AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज खाडीत भारताचा मोठा विजय, थेट अत्यंत आनंदाची बातमी, होर्मुजची सामुद्रधुनी दोन…

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. इराणकडून थेट या युद्धादरम्यान होर्मुज खाडी बंद करण्याचा निर्णय घेतला. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठी समस्या निर्माण झाली. यादरम्यानच भारतासाठी आनंदाची बातमी होर्मुज खाडीतून येत आहे.

होर्मुज खाडीत भारताचा मोठा विजय, थेट अत्यंत आनंदाची बातमी, होर्मुजची सामुद्रधुनी दोन...
Hormuz Gulf India ship
| Updated on: Mar 21, 2026 | 8:53 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यानंतर इराण पेटून उठला आणि ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे हल्ले केले. त्यांची रडार सिस्टम इराणच्या निशाण्यावर होती. कोणालाही वाटले नव्हते की, या युद्धात इतक्या खतरनाक पद्धतीने इराण मैदानात उतरेल. अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते ठार झाले. त्यानंतर इराण अधिक घातक बनला. अमेरिकेने अनेक धमक्या देऊनही इराणकडून होर्मुज खाडी खुली करण्यात आली नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशांत कच्च्या तेलाची आणि गॅसची आणीबाणी लागू झाली. भारतातही एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. होर्मुज खाडी सुरक्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, इराणचा पूर्ण ताबा या खाडीत आहे.

समुद्राद्वारे वाहतूक होणाऱ्या जगातील एकूण तेल आणि वायूपैकी सुमारे 20 टक्के वाहतूक केवळ एकाच मार्गातून होते तो म्हणजे होर्मुजची सामुद्रधुनी. ही होर्मुजची खाडीच बंद असल्याने जगातील अनेक देशांची झोप उडाली. यादरम्यान भारताला मोठे यश मिळाले. होर्मुज खाडीत मोठा जाम लागलेल्या असताना भारताचे जहाज इराणकडून सोडली जात आहेत. भारतीय जहाजांना परवानगी दिली जात आहे.

ज्या जहाला परवानगी नाही, असे जहाज तिथून जात असेल तर थेट इराण त्या जहाला आग लावून देत आहे. आता भारतासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. थेट होर्मुज खाडीतून भारताचे अजून दोन जहाज सुरक्षित निघणार आहेत. यामुळे एलपीजी गॅसचे संकट कमी होण्याची शक्यता आहे. सध्या देशात व्यावसायिक सिलेंडरचे वितरण बंद करण्यात आले.

होर्मुज खाडीत भारताचे 22 जहाज अडकून पडले आहेत. ते जहाज ना पुढे येऊ शकत आहेत ना मागे जाऊ शकत आहेत. यापैकी दोन जहाजे विशेषतः चर्चेत आहेत. पाइन गॅस आईओसी जे इंडियन ऑइलने भाड्याने घेतले आहे. जग वसंत, जे बीपीसीएलने भाड्याने घेतले आहे. हे दोन्ही एलपीजी टॅंकर आहेत. हे दोन्ही जहाज होर्मुज खाडीतून निघणार असल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....