AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palak Water: वाढलेलं वजन झटपट कमी करायचंय? स्वयंपाकघरातील हा पदार्थ ठरेल फायदेशीर…

Palak Water for Weightloss: अनेकांना व्यस्त जीवनशैलीमुळे वजन वाढणे आणि लठ्ठपणाच्या समस्या उद्भवतात. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही कारण घरच्या घरी तुम्ही काही सोप्या आहाराचे सेवन करून वजन कमी करू शकता. पालकभजी किंवा पालची भाजी तर तुम्ही खाल्लीच असेल परंतु तुम्हाला माहिती आहे का? पलकच्या पाण्यामुळे तुमचं वाढलेलं वजन कमी होऊ शकते.

Palak Water: वाढलेलं वजन झटपट कमी करायचंय? स्वयंपाकघरातील हा पदार्थ ठरेल फायदेशीर...
Palak
| Edited By: | Updated on: Feb 21, 2025 | 1:21 AM
Share

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारात पोषक तत्वंचा समावेश करणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये फळं, भाज्या, कडधान्य या गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते. अनेकांना पालक खाण्यास आवडते. पालकचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक असतात. पालक खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का पालक धुतलेल्या पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या कुंडीतील फुले आणि भाज्यांची योग्य वाढ होते. पालकच्या पाण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे झाडांची निरोगी आणि योग्य वाढ होते.

पालकचे पाणी झाडांसाठी वापरल्यामुळे ते हिरवेगार आणि टवठवीत दिसू लागतात. जमिनीवर पालकच्या पाण्याचा वापर केल्यामुळे ती जमिन सुपिक आणि हिरवीगार होते. अशा प्रकारे तुमही घरच्या घरी खत बनवू शकता ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रसायनिक पदार्थाचा वापर केला जात नाही. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या आहारामध्ये प्रोटिन आणि फायबर असणे गरजेचे आहे.

पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे वजन नियंत्रित राहाते आणि त्याध्ये पालकमध्ये काही टक्के पाणी असते ज्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि शरीर हायड्रेटेड राहाते. त्याच प्रमाणे पालक ज्या पाण्यामध्ये उकळले जाते त्या पाण्यामध्ये देखील अनेक पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. पालकच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रि राहाते आणि तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. पालकचे पाणी बनवण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरातील पालक स्वच्छ धुवा आणि पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर ते पाणी एका ग्लासमध्ये ठेवा आणि त्यामध्ये काळे मीठ किंवा सैंधव मीठ मिसळा. यानंतर या पाण्याची चव वाढवण्यासाठी त्यामधये तुम्ही थोडी काळी मिरी पावडर मिसळा. या पेयाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळू लागते आणि वजन झटपट कमी होण्यास मदत होते. पालकाचे पाणी पांढऱ्या केसांना काळे करण्यास मदत करते. या पाण्यात लोहाचे प्रमाण चांगले असते जे रक्ताभिसरण सुधारण्यास आणि कोलेजन वाढवण्यास मदत करते. याशिवाय, त्यातील प्रथिने केसांच्या वाढीसह रंग राखतात ज्यामुळे केस राखाडी होत नाहीत आणि बराच काळ काळे राहतात.

पालकाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या आढळणारे नायट्रेट्स असतात, ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधाते. अशाप्रकारे, उकडलेले पालक पाणी पिल्याने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते. पालकचे पाणी पिल्याने शरीरातील साचलेली अशुद्धता बाहेर पडते आणि चरबीचे प्रमाण कमी होते. यामुळे त्वचेचे छिद्र आतून स्वच्छ होतात आणि रक्तही शुद्ध होते. अशाप्रकारे पालकाचे पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. पालकचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. तुम्हाला पिंपल्स, काळे डाग आणि मुरूम सारख्या समस्या असतील तर तुम्ही पालकच्या पाण्याचे सेवन करू शकता. तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या समस्या असतील तर आठवड्यातून 2-3 वेळा पालकच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. पालकाचे पाणी चयापचय वाढवण्यात मदत करते ज्यामुळे तुमचं वजन वाढत नाही आणि शरीरामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज वाढत नाही. त्यामुळे तुम्ही जर वजनकमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही पालकच्या पाण्याचे सेवन करू शकता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.