Masood Azhar : पाकिस्तानातून मोठी बातमी, भारताचा कट्टर दुश्मन जैशचा प्रमुख मसूद अजहरच्या मोठ्या भावाचा रहस्यमयी खात्मा

Maulana Masood Azhar : 'मौलाना मसूद अजहरचा मोठा भाऊ मोहम्मद ताहिर अनवरचा अल्लाहच्या मर्जीने इंतकाल झाला' असा मेसेज पाठवला जात आहे. मागच्यावर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांची निदर्यतेने हत्या केली होती.

Masood Azhar : पाकिस्तानातून मोठी बातमी, भारताचा कट्टर दुश्मन जैशचा प्रमुख मसूद अजहरच्या मोठ्या भावाचा रहस्यमयी खात्मा
Maulana Masood Azhar
Image Credit source: ANI
| Updated on: Mar 31, 2026 | 1:16 PM

भारतात सध्या ‘धुरंधर द रिवेंज’ सिनेमा जोरात सुरु आहे. तिकीट खिडकीवर धुरंधर 2 चित्रपटाने कमाल केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 1000 कोटीपेक्षा जास्तची कमाई केली आहे. यात भारतीय हेर, पाकिस्तानातील गँगवॉर, दहशतवादी नेटवर्क दाखवलं आहे. हेर रणवीर सिंह पाकिस्तानात पाळमुळं रोवल्यानंतर वेचून, वेचून भारताच्या शत्रुंचा कसा खात्मा करतो? ते दाखवलं आहे. यात मधल्याकाळात पाकिस्तानात अनेक दहशतवाद्यांच्या रहस्यमयी हत्या कशा झाल्या? ते दाखवलं आहे. आता खऱ्यात आयुष्यातही अशीच एक भारताला सुखावणारी घटना घडली आहे. पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरच्या भावाचा मृत्यू झाला आहे.

मसूद अजहरचा मोठा भाऊ मोहम्मद ताहिर अनवर संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणाच्या सूत्रांनी अनवरच्या मृत्यूची पृष्टी केली आहे. मोहम्मद ताहिर अनवरचा मृत्यू कशामुळे झाला? त्याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मसूद अजहरचा भाऊ मोहम्मद ताहिर अनवरची जैशमध्ये महत्वाची भूमिका होती. तो जैशच्या दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. या बातमीनंतर गुप्तचर यंत्रणा अलर्टवर आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताहिर अनवरचा पाकिस्तानातील बहावलपुर येथील जैशच्या मुख्यालयात दफनविधी होणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर 25 ऑक्टोंबर 2025 रोजी जैशची महिला विंग ‘जमात-उन-मोमिनत’ सुरु झाली.

जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांकडून मेसेज

पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सुद्धा अनवरच्या मृत्यूचे मेसेज व्हायरल झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांकडून मेसेज पाठवला जात आहे. ‘मौलाना मसूद अजहरचा मोठा भाऊ मोहम्मद ताहिर अनवरचा अल्लाहच्या मर्जीने इंतकाल झाला’ असा मेसेज पाठवला जात आहे. मागच्यावर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांची निदर्यतेने हत्या केली होती. त्यानंतर 5-6 मे च्या रात्री भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं.

मसूदच्या कुटुंबातीला किती जणांचा खात्मा?

त्यामध्ये भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. या ऑपरेशनमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. भारताने या ऑपरेशनमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर सुद्धा हल्ला केला होता. यात मसूद अजहरच्या कुटुंबातील काही सदस्य मारले गेले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील 10 पैकी 4 सदस्य मारले गेले. जैशने स्टेटमेंट जारी करुन म्हटलेलं की, मसूद अजहरची मोठी बहिण, त्याचे भावोजी, भाच्याची पत्नी, भाची यांचा मृत्यू झाला होता.

 

Follow Us