AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Attack On UAE : ड्रोन हल्ल्यानंतर भारत खवळला, इराणला सरळ सुनावलं ‘आम्हाला हे अजिबात मान्य नाही’

Iran Attack On UAE : मध्य पूर्वेत पुन्हा युद्ध सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. काल तशा घडामोडी घडल्या आहेत. इराणकडून काल संयुक्त अरब अमीरातवर हल्ला करण्यात आला. याची झळ भारतीयांना बसली.

Iran Attack On UAE : ड्रोन हल्ल्यानंतर भारत खवळला, इराणला सरळ सुनावलं 'आम्हाला हे अजिबात मान्य नाही'
Iran Attack On UAE
| Updated on: May 05, 2026 | 12:25 PM
Share

इराणने काल संयुक्त अरब अमीरात UAE च्या फुजैराह पेट्रोलियम औद्योगिक प्रकल्पावर ड्रोन हल्ला केला. या ड्रोन हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले आहेत. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पेट्रोलियम साइटवरील हल्ल्यानंतर तिथे आग लागली. इराण-अमेरिकेत युद्धविराम झाल्यानंतर यूएईने काल पहिल्यांदा तीन मिसाइल्सचा अलर्ट जारी केला होता. इराणचं हे पाऊल भारताला अजिबात पटलेलं नाही. कारण त्यांच्या हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले तसचं यूएई भारताचा मित्र देश आहे. त्यामुळे भारताने इराणच्या या ड्रोन हल्ल्याच कठोर शब्दात निषेध केला आहे. “फुजैराह वरील हल्ला आणि त्यात भारतीयांचं जखमी होणं आम्हाला अजिबात मान्य नाही. नागरी पायाभूत प्रकल्प आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणं तात्काळ थांबवावं” अशी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.

भारताने इराणचा निषेध करताना आपण चर्चेच्या बाजूने असल्याचं म्हटलं आहे. चर्चा आणि कूटनितीक मार्गाने या परिस्थितीतून मार्ग काढावा तरच पश्चिम आशियात शांतता आणि स्थिरता येईल” अशी भारताची भूमिका आहे. भारताने सागरी सुरक्षेवर सुद्धा आपलं मत मांडलं. सध्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजची इराण आणि अमेरिका दोन्ही देशांनी कोंडी केली आहे. त्यामुळे तिथून चालणारी जलवाहतूक बाधित झाली आहे. इराण बेकायदेशीररित्या हॉर्मुजमधून जाणाऱ्या तेल जहाजांवर टोल आकारत आहे.

इराणने किती मिसाइल्स डागली?

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कुठल्याही अडथळ्याशिवाय स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून मुक्तपणे व्यापारी जलवाहतूक सुरु राहिली पाहिजे अशी भारताची भूमिका आहे. शांततामय मार्गाने तोडगा काढण्यासाठी भारत साथ द्यायला तयार आहे असं भारताने म्हटलं आहे. जखमी भारतीयांवर उपचार सुरु असल्याची माहिती यूएईमधील भारतीय दूतावासाने दिली आहे. जखमी भारतीयांना चांगले उपचार मिळावेत, त्यांचं सर्व व्यवस्थित व्हावं यासाठी आम्ही स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात आहोत असं भारतीय दूतावासाने म्हटलं आहे. इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर पेट्रोलियम साइटवर आग भडकली. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने इराणने चार मिसाइल डागल्याची माहिती दिली. इराणने डागलेल्या चार पैकी तीन मिसाइल्सना एअर डिफेन्स सिस्टिमने नष्ट केलं. एक समुद्रात पडलं.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!