AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्र मित्र म्हणत बांगलादेशने दिला थेट भारताचा झटका, ज्याचा विचारही केल नाही तेच..

Bangladesh India Relation : भारताला मोठा दणका बांगलादेशाकडून देण्यात आला. बांगलादेशाने थेट पाकिस्तानचा हात पकडला आहे. ज्याने एकच मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच बांगलादेशाने उचललेल्या एका पाऊलामुळे संबंध अधिकच तणावात आहेत.

मित्र मित्र म्हणत बांगलादेशने दिला थेट भारताचा झटका, ज्याचा विचारही केल नाही तेच..
Bangladesh
| Updated on: May 25, 2026 | 1:27 PM
Share

भारत आणि बांगलादेशाचे संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणल्याचे बघायला मिळतंय. प्रत्येक वेळी भारताने बांगलादेशची मदत केली. इराण आणि अमेरिका युद्धात भारताने बांगलादेशची मदत करत बांगलादेशला एलपीजी गॅसचा पुरवठा केला. त्यामध्येच आता पाकिस्तानने भारताला मोठा दणका दिला. पहिल्यांदाच बांगलादेशने आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला पाठवण्यास सुरुवात केली आहे. हा एक मोठा बदल असून, याचा अर्थ असा होईल की, येत्या काही वर्षांत बांगलादेशी अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर पाकिस्तानी प्रभाव अधिकाधिक दिसून येत आहे. यापूर्वी बांगलादेश आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी भारतातील मसुरी येथे पाठवत. दोन्ही देशांमधील हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम होत आहे. हा भारतासाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल.

नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, अगोदरच भिकेला लागलेला पाकिस्तानच हा प्रशिक्षणाचा खर्च उचलत आहे. एका अतिरिक्त सचिवासह एकून 11 सहसचिव, बांगलादेश सरकारमधील 12 अधिकारी या प्रशिक्षणाकरिता गेले होते. लाहोरच्या नागरी सेवा अकादमीत पाठवण्यात आले होते. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील जवळीकता भारताकरिता डोकेदुखी ठरत आहे.

शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर, मुहम्मद युनूस यांनी पाकिस्तानसोबत अधिक चांगले संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे ढाका दौरे पुन्हा सुरू झाले आहेत. ढाका आणि कराची थेट विमानसेवा देखील पुन्हा सुरू करण्यात आली. तिथेच दोन्ही देशांचे संबंध किती जास्त सुधारले आहेत, हे स्पष्ट कळत आहे. बांगलादेशच्या या पावलाने पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात आली आहेत.

बांगलादेश आणि भारत यांच्यात गंगा नदीच्या पाण्याबाबत करार होणे बाकी आहे. हा करार याच वर्षी सप्टेंबर महिन्यात संपत आहे. करार पूर्ण होण्यापूर्वीच बांगलादेश भारतासोबत पंगे घेताना दिसत आहे. यामुळे आता हा करारात नक्की काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. हेच नाही तर पाकिस्तानकडून लढाऊ विमाने खरेदी करण्याकरिता बांगलादेशाकडून पाऊले उचलली जात आहेत. तशी चर्चाही दोन्ही देशांमध्ये सुरू आहे.

Follow Us
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....
महाराष्ट्र हादरलं! रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 अपघातांत 17 जणांचा
महाराष्ट्र हादरलं! रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 अपघातांत 17 जणांचा.
10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; पेट्रोल-डिझेलने गाठला उच्चांक, नविन दर काय
10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; पेट्रोल-डिझेलने गाठला उच्चांक, नविन दर काय.
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक.
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय......
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते......
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?.