AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचे मोठे षड्यंत्र, सीमेलगत पुन्हा दहशतवाद्यांना पाठिंबा, भारताची चिंता वाढली

पाकिस्तानने भारताविरोधात मोठा कट रचायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

पाकिस्तानचे मोठे षड्यंत्र, सीमेलगत पुन्हा दहशतवाद्यांना पाठिंबा, भारताची चिंता वाढली
| Updated on: Jun 27, 2025 | 6:57 PM
Share

पाकिस्तान आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने भारताविरोधात मोठा कट रचायला सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान दहशतवादी तळांवर हल्ला करत ती उध्वस्त केली होती, मात्र आता पाकिस्तान उध्वस्त झालेली दहशतवाद्यांची लाँचिंग पॅड आणि प्रशिक्षण केंद्रे पुन्हा बांधत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय, पाकिस्तानी सरकार आणि लष्कर दहशतवाद्यांना थेट पाठिंबा देत आहे. एका उच्चस्तरीय बैठकीत दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे पुन्हा बांधण्याचा निर्णय झाला आहे. या बैठकीला जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि टीआरएफ या दहशतवादी संघटनांचे मुख्य कमांडर व पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे अधिकारी हजर होते.

हाय-टेक प्रशिक्षण केंद्र तयार केली जाणार

नव्याने बांधली जाणारी प्रशिक्षण केंद्र ही हायटेक असणार आहेत. तसेच या केंद्रांची सुरक्षा पाकिस्तानी लष्कराकडे असणार आहे. ड्रोन, थर्मल सेन्सर्स, नाईट व्हिजन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या केंद्रांवर नजर ठेवली जाणार असल्याचेही समोर आले आहे.

खास रणनीती

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटनांनी रणनीती बदलली असल्याचे बोलले जात आहे. आता 200 पेक्षा जास्त दहशतवादी एकाच छावणीत राहणार नाहीत. आता अनेक लहान छावण्या बांधण्याची योजना आहे. ज्यामुळे भारतीय एजन्सींना या भागात पोहोचणे अवघड होईल. तसेच दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना ताबडतोब सीमेवर पाठवले जाणार आहे.

लाँच पॅड पुन्हा तयार होणार

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड उडवले होते. यात लुनी, पुटवाल, भैरोनाथ, पीपी धंधार, टिपू, मुमताज कॉम्प्लेक्स, जमील, सैधवाली, उमरानवाली बंकर, चपरार फॉरवर्ड, छोटा चक पोस्ट, अफजल शहीद पोस्ट आणि जंगलोरा पोस्ट यांचा समावेश होता. आता सर्व ठिकाणी पुन्हा नवीन लाँच पॅड तयार केले जाणार आहेत.

सरकारचा पाठिंबा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे. जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडून मिळणाऱ्या पैशांचा वापर दहशतवाद्यांना पोसण्यासाठी केला जात आहे. हा भारतासाठी आगामी काळात मोठा धोका आहे. त्यामुळे भारतानेही दक्षता वाढवली आहे. सैन्य आणि गुप्तचर संस्थांनी हाय अलर्ट जारी केला आहे.

Follow Us
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची...
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची....
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज.
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ.
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार.....
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार......
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात...
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात....
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....