.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन सिंदूरमध्ये 36 तासात 80 ड्रोन हल्ले, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानानेच भारताचा पराक्रम सांगितला; नवी माहिती समोर!

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान भयभीत झाला होता. अशातच आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी कबूल केले आहे की, भारताने 10 मे रोजी सकाळी नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता.

ऑपरेशन सिंदूरमध्ये 36 तासात 80 ड्रोन हल्ले, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानानेच भारताचा पराक्रम सांगितला; नवी माहिती समोर!
operation sindoorImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 28, 2025 | 10:19 PM
Share

एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यात भारतीय सैन्याने पाकिस्तानातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या धक्यातून पाकिस्तान अजूनही सावरलेला नाही. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान भयभीत झाला होता. अशातच आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी कबूल केले आहे की, भारताने 10 मे रोजी सकाळी नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता. तसेच त्यांनी भारताने पाकिस्तानवर 36 तासांत 80 ड्रोन हल्ले केल अशी कबुलीही दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इशाक दार काय म्हणाले ?

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी म्हटले की, ‘मे महिन्यातील भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात आम्ही पाकिस्तान आणि भारत यांच्यात मध्यस्थीची विनंती केली नव्हती. मात्र त्यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताची बोलण्यासाठी तयार आहोत अशी माहिती दिली आहे. या हल्ल्यात ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळांना उद्धवस्त केले होते.’

भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केला

मे महिन्यात भारताने राबवलेले हे ऑपरेशन चार दिवस सुरू होते. त्यानंतर 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये लष्करी कारवाई थांबवण्याच्या करारावर झाला होता. 2025 मध्ये पाकिस्तानच्या राजनैतिक कारवायांचे वर्णन करताना दार म्हणाले की, ‘भारताने पाठवलेले 80 पैकी 79 ड्रोन रोखण्यात आले. त्यानंतर 10 मे रोजी सकाळी भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केला, त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले.”

पुढे बोलताना दार म्हणाले की, 10 मे रोजी सकाळी 8:17 वाजता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी त्यांना फोन करून भारत युद्धबंदीसाठी तयार असल्याची माहिती दिली. मी म्हटले होते की आम्हाला युद्ध नको आहे. सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल यांनी नंतर संपर्क साधला आणि भारताशी बोलण्याची तयारी दर्शवली. यानंतर युद्धबंदीवर सहमती झाल्याची माहिती दिली. दार यांनी 7 मे रोजी झालेल्या लढाईत पाकिस्तानने 7 भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला, मात्र याचा कोणताही पुरावा त्यांनी दिला नाही.

Follow Us
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत