AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानच्या औरंगजेबाला आता भारत दया दाखवेल अशी अपेक्षा

Operation Sindoor : "दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापारही एकत्र होऊ शकत नाही तसच पाणी आणि रक्त सुद्धा एकत्र वाहणार नाही" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात स्पष्ट केलय.

Operation Sindoor : मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानच्या औरंगजेबाला आता भारत दया दाखवेल अशी अपेक्षा
India-Pakistan
| Updated on: May 13, 2025 | 8:45 AM
Share

भारत-पाकिस्तानमध्ये तीन दिवस चाललेल्या सैन्य संघर्षानंतर आता सीजफायर झाला आहे. सीमेवर आता शांतता आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण संबंध असले, तरी भारत दया दाखवेल अशी अपेक्षा पाकिस्तान बाळगून आहे. सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा भारताने फेरविचार करावा, अशी विनंती पाकिस्तानातून होत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ला 22 एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर भारत सरकारने तात्काळ पाकिस्तान विरोधात कठोर निर्णय घेतले. त्यांचा दूतावासातील स्टाफ कमी केला. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय. याचे प्रभावी परिणाम अजून काही काळाने दिसतील. पहिल्यांदाच भारत सरकारने सिंधू जल करार स्थगित केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानी जनता आणि तिथलं सरकार टेन्शनमध्ये आहे.

मुहम्मद औरंगजेब काय म्हणाले?

“भारतासोबत सुरु असलेल्या संघर्षामुळे पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर खास काही फरक पडणार नाही. त्यामुळे आर्थिक आढावा घेण्याची आवश्यकता नाही” असं पाकिस्तानचे अर्थ मंत्री मुहम्मद औरंगजेब एका मुलाखतीत म्हणाले.

औरंगजेब यांना काय अपेक्षा?

पाकिस्तानात वाहून जाणार पाणी रोखल्यामुळे त्यांची हालत खराब होऊ लागली आहे. भीषण गर्मी दरम्यान पाण्याची मागणी वाढू शकते. पाण्याच्या संभाव्य समस्येवरुन पाकिस्तानचे अर्थ मंत्री औरंगजेब यांनी भारत सरकारला विनंती केली आहे. “भारताने एकतर्फी निर्णय घेत सिंधू जल करार स्थगित केला. मला अपेक्षा आहे की, हा करार पुन्हा बहाल होईल” असं औरंगजेब यांनी म्हटलं आहे. भारताने करार निलंबित केल्यामुळे तात्काळ कुठलाही परिणाम होणार नाही हे औरंगजेब यांनी मान्य केलं.

पंतप्रधान मोदींची कठोर भूमिका

पाकिस्तान आणि दहशतवादाबद्दल भारताची कठोर भूमिका कायम आहे. सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधन केलं. त्यावेळी ते म्हणाले की, “दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापारही एकत्र होऊ शकत नाही तसच पाणी आणि रक्त सुद्धा एकत्र वाहणार नाही” “पाकिस्तानी सैन्य, पाकिस्तान सरकार ज्या पद्धतीने दहशतवादाला प्रोत्साहन देतात, एक दिवस तेच पाकिस्तानला संपवतील. जर, त्यांना स्वत:ला वाचवायच असेल, तर त्यांना आपल्याकडचा दहशतवादाचा पाय संपवावाच लागेल” असं पीएम मोदी आपल्या संबोधनात म्हणाले.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....