AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठा दणका, पाकिस्तानचे दोन तुकडे, बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिनही घोषित; संविधानाचं मराठी आणि हिंदीशी कनेक्शन

बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केले आहे, 11 ऑगस्ट हा 'स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी स्वतःचे धर्मनिरपेक्ष संविधान तयार केले असून ते मराठी आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

सर्वात मोठा दणका, पाकिस्तानचे दोन तुकडे, बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिनही घोषित; संविधानाचं मराठी आणि हिंदीशी कनेक्शन
Republic of BalochistanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 04, 2026 | 10:46 AM
Share

पाकिस्तानला सर्वात मोठा दणका बसला आहे. पाकिस्तानचे थेट दोन तुकडे झाले आहेत. बलुचिस्तानने स्वत:ला स्वतंत्र घोषित केलं आहे. एवढंच नव्हे तर बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिनही घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानने 11 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन जाहीर केला आहे. तसेच बलुचिस्तानमध्ये राहणाऱ्यांना हा स्वातंत्र्य दिन दणक्यात साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. फक्त आता जगाने या स्वातंत्र्य दिनाला मंजुरी द्यावी, अशी मागणी बलुचिस्तानकडून करण्यात आली आहे.

काही आठवड्यांपूर्वी बलुचिस्तानने स्वत:ला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं होतं. पण पाकिस्तानने ते नाकारलं होतं. त्यामुळे बलूच आंदोलनाचे नेते मीर यार बलोच यांनी आज थेट बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची तारीखच जाहीर केली आहे. जगभरात जिथेही बलूच समुदायाचे लोक राहत असतील त्यांनी 11 ऑगस्ट रोजी घर, बाजार, दुकान, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी बलुचिस्तानचा झेंडा फडकवण्याचं आवाहन मीर यार बलोच यांनी केलं आहे. 11 ऑगस्ट हा आम्ही बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिन साजरा करू, असं त्यांनी म्हटलंय.

11 ऑगस्टच का?

रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानने 11 ऑगस्टच हा दिवस का निवडला याचं कारण दिलं आहे. 11 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश शासन समाप्त झालं. त्या आधी बलुचिस्तानने स्वत:ला स्वतंत्र घोषित केलं होतं. त्यावेळीही पाकिस्तानातील कलात नावाच्या संस्थानाने बलुचिस्तानचं स्वातंत्र्य मान्य केलं होतं. पण नंतर दबावाने बलूचिस्तानला पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आलं. त्यावेळी बलुचिस्तान स्वतंत्र्य झाल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय मीडिया म्हणजे द न्यूयॉर्क टाइम्स सारख्या वृत्तपत्रात आली होती. ऑल इंडिया रेडियोवरही त्याचं वृत्त देण्यात आलं होतं. या ऐतिहासिक दाव्यांच्या आधारेच आण्ही 11 ऑगस्ट हा दिवस बलुचिस्तानचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे. सध्या जगातिक पातळीवर बलूचिस्तान पाकिस्तानचा हिस्सा मानला जात असला तरी, आम्ही मात्र वेगळे आहोत. आम्ही पाकिस्तानचा भाग नाहीये, असं रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानचं म्हणणं आहे.

आम्ही 6 कोटी बलूच नागरिक आहोत. आम्ही बलुचिस्तानचे नागरिक आहोत. आणि आम्ही आमचं संविधानही तयार केलं आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी आम्ही आमचं संविधान छापलं आहे. आम्ही आमचं संविधान अधिकृतपणे जगासमोर मांडलं आहे. बलूच नेते मीर यार बलूच यांनी हे संविधान तयार केलं आहे, असं बलुचिस्तानचं म्हणणं आहे. तर, संविधान लाखो शहिदांच्या रक्ताने लिहिलं गेलं आहे. पाकिस्तानने या शहिदांना गायब केलं होतं आणि त्यांचा छळ केला होता. संविधानामुळे बलुचिस्तान पाकिस्तानचा हिस्सा नसल्याचं स्पष्ट होतं आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष गणराज्य मानत आहोत. आम्ही आमची ब्लूप्रिंट याच आधारावर तयार केली आहे, असं सांगतानाच आमचं संविधान हे हिंदीत लिहिलं गेलं आहे. आम्ही धर्मनिरपेक्षतच्या नावावर हिंदूंच्या हक्कांचंही संरक्षण केलं आहे, असंही मीर यार बलूच यांनी सांगितलं.

संविधानात काय?

बलुचिस्तानच्या संविधानाच्या पहिल्या ओळीतच आम्ही धर्म आणि राजकारण यांना एकमेकांपासून वेगळं करत असल्याचं म्हटलं आहे. जिहाद आणि दहशतवादाची फॅक्ट्री चालवणाऱ्या पाकिस्तानची ही वैचारिक हार आहे.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांचं जगणं अत्यंत धोकादायक आहे. तर, बलुचिस्तानचं संविधान हिंदू, शीख आणि ख्रिस्ती समुदायांना पूर्ण सुरक्षा आणि समानतेची हमी देतो. या चार्टरमधून सर्वधर्म समभावाची पायाभरणी केली आहे. यातून पाकिस्तानच्या द्विराष्ट्रवादीच्या सिद्धांताला नाकारण्यात आलं आहे.

हे संविधान प्रमुख 11 भाषांमध्ये अनुवादित करण्यात आलं आहे. यात हिंदी, मराठी, गुजराती आणि पंजाबीचा समावेश आहे. वैश्विक मंचावर बलुचिस्तानची वाढती स्वीकार्हायता आणि पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर निघणाऱ्या लक्तरांचा पुरावा आहे.

Follow Us
रस्त्यावर ऑइल-चिखलाचा थर; 15 वाहनांची घसरगुंडी, नेमकं काय घडलं?
पुण्यात एकामागोमाग एक अपघात! रस्त्यावर ऑइल-चिखलाचा थर; 15 वाहनांची घसरगुंडी, नेमकं काय घडलं?
धनुष्यबाण कुणाचा? आज अंतिम लढत; सुप्रीम कोर्टात रंगणार युक्तिवाद
मोठी बातमी! धनुष्यबाण कुणाचा? आज अंतिम लढत; सुप्रीम कोर्टात पुन्हा रंगणार युक्तिवाद
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
Sunetra Pawar | निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे निर्देश; 26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते...
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानंतर...
ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! रायगडमध्ये ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत तब्बल 2000...
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!