AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने भारताकडे मागितली थेट भीक, भारताने फटकारले, संयुक्त राष्ट्राच्या..

पाकिस्तानला भारताकडून चांगलाच मोठा दणका देण्यात आला. विशेष म्हणजे भारताने जागतिक मंचावर पाकिस्तानचा बुरखा फाडला. भर कार्यक्रमात भारताने पाकला सळो की पळो करून सोडले. पाकिस्तान फक्त पाणी पाणी करत या कार्यक्रमात राहिले.

पाकिस्तानने भारताकडे मागितली थेट भीक, भारताने फटकारले, संयुक्त राष्ट्राच्या..
Indus Water Treaty
| Updated on: Mar 20, 2026 | 10:44 AM
Share

भारत आणि पाकिस्तानचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावात आहेत. पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी कारवाया केल्या जातात. पाकिस्तानातून दहशतवादी भारतात घुसखोरी करतात आणि मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणतात. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानकडून याला थेट नकार दिला जातो. आतापर्यंत भारताने अनेक पुरावेही याबाबतचे सादर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधून आलेल्या दहशतनाद्यांनी मोठा हल्ला पहलगाममध्ये केला. यावेळी हिंदू पर्यटक दहशताद्यांच्या निशाण्यावर होते. धक्कादायक बाब म्हणजे थेट धर्म विचारून गोळीबार करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओही पुढे आले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात मोठा संताप बघायला मिळाला. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात होती. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून थेट मोठा हल्ला केला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ववस्थ केली.

यादरम्यानच भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याकरिता पाकिस्तानमध्ये जाणारे पाणीही रोखले. आता पाकिस्तान पाण्यासाठी तरसल्याचे बघायला मिळत आहे. भारताने सिंधू जल करार रद्द केल्यापासून पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानकडून वारंवार सिंधू जल करार नर्संचयित करण्याचे आवाहन केले जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये पाकिस्तानकडून याबाबत विनवणी करण्यात आली.

बैठकीदरम्यान पाकिस्तानकडून सिंधू जल करार निलंबनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी भारताने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले. भारताने यादरम्यान अगदी स्पष्ट शब्दात सांगितले की, जोपर्यत दहशतवादाचे जागतिक केंद्र असलेला पााकिस्तान आपली भूमिका बदल नाही, तोपर्यत सिधू जल करार निलंबितच राहिल. म्हणजेच थोडक्यात काय तर भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला पाणी देणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर दबाव टाकण्याचे काम पाकिस्तानकडून करण्यात आले.

मात्र, भारताने तिथेच पाकिस्तानला धुडकावून लावले. जागतिक जल दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांमध्ये एक कार्यक्रम पर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारताचे प्रतिनिधी म्हणून तिथे पी. हरीश पोहोचले होते. यावेळी पाकिस्तानकडून जल सिधू करारचा मुद्दा उपस्थित करताच हरिश यांनी चांगले फटकारले. यावेळी हरिश यांनी म्हटले की, करारांचे पालक करण्यावर बोलण्यापूर्वी पाकिस्तानने मानवी जीवनाच्या पावित्र्याचा आदर केला पाहिजे. भारताने जागतिक मंचावर पाकिस्तानला तोंडावर पाडले.

Follow Us
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा......