मिनिटाचा ब्लॉकबस्टर चित्रपट, बनवण्यासाठी लागली 7 वर्षे, आजही प्रेक्षक आवडीने बघतात
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 19, 2026 | 2:59 PM
Share

बॉलिवूडमध्ये देशभक्ती आणि दहशतवाद या विषयांवर अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले तर काहींनी प्रचंड यश मिळवत इतिहास घडवला. अशाच गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 1999 साली प्रदर्शित झालेला ‘सरफरोश’ हा चित्रपट.

30 एप्रिल 1999 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात सीमापार दहशतवाद आणि शस्त्रास्त्रांची तस्करी या गंभीर विषयांवर प्रकाश टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे, त्या काळात पहिल्यांदाच चित्रपटात पाकिस्तान या शब्दाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराचाही मान मिळाला होता.

कथानकानुसार, अजय सिंह राठोड (आमिर खान) हा आपल्या भावाच्या हत्येनंतर आणि वडिलांच्या जखमी झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण सोडून पोलिस अधिकारी बनतो. त्यानंतर तो सीमापार सुरू असलेल्या शस्त्रास्त्र तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी झटतो. चित्रपटातील मोठा ट्विस्ट म्हणजे, लोकप्रिय पाकिस्तानी गझल गायक गुलफाम हसनच या तस्करीमागील मास्टरमाइंड असल्याचे उघड होते. ज्याला अजय आपला आदर्श मानत असतो.

चित्रपटाचे बजेट आणि कमाई

या चित्रपटात सोनाली बेंद्रे हिचीही महत्त्वाची भूमिका होती. सुमारे 15 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 32 कोटी 42 लाख रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास 7 वर्षांचा कालावधी लागला होता. दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. आमिर खानने साकारलेला प्रामाणिक आणि धाडसी पोलिस अधिकाऱ्याचा रोल प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.

या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. ‘जो हाल दिल का इधर हो रहा है…’ हे रोमँटिक गाणं आजही लोकप्रिय आहे. हे गाणं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायले आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर प्रभावी भाष्य करणारा ठरला आहे. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो.

Follow Us
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच...
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच....
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.