AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने भारताकडे मागितली थेट भीक, भारताने फटकारले, संयुक्त राष्ट्राच्या..

पाकिस्तानला भारताकडून चांगलाच मोठा दणका देण्यात आला. विशेष म्हणजे भारताने जागतिक मंचावर पाकिस्तानचा बुरखा फाडला. भर कार्यक्रमात भारताने पाकला सळो की पळो करून सोडले. पाकिस्तान फक्त पाणी पाणी करत या कार्यक्रमात राहिले.

पाकिस्तानने भारताकडे मागितली थेट भीक, भारताने फटकारले, संयुक्त राष्ट्राच्या..
Indus Water Treaty
| Updated on: Mar 20, 2026 | 10:44 AM
Share

भारत आणि पाकिस्तानचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावात आहेत. पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी कारवाया केल्या जातात. पाकिस्तानातून दहशतवादी भारतात घुसखोरी करतात आणि मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणतात. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानकडून याला थेट नकार दिला जातो. आतापर्यंत भारताने अनेक पुरावेही याबाबतचे सादर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधून आलेल्या दहशतनाद्यांनी मोठा हल्ला पहलगाममध्ये केला. यावेळी हिंदू पर्यटक दहशताद्यांच्या निशाण्यावर होते. धक्कादायक बाब म्हणजे थेट धर्म विचारून गोळीबार करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओही पुढे आले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात मोठा संताप बघायला मिळाला. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात होती. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून थेट मोठा हल्ला केला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ववस्थ केली.

यादरम्यानच भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याकरिता पाकिस्तानमध्ये जाणारे पाणीही रोखले. आता पाकिस्तान पाण्यासाठी तरसल्याचे बघायला मिळत आहे. भारताने सिंधू जल करार रद्द केल्यापासून पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानकडून वारंवार सिंधू जल करार नर्संचयित करण्याचे आवाहन केले जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये पाकिस्तानकडून याबाबत विनवणी करण्यात आली.

बैठकीदरम्यान पाकिस्तानकडून सिंधू जल करार निलंबनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी भारताने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले. भारताने यादरम्यान अगदी स्पष्ट शब्दात सांगितले की, जोपर्यत दहशतवादाचे जागतिक केंद्र असलेला पााकिस्तान आपली भूमिका बदल नाही, तोपर्यत सिधू जल करार निलंबितच राहिल. म्हणजेच थोडक्यात काय तर भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला पाणी देणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर दबाव टाकण्याचे काम पाकिस्तानकडून करण्यात आले.

मात्र, भारताने तिथेच पाकिस्तानला धुडकावून लावले. जागतिक जल दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांमध्ये एक कार्यक्रम पर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारताचे प्रतिनिधी म्हणून तिथे पी. हरीश पोहोचले होते. यावेळी पाकिस्तानकडून जल सिधू करारचा मुद्दा उपस्थित करताच हरिश यांनी चांगले फटकारले. यावेळी हरिश यांनी म्हटले की, करारांचे पालक करण्यावर बोलण्यापूर्वी पाकिस्तानने मानवी जीवनाच्या पावित्र्याचा आदर केला पाहिजे. भारताने जागतिक मंचावर पाकिस्तानला तोंडावर पाडले.

Follow Us
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान
काही काळातच मोठं घडलं; ते एक विधान आणि.... आष्टिकरांच्या लेकाची पक्षात
काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला...
ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; आष्टीकरांचा अंधारेंवर हल्लाबोल
Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग
विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
Vidhan Parishad Election Result | विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?