AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःवर संकट असतानाही इराण भारताच्या मदतीला, होर्मुझबाबत मोठी घोषणा, भारतावरील संकट टळणार

India Iran Relation : होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांची चिंता वाढली आहे. अशातच आता या संकटाच्या काळात इराण भारताच्या मदतीला धावला आहे. इराणने एक मोठी घोषणा केली आहे.

स्वतःवर संकट असतानाही इराण भारताच्या मदतीला, होर्मुझबाबत मोठी घोषणा, भारतावरील संकट टळणार
India IranImage Credit source: Google
| Updated on: Apr 13, 2026 | 9:54 PM
Share

इराण आणि अमेरिकेतील तणाव आणखी वाढला आहे, त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांची चिंता वाढली आहे. अशातच आता या संकटाच्या काळात इराण भारताच्या मदतीला धावला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, होर्मुज सामुद्रधुनी मधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल आकारलेला नाही. पुढे इराणने आगामी काळात भारताला मदत करण्याची घोषणा केली आहे. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहली यांनी सांगितले की, ‘तुम्ही भारत सरकारला विचारू शकता, आम्ही आतापर्यंत कोणताही टोल घेतलेला नाही.’ पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, या कठीण काळात भारत आणि इराण यांचे संबंध मजबूत आहेत आणि दोन्ही देशांचे हितसंबंध समान आहेत.

इराण भारताला मदत करणार

स्वतः संकटात असणाऱ्या इराणने मदतीचे आश्वासन देताना म्हटले की भारतीय जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत करू. फतहली यांनी सांगितले की, इराणचा भारत सरकारशी चांगला संपर्क आहे आणि भारतीय जहाजे कोणत्याही अडचणीशिवाय या मार्गाने जावीत अशी त्यांची इच्छा आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला त्यांच्या 5 विश्वासार्ह आणि खास मित्र देशांपैकी एक मानले आहे, ही खूप महत्त्वाची बाब आहे.

भारतानेही टोल वसूल केल्याच्या बातम्या फेटाळल्या

भारताने यापूर्वी स्पष्ट केले होते की, आपल्या जहाजांना बाहेर काढण्यासाठी इराणला कोणताही टोल दिलेला नाही. विशेष बाब म्हणजे युद्धाच्या काळात होर्मुज सामुद्रधुनीत वाहतूक जवळपास ठप्प झाली होती, तेव्हा भारताची 9 LPG जहाजे या भागातून सुरक्षित बाहेर पडली होती. सध्या सुमारे 15 भारतीय ध्वज असलेली जहाजे फारसच्या आखातात अडकलेली आहेत, तीही लवकरच बाहेर पडण्याची शक्यता आहे.

होर्मुज सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. भारताचा जवळपास अर्धा कच्चा तेल आणि LPG याच मार्गाने येतो. त्यामुळे या भागात अडचण निर्माण झाल्यास भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर आणि व्यापारावर थेट परिणाम होतो. आता फतहली यांनी भारत सरकार आणि भारतीय नागरिकांचे आभार मानले आहे, त्यांनी म्हटले की, या कठीण काळात भारताने एक विश्वासू मित्र म्हणून साथ दिली आहे.

Follow Us
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात.
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले...
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले....
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न.
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप.
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार...
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार....
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना.
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने.
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?.
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच.