
सध्या पाकिस्तान मोठ्या संकटाचा सामना करत आहे. पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला करून पाकला कायमची अद्दल घडवली आहे. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे. तर दुसरीकडे बलूचिस्तानने पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आहे. महागाई, उपासमार आणि विदेशातून कर्ज घेणं या गोष्टी पाकिस्तानसाठी आधीच आव्हान ठरलेल्या आहेत. पण आता समोर असलेलं संकट त्याही पेक्षा मोठं आहे. 1971 नंतर पुन्हा एकदा देशाचे तुकडे होण्याचं संकट पाकवर आलं आहे. बलूच लीडर मीर यार बलोच यांनी बुधवारी पाकिस्तानपासून बलूचिस्तान वेगळं झाल्याची औपचारिक घोषणा केली. अनेक दशकांपासून सुरू असलेली हिंसा, बलूच नागरिकांचं अपहरण आणि मनावाधिकाराच्या उल्लंघनामुळेच आम्ही पाकिस्तानपासून स्वतंत्र होत असल्याचं मीर यार बलोच यांनी म्हटलं आहे. एक्सवर एक पोस्ट करून मीर बलोच यांनी ही घोषणा केली आहे. बलूचिस्तानच्या लोकांनी राष्ट्रीय निर्णय घेतल आहे. आता जगानेही मौन धारण करू नये, असं सांगतानाच मीर...