AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीरातून घाम का निघतो?, प्रकृतीसाठी चांगलं की वाईट?, वाचा सविस्तर…

तुम्हीही अशाच लोकांपैकी आहात का, ज्यांना खूप घाम येतो. प्रत्येकाला घाम येण्याची कारणे वेगवेगळी असून शकतात.

शरीरातून घाम का निघतो?, प्रकृतीसाठी चांगलं की वाईट?, वाचा सविस्तर...
घाम
| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 11:15 AM
Share

मुंबई : तुम्हीही अशाच लोकांपैकी आहात का, ज्यांना खूप घाम येतो. प्रत्येकाला घाम येण्याची कारणे वेगवेगळी असून शकतात. व्यायाम केल्यानंतर आणि उन्हाळ्यात घाम येणे स्वाभाविक आहे. मात्र, घाम येणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे की, नाही असा प्रश्न नेहमीच अनेकांना पडलेला असतो. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी घाम येणे महत्वाचे आहे. परंतु आजच्या काळात सर्व कामे लॅपटॉप व मोबाईलवर अवलंबून आहेत. (Why does sweat come out of the body, is it good or bad for health?)

लोक शारीरिक हालचाली व्यवस्थित करत नाहीत. यामुळे घाम देखील येण्याचे प्रमाण आता कमी होत आहे. घाम म्हणजे शरीरातून पाण्याचे लहान थेंब बाहेर पडतात. ज्यामध्ये अमोनिया, युरिया, मीठ आणि साखर इत्यादी असतात. जेव्हा जेव्हा आपल्या शरीराचे तापमान सामान्यपेक्षा जास्त होते, तेव्हा घामाच्या ग्रंथी शरीराच्या तापमानाचे नियमन आणि शरीरातून पाणी शोषून घेते. यामुळे घाम घेणे शरीरासाठी चांगलेच असते.

व्यायाम करताना घाम येणे चांगले

जेव्हा आपण व्यायाम करता तेव्हा घाम येणे खूप महत्वाचे आहे. कारण व्यायामादरम्यान आपल्या शरीराचे तापमान वाढते आणि हृदय वेगवान होते. अशा परिस्थितीत घाम येण्याने आपल्या शरीराचे तापमान संतुलित राहते आणि ऊर्जा येण्यास मदत होते.

शरीर स्वच्छ होते

घाम आल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. बऱ्याच संशोधनात असे सिध्द झाले आहे की, घामामधून मीठ, साखर, कोलेस्ट्रॉल आणि अल्कोहोल सारखे पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर पडतात. अशा परिस्थितीत शरीर चांगले साफ होते आणि सर्व अवयव अधिक चांगले काम करतात.

त्वचा चांगली होते

घाम आल्यामुळे आपली त्वचा चांगली आणि स्वच्छ होते. त्वचेचे छिद्र घाम झाल्यामुळे उघडले होतात. अशा परिस्थितीत त्वचेवर जमा झालेले धूळ देखील घामातून बाहेर पडते. यामुळे त्वचा निरोगी होते आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

दररोज व्यायाम करताना घाम येत असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त चांगले आहे. कारण व्यायाम करताना घाम आल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने आजार आपल्यापासून दूर राहतात.

हे पण लक्षात ठेवा

– जर काहीही न करता आपल्याला घाम येत असेल तर हृदयविकाराचा झटका देखील असू शकतो, यावेळी आपण विलंब न करता तज्ञांचा सल्ला घ्या.

– काही लोकांना घामामुळे अॅलर्जी होण्यास सुरवात होते आणि शरीरावर पुरळ उठते किंवा खाज सुटण्याची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत आपण त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

– केंद्रीय मज्जासंस्था, रक्ताभिसरण यासह अल्कोहोल शरीराच्या इतर अनेक भागावर देखील परिणाम करते. जास्त मद्यपान केल्यामुळे हृदयाची गती वाढते आणि यामुळे जास्त प्रमाणात घाम येण्याची समस्या उद्भवू शकते.

-या व्यतिरिक्त ज्या लोकांना ताण किंवा चिंतेची समस्या असते, त्यांनाही सामान्य माणसांपेक्षा जास्त घाम फुटतो. तसेच काही औषधांमुळे जास्त घाम येणे ही समस्या देखील उद्भवू शकते.

-जेव्हा एखादा रुग्ण हायपोथायरॉईडीझमने ग्रस्त असतो तेव्हा त्याचे शरीर अधिक उष्ण आणि उष्णतेबद्दल खूपच संवेदनशील बनते. यामुळे अशा लोकांना जास्त प्रमाणात घाम येणे, ही समस्या सुरू होते.

संबंधित बातम्या : 

मुंबईत 15 जुलैपासून पाचव्या सेरो सर्व्हेक्षणास सुरुवात; सर्व वयोगटांच्या अँटीबॉडीज तपासणार!

भारताची नवी कोरोना लस ZyCov-D, तीन डोस घ्यावे लागणार, सुई विना लसीकरण, वाचा सविस्तर

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये सलग दोन दिवस वाढ, कोरोनाबळीही पुन्हा हजारापार

(Why does sweat come out of the body, is it good or bad for health?)

तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....