AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने जे केले ते जगातील एकाही देशाला जमले नाही, जग धक्क्यात, थेट होर्मुज खाडीत गोळीबार झालेले जहाज…

सध्याच्या घडीला जगावर मोठं संकट आहे. होर्मुज खाडीत तणाव कायम आहे. होर्मुज खाडीतील तणाव दूर होताना दिसत नाही. त्यामध्येच भारताने जे केले ते जगातील एकही देशाला जमले नाही. होर्मुज खाडीत गोळीबार झालेले जहाज मुंबईत दाखल होईल.

भारताने जे केले ते जगातील एकाही देशाला जमले नाही, जग धक्क्यात, थेट होर्मुज खाडीत गोळीबार झालेले जहाज...
Gulf of Hormuz indian ship
| Updated on: Apr 22, 2026 | 7:41 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुजची खाडी युद्धाचा आखाडा बनली आहे. इराण होर्मुज खाडीतून माघार घेत नाही. परिणामी होर्मुज खाडी ठप्प आहे. होर्मुज खाडीतून जहाजांची ये-जा होत नसल्याने तेलासह एलपीजीचे मोठे संकट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी खुली आणि सुरक्षित व्हावी, याकरिता प्रयत्न केले जात आहेत. भारतासह अनेक देशांचे जहाज होर्मुज खाडीत अडकून पडले आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. त्यानंतर युद्धाला सुरूवात झाली. युद्धाला सुरूवात होताच अचानक इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजार अस्थिर झाला. हेच नाही तर तेलाच्या भावांमध्ये मोठी वाढ होत आहे. होर्मुज खाडीत भारताचे 14 जहाज अडकले आहेत. या जहाजांच्या सुरक्षेसाठी भारत सरकार इराणी अधिकाऱ्यांसोबत सतत संपर्कात आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात एलपीजीचे मोठे संकट आहे.

आता भारतासाठी अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे. होर्मुजच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला आणखी एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून आणखीन एक जहाज भारतात दाखल होत आहे. इराणने भारतीय जहाजावर गोळीबारी केली. मात्र, तरीही या जहाजाला रोखण्यात त्यांना यश मिळाले नाही.

भारतीय ध्वज असलेल्या जहाजाला गोळीबारी करूनही रोखण्यात इराणला यश मिळाले नाही. 18 एप्रिल रोजी या जहाजाने होर्मुज खाडी पार केली. हे भारतीय तेलवाहू जहाज ‘देश गरिमा’ बुधवारी दुपारपर्यंत मुंबईत दाखल होईल. या जहाजावर 31 भारतीय खलाशी आहेत. हे जहाज मुंबईत दाखल होताच मोठा दिलासा मिळणार आहे.

भारतीय ध्वज असलेल्या देश गरिमा या टँकर जहाजाने 18 एप्रिल रोजी होर्मुजची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली. दुसरीकडे आयआरजीसीच्या गोळीबारानंतर व्हीएलसीसी सन्मार हेराल्ड आणि मालवाहू जहाज जॅग अर्णव या दोन भारतीय जहाजांना माघारी फिरावे लागले. जहाजावर झालेल्या गोळीबारामध्ये एकही व्यक्ती जखमी झाली नाही. इराणच्या गोळीबारानंतरही कॅप्टनने हार मानली नाही. आता हे जहाज सुरक्षित दाखल होईल.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.