AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निरोगी राहायचं असेल ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा, तज्ज्ञांकडून यादीच जाणून घ्या

Healthy Diet: अनेकदा आपण ज्याला आरोग्यदायी आणि खाण्यायोग्य आहार समजतो ते रोज खाल्ले तर शरीर आजारांचे घर बनते. अशावेळी तज्ज्ञांनी अशा गोष्टींविषयी सांगितले आहे की, ज्या गोष्टींचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकता.

निरोगी राहायचं असेल ‘या’ गोष्टींचा आहारात समावेश करा, तज्ज्ञांकडून यादीच जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jan 01, 2025 | 3:56 PM
Share

Healthy Diet: आपल्या आरोग्याचा थेट संबंध अन्नाशी आहे. हल्ली आपले खाणे-पिणे असे झाले आहे की, ते आजारांचे कारण बनतात. अनेकदा आपण विचार न करता काही गोष्टी खातो, ज्यामुळे आपल्या आरोग्याला हानी पोहोचते. हिवाळ्यात आपण आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे, असे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे डॉ. अरविंद अग्रवाल सांगतात की, आजकालची अनियमित जीवनशैली आणि खराब आहार हळूहळू आपल्या शरीराला आजारांचे घर बनवत आहे. आपल्या आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असते. आपल्या आहारत काय खावं किंवा काय खाणे टाळावे, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

काय म्हणतात तज्ज्ञ?

व्हाईट ब्रेड, बर्गर आणि पिझ्झा सारख्या पिठापासून बनवलेल्या गोष्टी आपल्या शरीराला हानी पोहोचवत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या गोष्टींऐवजी मल्टीग्रेन ब्रेड आणि घरगुती पोळी किंवा पराठे अशा संपूर्ण धान्यापासून बनवलेल्या वस्तू खा. त्याचप्रमाणे साखरेचे जास्त सेवन केल्याने मधुमेह आणि लठ्ठपणा होऊ शकतो.

पांढऱ्या साखरेच्या जागी गूळ किंवा मध घाला. सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅक्ड ज्यूसऐवजी नारळ पाणी, लिंबूपाणी किंवा ताज्या फळांचा रस प्या. तसेच समोसे आणि चिप्सऐवजी भाजलेले चणे किंवा ड्रायफ्रूट्स आपली सवय बनवा.

‘या’ गोष्टीही लक्षात ठेवा

नूडल्स आणि केक सारखे प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड पदार्थ खाणे टाळा. त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह आणि जादा मीठ असते, जे शरीराला हानी पोहोचवू शकते. स्वयंपाकात रिफाइंड तेलाऐवजी मोहरी, ऑलिव्ह किंवा नारळाचे तेल वापरा. पांढऱ्याऐवजी तपकिरी तांदूळ खा.

आहारात सेंधा मीठ वापरा

आहारात सेंधा मीठ वापरा. बाजारातील मिठाई वगळा आणि रवा शिरा किंवा गुळाची मिठाई यासारखे हलके आणि निरोगी घरगुती पदार्थ खा. रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, ताजी फळे आणि डाळींचा समावेश करा. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही निरोगी राहाल.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला चांगला आहार घेणं गरजेचं आहे. अनियमित जीवनशैली आणि खराब आहार हळूहळू आपल्या शरीराला आजारांचे घर बनवत आहे. त्यामुळे आम्ही वर सांगितलेल्या गोष्टी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यास तुम्हाला आरोग्यदायी आहार मिळेल. नूडल्स आणि केक सारखे प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड पदार्थ खाणे टाळा. त्याऐवजी तुम्ही रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, ताजी फळे आणि डाळींचा समावेश करा.

( डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.