AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा महिला पुढे जातात, तेव्हा त्यांच्यासोबत मानवताही पुढे जाते, TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांचे प्रतिपादन!

न्यूज-9 ग्लोबल परिषदेच्या दुसऱ्या पर्वाची यूएईमध्ये बुधवारी (27 ऑगस्ट) मोठ्या थाटात सुरुवात झाली. यावेळी बॉलिवुड जगतातील अनेक प्रसिद्ध चेहरे उपस्थित होते. तसेच उद्योग जगतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही यावेळी या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी तसेच सीईओ बरुण दास यांनी SHEconomy अजेंड्यावर उद्घाटनपर भाषण केले.

जेव्हा महिला पुढे जातात, तेव्हा त्यांच्यासोबत मानवताही पुढे जाते, TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांचे प्रतिपादन!
TV9 NETWORK MD AND CEO BARUN DAS
| Updated on: Aug 27, 2025 | 9:49 PM
Share

News9 Global Summit: न्यूज-9 ग्लोबल परिषदेच्या दुसऱ्या पर्वाची यूएईमध्ये बुधवारी (27 ऑगस्ट) मोठ्या थाटात सुरुवात झाली. यावेळी बॉलिवुड जगतातील अनेक प्रसिद्ध चेहरे उपस्थित होते. तसेच उद्योग जगतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही यावेळी या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी तसेच सीईओ बरुण दास यांनी SHEconomy अजेंड्यावर उद्घाटनपर भाषण केले. यावेळी त्यांनी सक्षमीकरण तसेच सर्वसमावेशकता या भावनांना केंद्रस्थानी ठेवून प्रेरणादायी भाषण केले. आज आपल्या भोवतीचा समाज हा बौद्धिक श्रेष्ठतेने प्रेरित आहे. आतापर्यंत महिलांनी मोठे यश संपादन केलेले आहे. महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रात यस संपादन करताना दिसत असल्या तरी अजून बरीच प्रगती करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

महिलांनी अनेक व्यवसायांत नेतृत्व करून दाखवलेलं आहे

आजघडीला महिलांनी अनेक अडचणींना पार केलेलं आहे. मात्र अजूनही बरंच काम होणं गरजेचं आहे. समानता हा सक्षमीकरणाचा मूळ गाभा आहे. समानता म्हणजे कोणावर उपकार करणे नव्हे. आज समानता न्यायपूर्ण, प्रगतीशील आणि गतिमान जगासाठी एक गरज आहे, असे मत यावेळी बरुण दास यांनी व्यक्त केले. तसेच लग्नाच्या बाबतीत आपण महिलांना नेहमीच अर्धांगिनी असे म्हणतो. मात्र आपल्या आजूबाजूला समाजाच्या प्रत्येक ठिकाणी महिला खरंच अर्धांगिनी आहे का? असा सवाल करत त्यांनी महिलांनी अनेक व्यवसायांत नेतृत्व करून दाखवलेलं आहे. अशांतीच्या काळातही महिलांनी आपले कौशल्य, निश्चयी बाणा सिद्ध करून दाखवलेला आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

इंदिरा नुयी यांचा सांगितला किस्सा

महिला जेव्हा प्रगती करतात तेव्हा संपूर्ण समाज त्यांच्यासोबत प्रगती करत असतो. महिला पुरुषांमुळे अर्धांगिनी नाहीत. महिला जेव्हा पुढे जातात तेव्हा त्यांच्यासोबत मानवताही पुढे जाते, असेही मत बरुण दास यांनी व्यक्त केले. तसेच पेप्सिको कंपनीच्या माजी अध्यक्षा इंदिरा नुयी यांना बढती मिळाल्यानंतर त्यांच्या आईची प्रतिक्रिया कशी होती, याचेही एक उदाहरण त्यांनी सांगितले आहे. इंदिरा नुयी यांना त्यांच्या कंपनीत बढती मिळाली होती. त्यांना पेप्सिको कंपनीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. या निर्णयामुळे त्या खूप आनंदी झाल्या होत्या. त्यांनी हीच बातमी घरी जाऊन आपल्या आईला सांगितली. आईने मात्र आज दुधवाला आला नाही. त्यामुळे तू घरी येताना दूध घेऊ यायला हवं होतंस, असे म्हणाल्या होत्या. आईचे उत्तर ऐकून आई मी आताच तर अध्यक्ष झाली आहे, ही वेळ आनंद साजरा करण्याची आहे, असे उत्तर इंदिरा यांनी दिले होते. इंदिरा यांचे हे विधान ऐकून त्यांच्या आईने जेव्हा तू घरी येतेस तेव्हा तुझा पदाचा हा मुकूट गॅरेजमध्येच ठेऊन येत जा. जेव्हा तू घरी येतेस तेव्हा तू एक आई, पत्नी आणि कोणाचीतरी मुलगी आहेस असे इंदिरा यांच्या आई म्हणाल्या होत्या, असेही बरुण दास सांगितले.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....