AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्र मित्र म्हणत बांगलादेशने दिला थेट भारताचा झटका, ज्याचा विचारही केल नाही तेच..

Bangladesh India Relation : भारताला मोठा दणका बांगलादेशाकडून देण्यात आला. बांगलादेशाने थेट पाकिस्तानचा हात पकडला आहे. ज्याने एकच मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच बांगलादेशाने उचललेल्या एका पाऊलामुळे संबंध अधिकच तणावात आहेत.

मित्र मित्र म्हणत बांगलादेशने दिला थेट भारताचा झटका, ज्याचा विचारही केल नाही तेच..
Bangladesh
| Updated on: May 25, 2026 | 1:27 PM
Share

भारत आणि बांगलादेशाचे संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणल्याचे बघायला मिळतंय. प्रत्येक वेळी भारताने बांगलादेशची मदत केली. इराण आणि अमेरिका युद्धात भारताने बांगलादेशची मदत करत बांगलादेशला एलपीजी गॅसचा पुरवठा केला. त्यामध्येच आता पाकिस्तानने भारताला मोठा दणका दिला. पहिल्यांदाच बांगलादेशने आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला पाठवण्यास सुरुवात केली आहे. हा एक मोठा बदल असून, याचा अर्थ असा होईल की, येत्या काही वर्षांत बांगलादेशी अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर पाकिस्तानी प्रभाव अधिकाधिक दिसून येत आहे. यापूर्वी बांगलादेश आपल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी भारतातील मसुरी येथे पाठवत. दोन्ही देशांमधील हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम होत आहे. हा भारतासाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल.

नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, अगोदरच भिकेला लागलेला पाकिस्तानच हा प्रशिक्षणाचा खर्च उचलत आहे. एका अतिरिक्त सचिवासह एकून 11 सहसचिव, बांगलादेश सरकारमधील 12 अधिकारी या प्रशिक्षणाकरिता गेले होते. लाहोरच्या नागरी सेवा अकादमीत पाठवण्यात आले होते. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील जवळीकता भारताकरिता डोकेदुखी ठरत आहे.

शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर, मुहम्मद युनूस यांनी पाकिस्तानसोबत अधिक चांगले संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे ढाका दौरे पुन्हा सुरू झाले आहेत. ढाका आणि कराची थेट विमानसेवा देखील पुन्हा सुरू करण्यात आली. तिथेच दोन्ही देशांचे संबंध किती जास्त सुधारले आहेत, हे स्पष्ट कळत आहे. बांगलादेशच्या या पावलाने पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात आली आहेत.

बांगलादेश आणि भारत यांच्यात गंगा नदीच्या पाण्याबाबत करार होणे बाकी आहे. हा करार याच वर्षी सप्टेंबर महिन्यात संपत आहे. करार पूर्ण होण्यापूर्वीच बांगलादेश भारतासोबत पंगे घेताना दिसत आहे. यामुळे आता हा करारात नक्की काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. हेच नाही तर पाकिस्तानकडून लढाऊ विमाने खरेदी करण्याकरिता बांगलादेशाकडून पाऊले उचलली जात आहेत. तशी चर्चाही दोन्ही देशांमध्ये सुरू आहे.

Follow Us
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक