AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील घटता जन्मदर अत्यंत चिंतेचा, एलॉन मस्क यांनी व्यक्त केली भीती, मागील वर्षात..

स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी भारतातील कमी झालेला जन्मदर याबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. त्यामध्येच आता जन्मदर मागील काही वर्षांपासून कमी होताना दिसत आहे.

भारतातील घटता जन्मदर अत्यंत चिंतेचा, एलॉन मस्क यांनी व्यक्त केली भीती, मागील वर्षात..
Elon Musk
| Updated on: Jun 07, 2026 | 10:00 AM
Share

स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी नुकताच भारताबाबत अत्यंत मोठी चिंता व्यक्त केली. भारतातील जन्मदर घटला असून तो चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले. एलॉन मस्क यांनी म्हटले की, भारतातील जन्मदर घटला आहे. तो प्रतिस्थापन तापळीवर खाली गेला. ही अशी पातळी आहे जिथे लोकसंख्या वाढतही नाही आणि घटतही नाही. मस्क यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, भारताचा जन्मदर प्रतिस्थापन पातळीच्या खाली घसरला आहे. यादरम्यान त्यांनी आकडेवारीचा हवाला दिला. ज्यात देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचा प्रजनन दर प्रतिस्थापन पातळीच्या खाली घसल्याचे दर्शवण्यात आले. एकूण प्रजनन दर (TFR) केवळ एका दशकात 2.3 वरून 1.9 पर्यंत घसरला आहे. आजच्या घडीला दिल्लीचा प्रजनन दर हा फिनलंडपेक्षाही कमी आहे. दिल्लीचा प्रजनन दर हा 1.2 आहे.

एएफ पोस्टने ‘द इकॉनॉमिस्ट’मधील 4 जूनच्या भारताची लोकसंख्या लवकरच घटायला सुरुवात होईल, याबाबत लेख दिला होता. एलॉन मस्क यांनी या गोष्टीकडे आता जगाचे लक्ष वेधले आहे. कमी झालेल्या प्रजनन दराबाबत एलॉन मस्क यांनी चिंता व्यक्त केली. भारताची सध्याची लोकसंख्या ही 1.46 अरबापेक्षाही जास्त आहे. 2023 मध्येच भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकले.

2023 मध्येच भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला. यूएनएफपीएच्या रिपोर्टनुसार, भारतात प्रत्येक वर्षी जन्मदर कमी होत आहे. भारत सरकारने लोकसंख्या कमी करण्याकरिता मोठे प्रयत्न केले. हेच नाही तर लहान कुटुंब असल्याचे फायदेही सांगितले जात होते. भारताला कोणत्याही पद्धतीने लोकसंख्या नियंत्रणात आणणे महत्नाचे होते. त्यामध्येच आता जन्मदर कमी झाल्याचे पुढे येत आहे.

रिपोर्टनुसार, भारतात ज्या पद्धतीने मुले जन्मण्याची संख्या कमी होत आहे ते चांगले संकेत नाहीत. जर स्थिती अशीच राहिली तर देशात वयस्कर लोकांची संख्या अधिक होईल आणि तरूणांची संख्या कमी होईल. याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. जर मुलांचा जन्माचा दर कमी होत राहिला तर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक