AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Global Summit : तंत्रज्ञानाने चित्र बदललं, अवघ्या 5 तासात आला निकाल : अश्विनी वैष्णव

वैष्णव यांनी आपल्या भाषणात कोविडसारख्या महामारी दरम्यान जागतिक आर्थिक संकटाचा उल्लेख केला. त्या काळात जेव्हा जगातील अनेक मोठ्या देशांनी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी खर्चावर लक्ष केंद्रित केले, भारताने त्या काळात गुंतवणुकीचा मार्ग निवडला.

News9 Global Summit : तंत्रज्ञानाने चित्र बदललं, अवघ्या 5 तासात आला निकाल : अश्विनी वैष्णव
Ashwini Vaishnaw Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 21, 2024 | 11:42 PM
Share

भारताच्या नंबर-1 न्यूज नेटवर्क TV9 च्या News9 ग्लोबल समिटची सुरुवात जर्मनीमध्ये झाली आहे. भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समिटमध्ये ‘भारत आणि जर्मनी: सतत विकासासाठी रोडमॅप’ या विषयावर विचार मांडले. अश्विनी वैष्णव यांनी आपल्या भाषणात जर्मनी आणि सर्व भारतीयांचे आभार मानले. भारताकडून जर्मनीच्या नागरिकाांचे स्वागत आहे. मागील 5 वर्षांत जगाने 3 मोठ्या अडचणींचा सामना केला आहे. यामध्ये कोविड आणि जगभरातील विविध देशांमध्ये संघर्ष आहेत, असं अश्विनी वैष्णव म्हणाले.

2024 या वर्षात लोकशाही देशांमध्ये निवडणुकांचा उत्सव आहे. 6 महिन्यांपूर्वी भारतातही निवडणूक झाल्या आहेत. भारतात 968 मिलियन मतदार आहेत. ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. जग डिजिटल युगात जलद गतीने पुढे सरकत आहे. भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप सजग आहे. याचाच परिणाम म्हणून भारतात फक्त 5 तासांमध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल आले, असं अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं.

मोदी सरकारच्या धोरणांवर विश्वास

या बदलत्या जागतिक डिजिटल वातावरणात एक मोठी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा सत्तेत आली आहे. मोदी सरकारच्या धोरणांवर आणि योजनाांवर लोकांचा विश्वास आहे हेच यातून स्पष्ट होते. भारताच्या लोकांनी स्थिरतेसाठी मतदान केले आहे. 10 वर्षांपूर्वी मोदींना सत्ता मिळाल्यावर भारत जीडीपीच्या बाबतीत दहाव्या क्रमांकावर होता. त्यावेळी संस्थांमध्ये लोकांचा विश्वास कमी होता. एका दशकात भारत जीडीपीच्या बाबतीत सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. 2030 पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा संकल्प करतो, असंही वैष्णव यांनी सांगितलं.

वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न

आज आम्ही जलद गतीने पुढे जात आहोत. महागाई नियंत्रणात आहे. सरकारची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे. कोविडच्या काळानंतर भारताने गुंतवणुकीत विश्वास दाखवला आहे, असंही ते म्हणाले.

अश्विनी वैष्णव यांचा इशारा

अश्विनी वैष्णव यांनी निवडणुकांमध्ये ज्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाबद्दल बोलले, त्यांचा इशारा भारतात निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन’ (EVM) कडे होता. याशिवाय, निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर निवडणूक परिणामांचे थेट अपडेट, सीटनुसार उमेदवारांचे डेटा आणि त्यांच्या थेट अपडेटसह, निवडणुकीशी संबंधित मतांच्या वाट्यापासून गटांनी संकलित केलेल्या कलांपर्यंतचे अपडेट भारताच्या तंत्रज्ञानातील प्रगतीला दर्शवतात, असंही त्यांनी सांगितलं.

भारताने खर्चाऐवजी निवडला गुंतवणुकीचा मार्ग

वैष्णव यांनी आपल्या भाषणात कोविडसारख्या महामारी दरम्यान जागतिक आर्थिक संकटाचा उल्लेख केला. त्या काळात जेव्हा जगातील अनेक मोठ्या देशांनी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी खर्चावर लक्ष केंद्रित केले, भारताने त्या काळात गुंतवणुकीचा मार्ग निवडला. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. भारत सरकारने केवळ पायाभूत सुविधांवरच नाही, तर डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवरही गुंतवणूक केली आहे. भारताच्या गुंतवणुकीच्या केंद्रित दृष्टिकोनामुळे आज केंद्र सरकारचा कर्जाचा भार जीडीपीच्या 60 टक्क्यांपेक्षा कमी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.