AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World AIDS Day: एड्समुळे देशात दररोज होतो 115 लोकांचा मृत्यू, कशी असतात एड्सची लक्षणे?

एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी जगभरात 1 डिसेम्बर हा जागतिक एडस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतातील एडसच्या आकडेवारीबद्दल जाणून घेऊया.

World AIDS Day: एड्समुळे देशात दररोज होतो 115 लोकांचा मृत्यू, कशी असतात एड्सची लक्षणे?
| Updated on: Dec 01, 2022 | 10:24 AM
Share

मुंबई,  वर्षाच्या शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस. म्हणजेच 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन (World AIDS Day) म्हणून पळाला जातो.  एड्सबद्दल लोकांमध्ये जागरुकता यावी हा यामागचा उद्देश आहे. एड्स हा एचआयव्ही किंवा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी (HIV) व्हायरसमुळे होतो. हा विषाणू शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो आणि तो इतका कमकुवत करतो की शरीर इतर कोणतेही संक्रमण किंवा रोग सहन करण्यास सक्षम राहत नाही.

एचआयव्ही हा असा विषाणू आहे, त्यावर वेळीच उपचार न केल्यास तो पुढे एड्सचा आजार बनतो. यावर अद्याप कोणताही ठोस इलाज नाही, परंतु काही औषधांच्या मदतीने विषाणूचा भार कमी केला जाऊ शकतो, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.

1981 मध्ये झाली एचआयव्हीची पुष्टी

एचआयव्ही 1981 मध्येच आढळून आला होता, परंतु भारतात त्याचे पहिले प्रकरण 1986 मध्ये उघड झाले. त्यानंतर चेन्नईमध्ये राहणाऱ्या काही सेक्स वर्करमध्ये या संसर्गाची पुष्टी झाली. तोपर्यंत एचआयव्ही जगातील अनेक देशांमध्ये पोहोचला होता आणि तो भारतातही दाखल झाला होता. एचआयव्ही संसर्गाच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

त्याच वर्षी, मध्य प्रदेशातील कार्यकर्ते चंद्र शेखर गौर यांनी एक आरटीआय दाखल केला, ज्याच्या उत्तरात राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने (NACO) सांगितले की 10 वर्षांत असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे भारतात 17 लाखांहून अधिक लोक एचआयव्हीला बळी पडले आहेत.  NACO च्या मते, 2011 ते 2021 दरम्यान, संक्रमित रक्ताद्वारे एचआयव्ही पॉझिटिव्ह झालेले 15,782 लोक आहेत. तर 4,423 बालकांना मातांच्या माध्यमातून संसर्ग झाला आहे.

असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे सर्वाधिक संसर्ग

एचआयव्हीची लागण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध. अनेक प्रकरणांमध्ये, संक्रमित रक्ताच्या संपर्कात आल्याने देखील संसर्ग होतो. त्याच वेळी, मुलांमध्ये हा संसर्ग त्यांच्या मातांकडून होतो. हा विषाणू जगात येऊन 40 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, मात्र आजतागायत यावर ठोस उपाय सापडलेला नाही.

याची लागण झालेल्या लोकांना अँटी रेट्रोव्हायरल थेरपी (ART) दिली जाते, ज्यामुळे विषाणूचा भार कमी होतो. वेळीच उपचार केले तर खूप फायदा होतो, पण तो केला नाही तर एड्स होण्याचा धोका वाढतो. साधारणपणे एड्सचा आजार एचआयव्हीच्या पकडीत आल्यानंतर अनेक वर्षांनी होतो.

आकडे काय सांगतात?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, आताही हा विषाणू दरवर्षी लाखो लोकांना संक्रमित करत आहे. 2021 च्या अखेरीस जगात 3.84 कोटी लोकांना या विषाणूची लागण झाली होती. 2021 मध्ये, HIV मुळे जगभरात 6.5 लाख लोकांचा मृत्यू झाला.

NACO नुसार, 2021 मध्ये, भारतात एड्सचे 62,967 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आणि 41,968 लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे दररोज सरासरी 115 मृत्यू होत आहेत.  UNAIDS च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 2021 पर्यंत भारतात 24 लाख लोक एचआयव्ही बाधित होते.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) म्हणते की कोरोनामुळे एचआयव्ही एड्सचा प्रतिबंध करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे पुढील 10 वर्षांत 77 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

एचआयव्ही ते एड्स… अशा प्रकारे पसरतो विषाणू

असुरक्षित संभोग आणि संक्रमित रक्ताच्या संपर्कात आल्याने एचआयव्हीचा धोका वाढतो. त्यावर योग्य वेळी उपचार सुरू करणे फार महत्वाचे आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नुसार, जेव्हा एचआयव्हीची लागण होते तेव्हा फ्लूसारखी लक्षणे दिसतात, जसे की ताप, घसा खवखवणे किंवा अशक्तपणा.

त्यानंतर एड्स तयार होईपर्यंत या आजारात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. एड्स झाल्यावर वजन कमी होणे, ताप येणे किंवा रात्री घाम येणे, थकवा-अशक्तपणा ही लक्षणे दिसतात. एचआयव्हीचे एड्समध्ये रुपांतर होण्यासाठी साधारणपणे तीन टप्पे लागतात.

  1. पहिला टप्पा: एचआयव्ही संसर्ग व्यक्तीच्या रक्तात पसरतो. यावेळी, संसर्ग अधिक लोकांमध्ये पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. या अवस्थेत फ्लूसारखी लक्षणे दिसतात. मात्र, अनेक वेळा संक्रमित व्यक्तीला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत.
  2. दुसरा टप्पा: हा असा टप्पा आहे ज्यामध्ये संक्रमित व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, परंतु व्हायरस सक्रिय राहतो. कधीकधी 10 वर्षांहून अधिक काळ जातो, परंतु त्या व्यक्तीला औषधाची गरज नसते. या दरम्यान व्यक्ती संसर्ग पसरवू शकते. अखेरीस विषाणूचा भार वाढतो आणि व्यक्तीमध्ये लक्षणे दिसू लागतात.
  3. तिसरा टप्पा: एचआयव्ही आढळल्याबरोबर औषधोपचार सुरू केले, तर या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता फारच कमी असते. एचआयव्हीचा हा सर्वात गंभीर टप्पा आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती एड्सने ग्रस्त होते. एड्समुळे, एखाद्या व्यक्तीमध्ये विषाणूचा भार खूप जास्त होतो आणि तो खूप संसर्गजन्य बनतो. या अवस्थेत, एखाद्या व्यक्तीला उपचाराशिवाय 3 वर्षे जगणे कठीण आहे.

बचावासाठी काय करावे?

असुरक्षित लैंगिक संबंधातून एचआयव्ही संसर्ग पसरण्याचा सर्वाधिक धोका असतो. भारतातही सेक्स वर्कर्समध्ये एचआयव्हीचे पहिले प्रकरण समोर आले होते. म्हणूनच असुरक्षित लैंगिक संबंध टाळायला हवेत. याशिवाय इंजेक्शनद्वारे औषधे घेताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

एचआयव्ही आढळल्यास घाबरून जाण्याऐवजी ताबडतोब अँटीरेट्रोव्हायरल थेरपी सुरू करा, कारण एचआयव्हीमुळे शरीर खूप कमकुवत होते आणि हळूहळू इतर आजारही त्याला ग्रासायला लागतात. यावर अद्याप कोणताही इलाज नसला तरी औषधांद्वारे तो टाळता येऊ शकतो.

Follow Us
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.