AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा

CM Devendra Fadnavis : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी 48 हजार कोटींचे वीजबील माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा
CM Fadnavis Electricity BillImage Credit source: Google
| Updated on: Jul 15, 2026 | 2:56 PM
Share

राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आज भाजपच्या प्रदेश समितीच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी 48 हजार कोटींचे वीजबील माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. वीजबील माफ करण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांचे थकित वीजबील माफ होणार

वीजबील माफ करण्याची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा म्हणून दोन गोष्टी केल्या. शेतकऱ्यांना 7.5 हॉर्सपावरपर्यंत वीज बिलं आपण माफ केलीत. वीज कंपनी स्वतःच्या खिशातून भरत नाही, आपण बजेटमधून देतो. तुमच्या सगळ्यांच्या नावावर 7.5 हॉर्स पावरची जुनं बिलं आहेत. प्रत्येकाच्या नावाने तुमची जुने बिलं आहेत, कधीही कंपनीचा कर्मचारी वसूलीसाठी येऊ शकतो. मात्र आता आम्ही 48 हजार कोटींचे जुने बिल माफ करणार आहोत. शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे यासाठी हा निर्णय घेतोय.

निवडणुका नाहीत तरीही कर्जमाफीचा निर्णय घेतला

कर्जमाफीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘कर्जमाफीचा निर्णय कोणतीही निवडणुका डोळ्यासमोर नसताना घेण्यात आला. कर्जमाफीचे आश्वासन आपण दिलं होतं, राज्यात अभूतपूर्व यश आपल्याला मिळालं. पालिका, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या भाजपला भरभरून जनतेनं दिले. राजकीय विचार केला असता तर समोर निवडणूक नाही, 2029 ला कर्जमाफी करू असा विचार करता आला असता मात्र शेतकरी हिताचे विषय राजकारण्यांसंबंधी नाही. महायुतीचे हे सरकार आहे, देवाभाऊंचे हे सरकार आहे आणि आपण निर्णय घेतला.’

कर्जमाफी अंतिम उपाय नाही

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘ज्यांनी नियमित कर्ज भरलं आहे त्यांना 50 हजार देण्याचा निर्णय घेतला, काही आमदारांशी चर्चा केल्यानंतर मी 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. एकही पैसा आता शेतकऱ्यांना भरण्याची आवश्यकता नाही. मात्र कर्जमाफी अंतिम उपाय नाही. 7-8 वर्षात कर्जमाफी कराव्या लागत असतील तर आपले शेतीप्रश्न कठीण आहेत. कोणी कर्जमाफीतून श्रीमंत झाला नाही. शेतकरी जेमतेम पीक कर्ज काढत असेल आणि ते पण परत करु शकत नसेल तर अडचण आहे.

Follow Us
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत
Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत काय म्हणाले?
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितल
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितली A टू Z माहिती
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर विरोधकांचा मिळणार पाठिंबा, एकाऐकी काय घडलं?
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे 50 मिनिटांच्या बैठकीत...
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून.

Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ.

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ

धरती गरम होत आहे, बळी हवा… असे ओरडत व्यापाऱ्याचा गळा कापला, प्रकरण कळताच पोलिस हादरले.

धरती गरम होत आहे, बळी हवा… असे ओरडत व्यापाऱ्याचा गळा कापला, प्रकरण कळताच पोलिस हादरले

तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!

त्या दिवसापासून ती कुणाशी बोललीच नाही..अखेर आयुष्यच संपवलं; धक्कादायक घटनेने डोंबिवलीत हळहळ.

त्या दिवसापासून ती कुणाशी बोललीच नाही..अखेर आयुष्यच संपवलं; धक्कादायक घटनेने डोंबिवलीत हळहळ

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, दिल्ली हायकोर्टाची केंद्रासह दिल्ली सरकारला नोटीस, मोठी अपडेट काय?.

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, दिल्ली हायकोर्टाची केंद्रासह दिल्ली सरकारला नोटीस, मोठी अपडेट काय?