AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालदीव काय छोटा देश नाही, मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा पुन्हा भारताशी पंगा

India-maldive row : भारत आणि मालदीव यांंच्यातील संबंध आता बरेच प्रमाणात बिघडले आहे. मुईज्जू यांना चीनचा पाठिंबा असल्याने ते भारत विरोधी वक्तव्य करत आहेत. पण याचा दोन्ही देशांवर भविष्यात मोठा परिणाम होणार असल्याची चिन्ह आहेत.

मालदीव काय छोटा देश नाही, मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा पुन्हा भारताशी पंगा
| Updated on: Mar 18, 2024 | 6:53 PM
Share

India maldive row : मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी तुर्कीकडून ड्रोन खरेदी केले आहे. यावेळी त्यांनी भारताविरोधात वक्तव्य केले आहे. मुइज्जू यांनी म्हटले आहे की, मालदीवच्या भागांचे निरीक्षण ही कोणत्याही ‘बाहेरील पक्षासाठी’ चिंतेची बाब नसावी. त्यांनी ड्रोन तैनात केल्यानंतर मालदीवच्या संरक्षण दलांना बळकट करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. चीन समर्थक असलेले मुइज्जू मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून भारतविरोधी भूमिका घेत आहेत. भारताने भेट दिलेली हेलिकॉप्टर चालवणाऱ्या भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी मालदीवमधून परतल्यानंतर त्यांनी ही टिप्पणी केली आहे.

मोहम्मद मुइज्जू म्हणाले की, मालदीव हा छोटा देश नाही. हा देश आपल्या अधिकारक्षेत्रावर लक्ष ठेवण्यास सक्षम आहे. कोणत्याही देशाचे नाव न घेता त्यांनी म्हटले की, “मालदीव हे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे आणि मालदीवच्या अधिकारक्षेत्रावर लक्ष ठेवण्याबाबत कोणत्याही बाहेरच्या पक्षाने चिंता करू नये. यामुळे मालदीवमध्ये अडथळा येणार नाही, असे ते म्हणाले.

मुइज्जूचा भारताशी तणाव कायम

मुइज्जू म्हणाले की त्यांचे सरकार तटरक्षक दलाची क्षमता दुप्पट करेल, हवाई दलाच्या ताफ्याचा विस्तार करेल आणि जमिनीवर आधारित वाहने आणि प्लॅटफॉर्म वाढवेल. गेल्या वर्षी पदभार स्वीकारल्यानंतर मुइज्जू यांनी भारताला 90 लष्करी कर्मचारी मागे घेण्यास सांगितले होते.

भारताने लष्करी कर्मचाऱ्यांच्या जागी गैर-लष्करी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास आणि मानवतावादी आणि वैद्यकीय निर्वासन सेवांसाठी मालदीवला दिलेली दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान चालविण्याचे मान्य केले होते. पण नंतर त्यांनी वक्तव्य केले की, साध्या ड्रेसमध्येही कोणतेही परकीय व्यक्ती देशात चालणार नाही.

10 मे नंतर कोणताही भारतीय लष्करी कर्मचारी, अगदी गणवेश नसलेले देखील त्यांच्या देशात उपस्थित राहणार नाहीत. ते गेल्या वर्षी भारतविरोधी भूमिकेसह सत्तेवर आले आणि शपथ घेतल्यानंतर काही तासांतच त्यांनी भारताला हिंद महासागरातील सामरिकदृष्ट्या स्थित बेट राष्ट्रातून आपले लष्करी कर्मचारी माघारी बोलवण्यास सांगितले होते.

यानंतर ते चीनच्या दौऱ्यावर गेले होते. चीनकडून त्यांनी घेतलेल्या कर्जासाठी त्यांना मुदत वाढवून मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. पण चीन मदतीच्या बहाण्याने कशा प्रकारे छोट्या देशांना गुलाम करतो याची कल्पना कदाचित त्यांना आलेली नसेल.

Follow Us
अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून....
अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून.....
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले.
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय.....
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक.
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक....
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय.
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.