AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन सिंदूरमध्ये 36 तासात 80 ड्रोन हल्ले, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानानेच भारताचा पराक्रम सांगितला; नवी माहिती समोर!

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान भयभीत झाला होता. अशातच आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी कबूल केले आहे की, भारताने 10 मे रोजी सकाळी नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता.

ऑपरेशन सिंदूरमध्ये 36 तासात 80 ड्रोन हल्ले, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानानेच भारताचा पराक्रम सांगितला; नवी माहिती समोर!
operation sindoorImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 28, 2025 | 10:19 PM
Share

एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यात भारतीय सैन्याने पाकिस्तानातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या धक्यातून पाकिस्तान अजूनही सावरलेला नाही. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान भयभीत झाला होता. अशातच आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी कबूल केले आहे की, भारताने 10 मे रोजी सकाळी नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता. तसेच त्यांनी भारताने पाकिस्तानवर 36 तासांत 80 ड्रोन हल्ले केल अशी कबुलीही दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इशाक दार काय म्हणाले ?

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी म्हटले की, ‘मे महिन्यातील भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात आम्ही पाकिस्तान आणि भारत यांच्यात मध्यस्थीची विनंती केली नव्हती. मात्र त्यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताची बोलण्यासाठी तयार आहोत अशी माहिती दिली आहे. या हल्ल्यात ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळांना उद्धवस्त केले होते.’

भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केला

मे महिन्यात भारताने राबवलेले हे ऑपरेशन चार दिवस सुरू होते. त्यानंतर 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये लष्करी कारवाई थांबवण्याच्या करारावर झाला होता. 2025 मध्ये पाकिस्तानच्या राजनैतिक कारवायांचे वर्णन करताना दार म्हणाले की, ‘भारताने पाठवलेले 80 पैकी 79 ड्रोन रोखण्यात आले. त्यानंतर 10 मे रोजी सकाळी भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केला, त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले.”

पुढे बोलताना दार म्हणाले की, 10 मे रोजी सकाळी 8:17 वाजता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी त्यांना फोन करून भारत युद्धबंदीसाठी तयार असल्याची माहिती दिली. मी म्हटले होते की आम्हाला युद्ध नको आहे. सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल यांनी नंतर संपर्क साधला आणि भारताशी बोलण्याची तयारी दर्शवली. यानंतर युद्धबंदीवर सहमती झाल्याची माहिती दिली. दार यांनी 7 मे रोजी झालेल्या लढाईत पाकिस्तानने 7 भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला, मात्र याचा कोणताही पुरावा त्यांनी दिला नाही.

Follow Us
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.