AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“हिंदुस्तान में भी ऐसा नहीं होता…”; पाकच्या मंत्र्याचे भारताबद्दल असं बेताल वक्तव्य, नेमकं कारण काय..?

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), ज्याला पाकिस्तानी तालिबान म्हणून ओळखले जाते, त्यांनी आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

हिंदुस्तान में भी ऐसा नहीं होता…; पाकच्या मंत्र्याचे भारताबद्दल असं बेताल वक्तव्य, नेमकं कारण काय..?
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 01, 2023 | 12:32 AM
Share

नवी दिल्लीः पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत 30 जानेवारी रोजी झालेल्या स्फोटात 100 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याचवेळी या स्फोटात 221 जण जखमी झाले होते. पोलिसांना लक्ष्य करून हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. हे विशेष. 300 ते 400 पोलीस दुपारच्या नमाजासाठी जमले होते तेव्हा हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 100 पैकी 97 पोलीस होते. त्यानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीला सांगितले की, मृतांमध्ये 97 पोलीस अधिकारी आणि तीन नागरिकांचा समावेश होता. त्यामधील 27 जणांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पेशावर हल्लावरून म्हटले आहे की, आपला शेजारी देश आपल्या कृत्यांपासून मागे हटणार नाही.

तसेच ख्वाजा आसिफ म्हणाले की, भारत किंवा इस्रायलमध्ये नमाजच्या वेळी नमाजीही शहीद होत नाहीत, मात्र पाकिस्तानमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे पेशावरमध्ये झालेल्या रक्तपाताला नेमके जबाबदार कोण असा सवाल आता आसिफ यांनी उपस्थित केला आहे.

या हल्ल्याविषयी सांगताना ते म्हणाले की, आपल्याला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, आपण कुठे उभे आहोत हे पाहण्याची गरज आहे.

या लोकांना का आणले? या हल्ल्याचा जो पर्यंत निषेध केला जात नाही. देशाकडून दहशतवादाविरोधात एकजूट होत नाही तोपर्यंत हा लढा द्यावाच लागणार आहे असंही त्यांनी म्हटले आहे. हे झालेले कोणत्याही विशिष्ट पंथाचे युद्ध नाही, तर ते पाकिस्तानी राष्ट्राचे युद्ध आहे.

पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितले की, दहशतवादाविरुद्ध युद्ध 2010-2017 या काळात लढले गेले.

पीपीपीच्या कार्यकाळात स्वातपासून सुरू झालेले हे युद्ध पीएमएल-एनच्या आधीच्या कार्यकाळात संपले आणि कराचीपासून स्वातपर्यंत देशात शांतता प्रस्थापित झाली.

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी), ज्याला पाकिस्तानी तालिबान म्हणून ओळखले जाते, त्यांनी आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि सांगितले की, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानात मारला गेलेला टीटीपी कमांडर उमर खालिद खुरासानी याचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला केला आहे.

स्फोटाच्या ठिकाणाहून संशयित आत्मघातकी हल्लेखोराचे शीर जप्त करण्यात आले आहे. मोहम्मद एजन्सी येथील सलीम खान यांचा मुलगा मोहम्मद अयाज (वय 37) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे.

Follow Us
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?