AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आता कोणाच्या हातात देशाची कमान

बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता देशाची कमान कोणाच्या हातात असणार असा प्रश्न लोकांना पडला आहे. देशात आता लष्कराची राजवट लागू झाली आहे. देशातील आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण देशाचे महत्त्वाचे निर्णय कोण घेणार जाणून घ्या.

शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आता कोणाच्या हातात देशाची कमान
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 05, 2024 | 5:50 PM
Share

Bangladesh | बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय. राजीनामा दिल्यानंतर त्यांना देश देखील सोडावा लागलाय. शेख हसीना यांनी आता भारतात आश्रय घेतला आहे. यानंतर त्या भारतमार्गे लंडनला जाऊ शकतात असा दावा देखील केला जात आहे. शेख हसीना यांच्या राजीना्यानंतर आता बांगलादेशची कमान लष्कराच्या हाती आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर लोकं प्रश्न उपस्थित करत आहेत की पंतप्रधानांच्या जागी कोणता लष्करी अधिकारी देशाचे महत्त्वाचे निर्णय घेणार आहे.

देशाचे निर्णय कोण घेणार

बांगलादेशात देशाची कमान लष्कराच्या हाती येण्याची ही काय पहिलीच वेळ नाहीये. याआधीही देशात लष्करी राजवट लागू झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाबाबतचे सर्व निर्णय लष्करप्रमुख घेतात. सध्या लष्करप्रमुख बांगलादेशमध्ये आहेत. म्हणजेच आता देशाचे सर्व निर्णय जोपर्यंत बांगलादेशवर लष्कराचे राज्य आहे, तोपर्यंत देशाचे सर्व महत्त्वाचे निर्णय लष्करप्रमुख घेणार आहेत.

यापूर्वीही लष्कराने उलथवलवी सत्ता

बांगलादेशच्या इतिहासात लष्कर आणि सरकारमध्ये याआधीही अशी परिस्थिती बिघडली आहे. यापूर्वी 1975 मध्येही लष्कराने देशाची सत्ता काबीज केली होती. 1975 मध्ये देशात शेख मुजीबुर रहमान यांचे सरकार होते. शेख मुजीबूर रहमान हे शेख हसीना यांचे वडील आहेत. त्यावेळी लष्कराने बांगलादेशवर सुमारे 15 वर्षे राज्य केले होते.

हिंसाचारामुळे बांगलादेशची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लष्करप्रमुख वकार उझ जमान यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सांगितले आणि तुम्ही लोक आमच्यासोबत आलात तर आम्ही परिस्थिती बदलू, असेही सांगितले. भांडणे, अराजकता आणि संघर्षापासून दूर राहण्यास सांगितले. बांगलादेशमध्ये लवकरच अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याचं लष्करप्रमुखांनी म्हटलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

बांगलादेशातील विद्यार्थी संघटना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला विरोध करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांनी शेख हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यासाठी त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलनाची घोषणाही केली. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबत गेल्या महिन्याभरापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. पण शेख हसीना यांनी या विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटले. तसेच आंदोलकांसोबत कडक कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यानंतर हिंसाचार आणखी उसळला. ज्यामध्ये आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?