AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःवर संकट असतानाही इराण भारताच्या मदतीला, होर्मुझबाबत मोठी घोषणा, भारतावरील संकट टळणार

India Iran Relation : होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांची चिंता वाढली आहे. अशातच आता या संकटाच्या काळात इराण भारताच्या मदतीला धावला आहे. इराणने एक मोठी घोषणा केली आहे.

स्वतःवर संकट असतानाही इराण भारताच्या मदतीला, होर्मुझबाबत मोठी घोषणा, भारतावरील संकट टळणार
India IranImage Credit source: Google
| Updated on: Apr 13, 2026 | 9:54 PM
Share

इराण आणि अमेरिकेतील तणाव आणखी वाढला आहे, त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांची चिंता वाढली आहे. अशातच आता या संकटाच्या काळात इराण भारताच्या मदतीला धावला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, होर्मुज सामुद्रधुनी मधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल आकारलेला नाही. पुढे इराणने आगामी काळात भारताला मदत करण्याची घोषणा केली आहे. भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहली यांनी सांगितले की, ‘तुम्ही भारत सरकारला विचारू शकता, आम्ही आतापर्यंत कोणताही टोल घेतलेला नाही.’ पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, या कठीण काळात भारत आणि इराण यांचे संबंध मजबूत आहेत आणि दोन्ही देशांचे हितसंबंध समान आहेत.

इराण भारताला मदत करणार

स्वतः संकटात असणाऱ्या इराणने मदतीचे आश्वासन देताना म्हटले की भारतीय जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत करू. फतहली यांनी सांगितले की, इराणचा भारत सरकारशी चांगला संपर्क आहे आणि भारतीय जहाजे कोणत्याही अडचणीशिवाय या मार्गाने जावीत अशी त्यांची इच्छा आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला त्यांच्या 5 विश्वासार्ह आणि खास मित्र देशांपैकी एक मानले आहे, ही खूप महत्त्वाची बाब आहे.

भारतानेही टोल वसूल केल्याच्या बातम्या फेटाळल्या

भारताने यापूर्वी स्पष्ट केले होते की, आपल्या जहाजांना बाहेर काढण्यासाठी इराणला कोणताही टोल दिलेला नाही. विशेष बाब म्हणजे युद्धाच्या काळात होर्मुज सामुद्रधुनीत वाहतूक जवळपास ठप्प झाली होती, तेव्हा भारताची 9 LPG जहाजे या भागातून सुरक्षित बाहेर पडली होती. सध्या सुमारे 15 भारतीय ध्वज असलेली जहाजे फारसच्या आखातात अडकलेली आहेत, तीही लवकरच बाहेर पडण्याची शक्यता आहे.

होर्मुज सामुद्रधुनी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. भारताचा जवळपास अर्धा कच्चा तेल आणि LPG याच मार्गाने येतो. त्यामुळे या भागात अडचण निर्माण झाल्यास भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर आणि व्यापारावर थेट परिणाम होतो. आता फतहली यांनी भारत सरकार आणि भारतीय नागरिकांचे आभार मानले आहे, त्यांनी म्हटले की, या कठीण काळात भारताने एक विश्वासू मित्र म्हणून साथ दिली आहे.

Follow Us
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या