AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरटी आणि मीठ एकत्र वापरा, ‘या’ समस्या होतील दूर

तुरटी आणि मीठामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास उपयुक्त ठरतात. अशावेळी तुरटी आणि मीठ वापरून तुम्ही कोणत्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता हे जाणून घेऊया.

तुरटी आणि मीठ एकत्र वापरा, 'या' समस्या होतील दूर
alum and salt
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 2:11 PM
Share

तुरटी आणि मीठ एकत्र मिसळल्यास अनेक समस्या दूर होतात. या दोन्ही गोष्टींमध्ये शरीरातील अनेक प्रकारच्या समस्या दूर करणारे गुणधर्म आहेत. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, तर मीठात बॅक्टेरिया आणि अँटी-फंगल गुणधर्म देखील असतात. हिवाळ्यात घरगुती उपचारांसाठी मीठ आणि तुरटी बहुतेक लोकं वापरतात. कारण तुरटी आणि मीठ हिवाळ्यात शरीरातील अनेक समस्या दूर करू शकते. तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून ते दातांच्या हिरड्यांपर्यंत सर्व काही बरे होऊ शकते. तर या लेखात मीठ आणि तुरटी कशासाठी वापरली जाते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.चला जाणून घेऊयात

दात आणि हिरड्यांची समस्या

तुरटी आणि मीठ हे दात व हिरड्यांसाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर करून हिरड्यांची सूज, वेदना आणि तोंडाचे व्रण बरे करता येते. यामुळे घसा खवखवण्यापासूनही आराम मिळतो. तुरटी पाण्यात विरघळवून त्यात चिमूटभर मीठ घालावे आणि मग त्याबरोबर चुळ भरावी. अश्याने घशाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

जखम आणि रक्तस्त्राव

जर तुम्हाला दुखापत झाली असेल आणि खूप रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही तुरटी वापरू शकता. जखमेवर हलकी तुरटीची पावडर लावल्यास रक्तस्त्राव लवकर थांबतो आणि संसर्ग होत नाही.

पायांच्या टाचांना भेगा पडणे

हिवाळ्यात काही लोकांच्या पायांच्या टाचांना भेगा पडतात. अशा वेळी ते बरे करण्यासाठी तुरटी अतिशय उपयुक्त ठरते. गरम पाण्यात तुरटी आणि मीठ मिसळावे आणि नंतर त्यात आपले पाय काही वेळ ठेवावे. यामुळे भेगा पडलेल्या टाचा मऊ होतात आणि संसर्ग टाळण्यास देखील मदत होते.

पिंपल्स आणि मुरुम

तुरटी आणि मीठ हे पिंपल्स व मुरुम कमी करण्यास देखील मदत करते. यामुळे पिंपल्सचे बॅक्टेरिया दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते. यासाठी तुरटी आणि मीठाची पेस्ट तयार करून पिंपल्स आणि मुरुमांच्या भागावर लावा आणि १०-१५ मिनिटांनी धुवून टाका. याने काही दिवसात तुमच्या चेहऱ्यावरील मुरमांची समस्या दूर होईल.

घामाचा दुर्गंध काढून टाकते

जर तुम्हला सतत घाम येत असेल आणि त्यामुळे दुर्गंधी येत असेल तर तुरटी आणि मीठ वापरावे. यासाठी तुम्हाला फक्त आंघोळीपूर्वी पाण्यात तुरटी आणि मीठ मिसळावे लागेल आणि नंतर त्या पाण्याने आंघोळ करा. असे केल्याने तुम्हाला सतत घाम येणार नाही आणि दुर्गंधी दूर होईल. तसेच त्वचा बॅक्टेरियामुक्त राहील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.