भारत आणि अमेरिकेत मोठी भागीदारी, थेट 50 टक्के देशात येणारा एलपीजी गॅस अमेरिकेतून, सिलेंडरमध्ये..
रशियाच्या तेल खरेदीच्या मुद्द्यावर भारतावर अनेक गंभीर आरोप करण्यात आली. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठे निर्बंध अमेरिकेने लादले. आता तीच अमेरिका भारताला एलपीजीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करत आहे.

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले होते. त्यातच पुन्हा अमेरिकेकडून इराणवर हल्ले केली जात आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला की, त्याचे परिणाम जागतिक बाजारावर बघायला मिळतात. थेट कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडतो. या युद्धादरम्यान इराणकडून होर्मुज खाडी बंद ठेवण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतासह अन्य देशात कच्च्या तेलाची मोठी समस्या बघायला मिळाली. टंचाई निर्माण झाली होती. फेब्रुवारी महिन्यापासून भारत एलपीजीशी (LPG) संबंधित आव्हानांचा सामना करत आहे. भारतात एलपीजीची मोठी समस्या आहे. भारत एलपीजी गॅस इतर देशांकडून आयात करतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या नाकेबंदीवरून इराण आणि अमेरिका यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे या भागातून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. भारताला फटका बसतोय.
भारताने एलपीजीची समस्या टाळण्यासाठी अमेरिकेकडून एलपीजी आयात करण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट महिन्यात अमेरिका ही भारताला एलपीजीचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश ठरला आहे. भारताने सर्वात जास्त ऑगस्ट महिन्यात अमेरिकेकडून एलपीजी गॅस खरेदी केली. कतार हा भारताला सर्वात जास्त एलपीजी पुरवठा करणारा देश आहे, पण आता त्याची जागा अमेरिकेने घेतली.
अमेरिकेसोबतच्या युद्धात कतारच्या गॅस प्रकल्पांवर हल्ला इराणने केला, ज्यात मोठे नुकसान झाले. आखाती देशांकडून होणाऱ्या एलपीजी पुरवठ्यात मोठी वाढ झाली. केप्लर आणि पेट्रोलियम प्लॅनिंग अँड ॲनालिसिस सेल यांनी दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. केप्लरच्या आकडेवारीनुसार, जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये भारताच्या एकूण एलपीजी आयातीत 14.5 टक्क्यांनी वाढ झाली.
या काळात आखाती देशांतून येणाऱ्या एलपीजीचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले. भारताच्या एकूण एलपीजी आयातीत आखाती देशांचा वाटा जुलैमधील 16.4 टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये 29.7 टक्क्यांपर्यंत वाढला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला होता. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता मोठा दबाव भारतावर होता. त्यातच भारताबद्दल विविध विधानेही करण्यात आली.
