AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saudi Arabia Accident : मोठी बातमी, सौदी अरेबियात भीषण अपघात, 42 भारतीयांचा मृत्यू

Saudi Arabia Accident : सौदी अरेबियात मोठी दुर्घटना झाली आहे. यात भारतीयांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व तीर्थयात्री उमराह अदा करण्यासाठी गेले होते. मक्का येथे धार्मिक अनुष्ठान पूर्ण केल्यानंतर ते मदीना येथे चाललेले. याच दरम्यान हा अपघात झाला.

Saudi Arabia Accident : मोठी बातमी, सौदी अरेबियात भीषण अपघात, 42 भारतीयांचा मृत्यू
Saudi Arabia Bus Accident
| Updated on: Nov 17, 2025 | 11:42 AM
Share

सौदी अरेबियात मोठी दुर्घटना झाली आहे. कमीत कमी 42 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व भारतीय उमरासाठी सौदीला गेले होते. सोमवारी सकाळी हे भारतीय बसमधून मक्का येथून मदीना येथे चाललेले. त्याचवेळी बसची डिझेल टँकर बरोबर धडक झाली. प्राथमिक रिपोर्टनुसार हा अपघात IST वेळेनुसार जवळपास 1:30 च्या सुमारास मुफरिहात जवळ झाला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. ते सर्व हैदराबाद आणि तेलंगणचे रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्यावेळी बसमध्ये जवळपास 20 महिला आणि 11 लहान मुलं होती.

हे सर्व तीर्थयात्री उमराह अदा करण्यासाठी गेले होते. मक्का येथे धार्मिक अनुष्ठान पूर्ण केल्यानंतर ते मदीना येथे चाललेले. याच दरम्यान हा अपघात झाला. अपघात घडला त्यावेळी प्रवासी बसमध्ये गाढ झोपेत होते. स्थानिक सूत्रांनी 42 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टि केली आहे. आपातकालीन मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी अपघाताबद्दल काय माहिती दिली?

सौदी अरेबियातील या बस दुर्घटनेवर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितलं की, “मक्क्याहून ही बस मदीना येथे चालली होती. 42 तीर्थयात्री असलेल्या या बसला आग लागली. मी रियाद येथील भारतीय दूतावासाचे उपमुख्य मिशनरी अबू माथेन जॉर्ज यांच्याशी बोललो आहे. या घटनेची माहिती घेण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे”

डॉ. एस. जयशंकर यांना काय विनंती ?

“मी हैदराबाद येथील दोन ट्रॅव्हल एजन्सीशी संपर्क साधला. प्रवाशांची माहिती रियाद दूतावास आणि परराष्ट्र सचिवांना दिली. मी केंद्र सरकार खासकरुन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना विनंती करतो की, अपघातग्रस्तांचे मृतदेह भारतात आणावेत. जर, कोणी जखमी असेल तर त्यांना चांगले उपचार मिळाले पाहिजेत” असं खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिला?

तेलंगणचे मुख्यमंत्री ए.रेवंत रेड्डी यांनी बस दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकारी यात मुख्य सचिव (CS) आणि डीजीपी यांना केंद्र आणि सौदी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा आणि आवश्यक मदत उपलब्ध करुन देण्याचा आदेश दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन सीएस रामकृष्ण राव यांनी दिल्लीत उपस्थित रेजिडेंट कमिश्नर गौरव उप्पल यांना सतर्क केलं. राज्यातील किती लोक या अपघातग्रस्त वाहनात होते, त्याची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. सचिवालयात एक कंट्रोल रुमही स्थापित करण्यात आला आहे असं तेलंगण CMO ने म्हटलं आहे.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.