Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…ची शेपूट वाकडीच, बलूचिस्तान ट्रेन हायजॅक प्रकरणात भारताचा हात, खोटारड्या पाकिस्तानचे रडगाणे

Pakistan Train Hijack : दहशतवाद आणि दहशतवादी फॅक्टरी असणाऱ्या पाकिस्तानची शेपटी वाकडीच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. काल झालेल्या ट्रेन हायजॅकमागे भारताचा हात असल्याचा दावा खोटारड्या पाकिस्तानने केला आहे.

...ची शेपूट वाकडीच, बलूचिस्तान ट्रेन हायजॅक प्रकरणात भारताचा हात, खोटारड्या पाकिस्तानचे रडगाणे
पाकिस्तानचा नवा रडीचा डावImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 12, 2025 | 4:48 PM

दहशतवादी आणि दहशतवादाचे माहेरघर पाकिस्तान असल्याचे जगजाहीर आहे. आतापर्यंत जे दहशतवादी पाकिस्तानने पोसले. त्यातील काही आता त्यांच्या जीवावर उठले आहेत. त्यातच स्वतंत्र बलूचिस्तान आणि स्वतंत्र पंजाब-सिंध ही मागणी 70 वर्षांपासून सुरू आहे. या दोन्ही भागातील लोकांना स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा हवा आहे. मंगळवारी बलूचिस्तानमधील बंडखोर बलोच लिबरेशन आर्मीने (BLA) जफर एक्सप्रेस हायजॅक केली. पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावली. या ट्रेनमध्ये 400 हून अधिक प्रवाशी आणि सैन्य कर्मचारी होती. ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराने 155 प्रवाशांची सुटका केली आहे. या कारवाईत लष्काराचे काही जवान आणि 27 बंडखोर मारल्या गेले. ट्रेन हायजॅकमागे भारत आणि अफगाणिस्तानचा हात असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. अर्थात पाकिस्तान किती खोटारडा आहे हे जागतिक मंचावर अनेकदा उघड झाले आहे.

पंतप्रधानांच्या सल्लागाराचा कांगावा

पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी कोणताही पुरावा न देता या हल्ल्यामागे भारत आणि अफगाणिस्तान असल्याचा कांगावा केला आहे. आपल्या गुप्तहेर खात्याचे अपयश झाकण्यासाठी पाकिस्तान आता खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न करत आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सनाउल्लाह यांनी या हल्ल्यामागे तहरीक-ए-तालिबान ही संघटना असल्याचे म्हटले आहे. ही संघटना बलूच आर्मीला रसद पुरवत असल्याचे सनउल्लाहचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा

हे सर्व भारत घडवून आणत आहे, यात कोणतीच शंका नाही. भारत सर्व प्रकारची मदत करत आहे आणि अफगाणिस्तानमध्ये या बंडखोरांना सुरक्षित आश्रय मिळत आहे. तिथे बसूनच अशा हल्ल्याचे प्लॅनिंग करण्यात येते. बलोच बंडखोरांकडे कोणताही राजकीय अजेंडा नाही. त्यांना केवळ लोकांच्या हत्या घडवून आणायच्या आहेत, असे बेताल वक्तव्य सनउल्लाह यांनी केले. पाकिस्तानी लष्कर बलूचमधील महिला, मुलं, तरुणांवर किती अत्याचार करते हे सांगायला या सनउल्लाहची जीभ रेटत नाही. पण हल्ला झाला की भारताकडे बोट दाखवून मोकळं होण्याचा एककलमी कार्यक्रम पाकिस्तानकडून सुरू असल्याचे समोर आले आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्यापासून पाकिस्तानमध्ये अस्थिरता वाढल्याचा आरोप सनउल्लाह यांनी म्हटले आहे. पूर्वी बंडखोरांना रसद, प्रशिक्षण आणि दारूगोळा मिळत नव्हता. पण आता त्यांना या सर्व सुविधा मिळत असल्याचे ते म्हणाले. या बंडखोरीच्या तावडीतून ओलिसांना सोडवण्याचे काम सुरू आहे. पण बंडखोरांनी काही सुसाईड बॉम्बर्स त्यांच्या जवळ बसवल्याने कारवाई करता येत नसल्याची माहिती सनउल्लाह यांनी दिली.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.