AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस साहेब डोक्यातील हवा काढा, नाही तर राज्यात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगे यांचा इशारा

manoj jarange politics : मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मोठा इशारा दिला आहे. कुणबी प्रमाणपत्र कुणाच्या आदेशाने झाले, असा सवाल देखील त्यांनी केला.

फडणवीस साहेब डोक्यातील हवा काढा, नाही तर राज्यात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगे यांचा इशारा
| Updated on: Aug 06, 2026 | 1:23 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी केल्यानंतर काहींना मिळालेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे समोर आलं आहे. मराठवाड्यात तब्बल 4 नगरसेवकांचं थेट जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे समोर आलं आहे. परंतु या निर्णयावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब डोक्यातील हवा काढा, नाही तर राज्यात फिरण मुश्किल होईल, असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा दिलाय.

मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीतून माध्यमाशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘प्रसाद लाड काय करेन. ते करतात मरमर. यांना वाटोळच करायचं ठरवलं आहे. उदय सामंत आणि लाड यांना तीनदा सांगून होत नाही. कारण त्यांचं ऐकत नाही. फडणवीस यांनी डोक्यातील हवा बाहेर काढा. एकदा आंदोलन सुरू झालं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल’.

‘तुमचे नेते आमच्या विरोधात भाषणं करत आहेत. बैठका घेत आहेत. त्यांना तुम्ही उपनेते करता. इतकं येडं करू नका. तुम्हाला आमचं एक मत मिळणार नाही. आशिष शेलार यांना मी काय होतंय हे सांगितलं. अतुल सावे त्यातच आहे हे मी सांगितलं. मी कुणाचंही नाव घेत नाही. छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडेंचं नाव घेतलं का. घेतलं नाही. बाकीच्यांचं घेत आहे. बावनकुळेमुळे भाजपचं वाटोळं होईल. आम्हाला भोग भोगावे लागू देऊ नका, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

वाटोळं करायचं बंद करा; जरांगेंचा सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, ‘मंत्री राधाकृष्ण विखेंना यातील काही माहीत नाही. बोगस कशाला काही माहीत नाही. आरक्षणाचा काही मेळ नाही. तुम्ही उपसमितीचे अध्यक्ष आहात. बावनकुळे करू शकतात, तुम्हीही करू शकतात. ५० टक्क्यावर आरक्षण गेलंय, ते बोगस नाही का. मराठ्यांपर्यंतच अक्कल चालवू नका. आपल्या घरचे आहेत म्हणून पायदळी तुडवू नका. १९९४मध्ये १६ टक्के आरक्षण दिलं ते बोगस आहे की नाही ते बघावं. खरंच पोटजाती ओबीसींच्या होत्या का हे बघा. मराठे आपले आहेत म्हणून त्यांचं वाटोळ करायचं बंद करा. ते पूर्वी चालत होतं’.

Follow Us
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप
कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेसचा हल्ला
Vijay Wadettiwar | कोणाच्या दबावाखाली प्रमाणपत्र दिलं? जरांगे-सरकारवर काँग्रेस नेत्यांचा जोरदार हल्ला
अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं
Delhi | अमित शाह उत्तर द्या च्या घोषणांनी संसद परिसर दणाणलं; पुन्हा कामकाज स्थगित
अरे, तुम्ही मला पाणीच... धनंजय मुंडेंचा तो व्हिडीओ व्हायरल
अरे, तुम्ही मला पाणीच... सुनेत्रा पवारांच्या उपस्थित पत्रकारांना अडवण्यापूर्वीचा मुंडेंचा व्हिडीओ तुफान व्हायरल
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
Shiv Sena Supreme Court Hearing | सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला,
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, बैठकीत... महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली वाढल्या
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!