AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : चीनचा कांगावा सुरुच, गलवान खोऱ्यातील व्हिडीओ शेअर करत भारतावर घुसखोरीचा आरोप

चीनच्या माध्यमांमध्ये भारतीय सैनिकांवर आरोप करणारा कथित व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. India China face off border site video

Video : चीनचा कांगावा सुरुच, गलवान खोऱ्यातील व्हिडीओ शेअर करत भारतावर घुसखोरीचा आरोप
चीनचा कांगावा अद्यापही सुरुच
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Feb 20, 2021 | 10:58 AM
Share

नवी दिल्ली: भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान 2020 च्या जून महिन्यातील गलवान खोऱ्यामध्ये झटापट झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर, चीननं काही दिवसांपूर्वी त्यांचे 4 जवान मारले गेल्याचं मान्य केलं होते. दोन्ही देशांमधील तणाव वाढल्यानंतर चर्चेच्या फेऱ्या सुरु करण्यात आल्या होत्या. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु असताना चीनच्या माध्यमांमध्ये भारतीय सैनिकांवर आरोप करणारा कथित व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.यामध्ये भारताचं सैन्य चीनच्या हद्दीत घुसल्याचा दावा करण्यात आलाय. (China released Galwan Valley India China face off border site video)

चीनच्या सरकारी मीडियाकडून व्हिडीओ जारी

चीनमधील सरकारी माध्यमांनी जारी केलेला व्हिडीओ गलवान खोऱ्यातील असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय सैन्य चीनच्या हद्दीत जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका बाजूला दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा तर दुसरीकडे व्हिडीओ जारी करणं यामुळे चीनच्या कपटी खेळ्या समोर येत आहेत.

चीनच्या सरकारी माध्यमांनी जारी केलेला व्हिडीओ

4 सैनिक मारले गेल्याचं मान्य

गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झटापट झाली होती. त्यामध्ये त्यांचे 4 सैनिक मारले गेल्याचं तब्बल 9 महिन्यानंतर मान्य गेले होते. चीनमधील ग्लोबल टाईम्सनं याबाबत वृत्त दिलं होते. पब्लिक लिबरेशन आर्मीच्या क्यूई फबाओ, चेन होंगून, जियान गॉन्ग, जिओ सियुआन या चिनी सैनिकांनी जीव गमावल्याचं चीननं मान्य केले होते.अमेरिकेच्या एका गुप्त अहवालात या हाणामारीत चीनचे 40 सैनिक मारले गेल्याचं म्हटलं होतं. मात्र, नऊ महिन्यानंतर चीनने या हल्ल्यात केवळ चारच जण मारले गेल्याचं म्हटलं आहे.

45 वर्षात पहिल्यांदाच सीमेवर संघर्ष

मेच्या सुरुवातीलाच चीनच्या सैनिकांनी नियंत्रण रेषेवर जमावजमव सुरू केली होती. त्यामुळे भारतीय जवान सतर्क झाले होते. चीनच्या या आक्रमक पावित्र्यामुळे दोन्ही देशाच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्याचा परिणाम म्हणजे 15 जूनच्या मध्यरात्री दोन्ही सैनिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. गलवान खोऱ्यातीही ही धुमश्चक्री म्हणजे गेल्या 45 वर्षातील दोन्ही देशांमधील अत्यंत भयंकर संघर्ष होता. या हाणामारीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर चीनचे सैनिकही मोठ्या प्रमाणावर मारले गेले होते. मात्र, चीनने त्याला पृष्टी दिली नव्हती.

संबंधित बातम्या:

गलवान खोऱ्यात चार सैनिक मारले गेले, चीनने वर्षभरानंतर दिली कबुली

चीनमध्ये ‘भरपेट’ खाणाऱ्यांना दणका, अतिखादाडांना 1 लाखांचा दंड, नवा कायदा लागू(Opens in a new browser tab)

(China released Galwan Valley India China face off border site video)

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी