‘या’ देशाच्या चलनापुढे डॉलर फेल, एका दिनारसाठी मोजावे लागतात 247 भारतीय रूपये
बहरीन दिनार हे जगातील सर्वात मजबूत चलनांपैकी एक आहे आणि त्याचे मूल्य भारतीय चलनापेक्षा खूपच जास्त आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या देशातील 1 हजार कमवल्यावर भारतात त्यांचे मुल्य किती होते ते जाणून घेऊयात.

बहरीन हे असं एक देश आहे जिथे त्यांच्या चलनाचे मुल्य एकदम मजबूत आहे. बहरीनी दिनार (BHD)या बहरीन चलनाच्या आर्थिक मजबूती मुळे जगभरात लक्ष वेधून घेते. अनेक अर्थव्यवस्थांमध्ये चढ-उतार होत असताना, बहरीनी दिनार जगातील सर्वात महागड्या चलनांच्या यादीत सातत्याने अव्वल स्थानावर आहे. भारतासारख्या देशातील लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की बहरीनी दिनार इतके मौल्यवान का आहे आणि तिथे काम करणाऱ्यांना कोणते फायदे मिळतात. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.
अहवालानुसार, 1 बहरीनी दिनार (BHD) हे अंदाजे 239 रुपयांच्या समतुल्य आहे. जर एका भारतीयाने बहरीनमध्ये 1 हजार बहरीन दिनार कमवले तर भारतीय चलनानुसार त्याचे 2,39,232 रुपये होतात. यामुळे बहरीन हे देश भारतीय कामगार, अभियंते, डॉक्टर, आयटी व्यावसायिक आणि आर्थिक तज्ञांसाठी एक प्रमुख आकर्षण बनले आहे. बहरीनी दिनारची ताकद केवळ तेलाच्या उत्पन्नावर आधारित नाही तर त्याच्या स्थिर आर्थिक रचनेवर आणि पारदर्शक आर्थिक व्यवस्थेवर देखील आधारित आहे.
बहरीनची अर्थव्यवस्था इतकी मजबूत का आहे?
बहरीनला दीर्घकाळ तेलावर आधारित अर्थव्यवस्था मानली जात होती, परंतु काळ बदलत असताना, देशाने त्यांच्या आर्थिक रचनेचे आधुनिकीकरण आणि वैविध्यपूर्णीकरण केले. आज, बहरीनला आखाती प्रदेशाचे आर्थिक केंद्र मानले जाते, ज्याचे बँकिंग क्षेत्र आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अत्यंत पारदर्शक आणि विश्वासार्ह आहे.
बहरीनमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे.
सरकारी वेबसाइटनुसार बहरीनमध्ये अंदाजे 3,20,000 भारतीय राहतात, जे देशाच्या कामगार बाजारपेठेत महत्त्वपूर्ण योगदान देतात. हे भारतीय प्रामुख्याने बांधकाम आणि अभियांत्रिकी, बँकिंग आणि वित्त, आयटी आणि तंत्रज्ञान, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, शिक्षण आणि रुग्णालये आणि व्यवसाय आणि व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात काम करतात. बहरीन सरकार भारतीय समुदायाला केवळ रोजगाराच्या संधीच देत नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य देखील प्रदान करते. मंदिरे, गुरुद्वारा, शाळा आणि सांस्कृतिक केंद्रे येथे मुक्तपणे कार्यरत आहेत, ज्यामुळे भारतीयांना नेहमीच सांस्कृतिक संबंधाची भावना जाणवते.
