AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India China face off : गलवान संघर्षावर भेकड चिनी प्रवक्त्यांचा नवा दावा

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षावर चीनने पुन्हा एकदा भारतालाच दोषी ठरवलं आहे (Chinese foreign ministry allegestions on indian troops).

India China face off : गलवान संघर्षावर भेकड चिनी प्रवक्त्यांचा नवा दावा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 18, 2020 | 5:24 PM
Share

मुंबई : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षावर चीनने पुन्हा एकदा भारतालाच दोषी ठरवलं आहे (Chinese foreign ministry allegestions on indian troops). गलवान संघर्षावर चीनकडून वारंवार वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. या सर्व दाव्यांमध्ये भारतालाच दोषी ठरवलं जात आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी आज ट्विटरवर आपली प्रतिक्रिया जारी करत भारताने चिनी सैन्याला कमी लेखू नये, असा इशारा दिला आहे (Chinese foreign ministry allegestions on indian troops).

“भारतीय सैनिकांनी वास्तविक नियंत्रण रेषा पार करत नियमांचं उल्लंघन केलं. याशिवाय त्यांनी चिनी सैनिक आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. भारताने वस्तुस्थितीचा चुकीचा अर्थ काढू नये. याशिवाय भारताने चिनी सेनेला कमी लेखू नये”, असं हुआ चुनयिंग म्हणाल्या आहेत.

भारत-चीन संघर्षावर चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते झाओ लिजैन यांनीदेखील काल (17 जून) भारताला दोषी ठरवलं होतं. “गलवान आमचंच आहे, भारतानं सैन्याला शिस्तीत ठेवावं आणि भारतानं रुळावर यावं”, असं झाओ लिजैन म्हणाले होते. त्यापोठोपाठ आज हुआ चुनयिंग यांनी भारताला दोषी ठरवलं. दरम्यान, परिस्थिती शांत करण्यासाठी दोन्ही देश तयार असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केली आहे.

या संघर्षावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला दोषी ठरवलं आहे. चीनने नियोजन करुन ही घटना घडवून आणली, असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. याप्रकरणी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवर बोलून त्यांची कानउघाडणी केली.

जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान मोदी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यांनी चीनला भारत जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं ठणकावून सांगितलं. “भारताचे वीर जवान लढता लढता शहीद झाले आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान तर आहेच, पण हे बलिदान व्यर्थ जाणार नाही”, असं मोदी म्हणाले. याशिवाय भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं म्हटलं आहे.

संबंधित बातमी :

India-China Face Off | लडाखमध्ये 3 इन्फन्ट्री तैनात, हिमाचलमध्येही अतिरिक्त तुकडी, चिनी संघर्षानंतर सीमेवर भारताचे किती सैन्य?

गलवान आमचंच, भारताने रुळावर यावं, चीनची गुर्मी कायम

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा