AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्या शेजारील देशात भीषण गृहयुद्ध, उठाव दडपण्यासाठी आकाशातून पॅरामोटरद्वारे नागरिकांवर हल्ले

गृहयुद्धात नागरिक आणि विरोधकांवर हल्ला करण्यासाठी म्यानमारच्या लष्कराने पॅरामोटर्स आणि जायरोकॉप्टर सारख्या कमी दर्जाच्या उड्डाण यंत्रांचा वापर केला आहे.

आपल्या शेजारील देशात भीषण गृहयुद्ध, उठाव दडपण्यासाठी आकाशातून पॅरामोटरद्वारे नागरिकांवर हल्ले
aerial bombing attacks
| Updated on: Jan 26, 2026 | 10:41 PM
Share

आपला शेजारील देश म्यानमार म्हणजे ब्रह्मदेशातील गृहयुद्धाने घातक वळण घेतले आहे. सोमावारी जारी झालेल्या एका बातमीनुसार ब्रह्मदेशातील लष्करी राजवटीने ( जुंटा ) आता नागरिकांवर आणि सरकार विरोधी ताकदींवर आकाशा हल्ला करण्यासाठी आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी पॅरामोटर आणि जायरोकाप्टर सारख्या कमी तांत्रिक फ्लाईंग मशीनींचा वापर विरोधकांवर हल्ला करण्यासाठी केला आहे. यामुळे आकाशात अचानक गोळ्यांचा वर्षाव केला जात असून त्यात अनेक जण ठार होत आहे. या विषयी मानवी अधिकार संघटना ‘फोर्टिफाय राईट्स’ने सैन्य या मशीनद्वारे अक्षरश: मृत्यू बरसवत असल्याची टीका केली आहे.

हल्ल्याचा नवा प्रकार

सायलेंट किलींग पॅरामोटर वास्तविक एक पॅराग्लायडर असून याच्या मागच्या बाजूला एक प्रोपेलर लावलेला असतो. तर जायरोकाप्टर एक छोटे दोन आसनी विमान असते ज्यात हेलिकॉप्टरसारखे फिरणारे पंखे असतात.हल्ल्याच्या वेळी हे पॅरामोटर चालक नेहमी आपले इंजिन बंद करतात आणि लक्ष्याच्या जवळ गेल्यानंतर गुपचुप ग्लाईड करत खाली येतात. जमीनीवर आंदोलकांना याचा पत्ता लागण्याच्या आधीच बेसावध असलेल्या लोकांवर बॉम्बचा वर्षाव याद्वारे केला जात आहे. फोर्टिफाय राईट्सचे सदस्य चिट सेंग यांनी सांगितले की लष्कराने नागरिकांना ठार करण्यासाठी हा नवा आणि स्वस्तातला प्रकार शोधला आहे.

आतापर्यंत या यादवी युद्धात डिसेंबर २०२४ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान नागरिकांवर पॅरामोटर आणि जायरोकाप्टरद्वारे ३०४ घातक हल्ले करण्यात आले आहेत. सर्वात घातक हल्ला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सगाईंग क्षेत्रात झाला होता. येथे एका पॅरामोटरने मेणबत्ती मोर्चा काढणाऱ्या जमावावर दोन बॉम्ब गोळे डागले. त्यात किमान २४ जण ठार झाले होते.

सगाईंग येथील एका हॉस्पिटलवर जायरोकाप्टरने हल्ला केला होता. त्यात मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि दोन अन्य स्टाफचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये सत्तापालट झाल्यानंतर ब्रह्मदेशात हिंसा सुरुच असून यात आतापर्यंत ७,७०० हून अधिक लोक ठार झाले आहेत. मात्र, लष्कराने (तातमाडा) हा दावा नेहमीच नाकारला असून नागरिकांची दमनशाही सुरुच आहे.

या उपकरणांचा धोरणात्मक दृष्ट्या लष्कराला फायदा होत आहे. कारण ही यंत्रणा स्वस्त असून तिला चालवण्यासाठी जास्त प्रशिक्षणाची गरज नसते. ही स्वस्त उपकरणे कोणत्याही मोकळ्या मैदानातून उडवता येतात असे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे विश्लेषक मॉर्गन मायकेल्स यांनी म्हटले आहे.

हे देश ब्रह्मदेशाला लष्करी उपकरणे पुरवितात

विरोधी दलांकडे जेथे घातक शस्त्रे नाहीत त्या भागात या उपकरणाचा लष्कर सरार्स वापर करत आहे. यामुळे लष्कराला आता देशाच्या सीमावर्ती भागांचे रक्षण करण्यासाठी महागडे लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर राखीव ठेवता येतात. चीन आणि रशियासारखे देश ब्रह्मदेशाला लष्करी उपकरणे पुरवित असताना, जगभरातील अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध लादलेले आहेत. मात्र, पॅरामोटर्ससारख्या “दुहेरी वापराच्या” व्यावसायिक उपकरणांना आळा घालणे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी एक मोठे आव्हान बनले आहे.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय