AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oil Crisis : आपल्याकडे स्वत:च तेल नाही पण पुढच्या काही दिवसात जगातले अनेक देश तेलासाठी भारतावरच अवलंबून राहतील, कारण..

Oil Crisis : भारताकडे स्वत:च तेल फार नाहीय. पण पुढच्या काही दिवसात जगातले अनेक देशासाठी तेलासाठी भारताकडे येतील अशी स्थिती आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमुळे पुन्हा एकदा जागतिक तेल संकटाची भिती निर्माण झाली आहे.

Oil Crisis : आपल्याकडे स्वत:च तेल नाही पण पुढच्या काही दिवसात जगातले अनेक देश तेलासाठी भारतावरच अवलंबून राहतील, कारण..
Oil
| Updated on: Jul 15, 2026 | 3:10 PM
Share

इराण युद्ध सुरु झाल्यानंतर अर्थतज्ज्ञांना कच्चा तेलाच्या पुरवठ्याची चिंता होती. आता अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकलं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये नाकेबंदी लागू झाली आहे. तेलाच्या किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. दरम्यान आता अजून एक मोठं संकट निर्माण झालं आहे. पेट्रोल-डिझेल बनवण्याची क्षमता घटणं हे एक नवीन टेन्शन आहे. फारसच्या खाडीतून कोट्यवधी बॅरल तेल बाहेर येत आहे. पण ते काही उपयोगाचं नाहीय. कच्चं तेल पेट्रोल, डिझेल, जेट फ्यूल मध्ये बदलण्यासाठी रिफायरनरीजची आवश्यकता आहे. सध्या जगाची रिफायनिंग क्षमता वाईट पद्धतीने प्रभावित झाली आहे. इराणने मिडिल ईस्टच्या रिफायनरीजवर अनेक हल्ले केले आहेत. युक्रेनने रशियाचे ऊर्जा तळ ड्रोन हल्ल्यात उद्धवस्त केलेत. त्यामुळे तेल रिफायनिंगसाठी जगातील अनेक देश भारताकडे येऊ शकतात.

तापमानामुळे रिफायनरीजची कूलिंग सिस्टिम फेल झाली आहे. जागतिक रिफायनिंग साखळीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. जेपी मॉर्गनच्या डेटानुसार जगभरातील रिफायनरीज युद्ध सुरु होण्याआधीच्या तुलनेत दरदिवशी 84 लाख बॅरल कमी कच्चा तेलावर प्रोसेस करत आहेत. म्हणजे जगभरातील इंधन उत्पादन 10 टक्क्याने पडलं आहे. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक, चौथा मोठा रिफायनर आणि पेट्रोलियम उत्पादनाचा पाचवा मोठा निर्यातक आहे.

भारतात तेलसाठे कुठे आहेत?

भारताकडे कच्चा तेलाचे मर्यादीत साठे आहेत. त्यातून वर्षाला 28 मिलियन मेट्रिक टन तेल निघतं. हे साठे आसाम, मुंबई हाय आणि राजस्थानमध्ये आहेत. भारतातील तेल रिफायनरीज इतक्या मोठ्या आहेत की, ते परदेशातून तेल मागवून वर्षाला 258 MMTPA पेक्षा अधिक तेलावर प्रोसेस करतात. भारतात एकूण 23 रिफायनरीज आहेत. यात 18 सार्वजनिक क्षेत्र आणि तीन खासगी क्षेत्रातील आहेत.

भारतात डिझेलचा वापर किती?

भारतात डीझेलचा वापर सर्वात जास्त होतो. देशातल्या एकूण तेल वापरात (243.2 MMT) डिझेलचा वाटा (94.7 MMT)39 टक्के आहे. जवळपास 17.5% हिस्सा पेट्रोलचा (42.6 MMT) आहे. देशभरातील 1,03,023 पेक्षा अधिक पेट्रोल पंप ही विशाल मागणी पूर्ण करतात. जामनगर गुजरात येथे रिलायंस इंडस्ट्रीजची रिफायनरी जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स आहे.

भारताची रिफायनिंग क्षमता किती?

अमेरिका आणि युरोपमध्ये जुन्या रिफायनरीज बंद होत आहेत. तेच भारताने आपली रिफायनिंग क्षमता वाढवली आहे. भारत (243 MMT) घरगुती इंधन वापरतो. त्यापेक्षा जास्त (258+ MMT) रिफायनिंग क्षमता आहे. भारताच्या रिफाइंड उत्पादनांनी निर्यातीचा जागतिक बाजार संभाळला आहे.

कच्चा तेलाच्या आयातीसाठी भारताने आखाती देशांवरील अवलंबित्व कमी केलं आहे. भारत आता 27 ऐवजी 41 देशांकडून तेल मागवतो. रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करुन भारताने आपल्या अत्याधुनिक रिफायनरीजमध्ये प्रोसेस केलं. त्या रणनितीने अब्जावधी डॉलर्स वाचवले. देशांतर्गत बाजारातही पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवल्या.

Follow Us
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत
Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत काय म्हणाले?
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितल
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितली A टू Z माहिती
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर विरोधकांचा मिळणार पाठिंबा, एकाऐकी काय घडलं?
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे 50 मिनिटांच्या बैठकीत...
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा

Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून.

Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ.

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ

वय फक्त 26… अवघ्या एका दिवसात कमावले 77 कोटी… रातोरात करोडपती बनलेला हा भारतीय तरुण कोण?.

वय फक्त 26… अवघ्या एका दिवसात कमावले 77 कोटी… रातोरात करोडपती बनलेला हा भारतीय तरुण कोण?

धरती गरम होत आहे, बळी हवा… असे ओरडत व्यापाऱ्याचा गळा कापला, प्रकरण कळताच पोलिस हादरले.

धरती गरम होत आहे, बळी हवा… असे ओरडत व्यापाऱ्याचा गळा कापला, प्रकरण कळताच पोलिस हादरले

तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!