AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचे मोठे षड्यंत्र, सीमेलगत पुन्हा दहशतवाद्यांना पाठिंबा, भारताची चिंता वाढली

पाकिस्तानने भारताविरोधात मोठा कट रचायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

पाकिस्तानचे मोठे षड्यंत्र, सीमेलगत पुन्हा दहशतवाद्यांना पाठिंबा, भारताची चिंता वाढली
| Updated on: Jun 27, 2025 | 6:57 PM
Share

पाकिस्तान आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने भारताविरोधात मोठा कट रचायला सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान दहशतवादी तळांवर हल्ला करत ती उध्वस्त केली होती, मात्र आता पाकिस्तान उध्वस्त झालेली दहशतवाद्यांची लाँचिंग पॅड आणि प्रशिक्षण केंद्रे पुन्हा बांधत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय, पाकिस्तानी सरकार आणि लष्कर दहशतवाद्यांना थेट पाठिंबा देत आहे. एका उच्चस्तरीय बैठकीत दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे पुन्हा बांधण्याचा निर्णय झाला आहे. या बैठकीला जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि टीआरएफ या दहशतवादी संघटनांचे मुख्य कमांडर व पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे अधिकारी हजर होते.

हाय-टेक प्रशिक्षण केंद्र तयार केली जाणार

नव्याने बांधली जाणारी प्रशिक्षण केंद्र ही हायटेक असणार आहेत. तसेच या केंद्रांची सुरक्षा पाकिस्तानी लष्कराकडे असणार आहे. ड्रोन, थर्मल सेन्सर्स, नाईट व्हिजन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या केंद्रांवर नजर ठेवली जाणार असल्याचेही समोर आले आहे.

खास रणनीती

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटनांनी रणनीती बदलली असल्याचे बोलले जात आहे. आता 200 पेक्षा जास्त दहशतवादी एकाच छावणीत राहणार नाहीत. आता अनेक लहान छावण्या बांधण्याची योजना आहे. ज्यामुळे भारतीय एजन्सींना या भागात पोहोचणे अवघड होईल. तसेच दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना ताबडतोब सीमेवर पाठवले जाणार आहे.

लाँच पॅड पुन्हा तयार होणार

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड उडवले होते. यात लुनी, पुटवाल, भैरोनाथ, पीपी धंधार, टिपू, मुमताज कॉम्प्लेक्स, जमील, सैधवाली, उमरानवाली बंकर, चपरार फॉरवर्ड, छोटा चक पोस्ट, अफजल शहीद पोस्ट आणि जंगलोरा पोस्ट यांचा समावेश होता. आता सर्व ठिकाणी पुन्हा नवीन लाँच पॅड तयार केले जाणार आहेत.

सरकारचा पाठिंबा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे. जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडून मिळणाऱ्या पैशांचा वापर दहशतवाद्यांना पोसण्यासाठी केला जात आहे. हा भारतासाठी आगामी काळात मोठा धोका आहे. त्यामुळे भारतानेही दक्षता वाढवली आहे. सैन्य आणि गुप्तचर संस्थांनी हाय अलर्ट जारी केला आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! दीपकेंचा आरोप
Abhijeet Dipke | विद्यार्थ्यांनी नाही, भाजपच्या गुंडांनी केली दगडफेक! अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप
अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन!
Uddhav Thackeray | अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांना उद्धव ठाकरेंचा फोन! आंदोलनाच्या यशानंतर मोठी चर्चा
तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंचा दणका थेट हायकोर्टापर्यंत; नो लायसन्स, नो बिझनेस, कँटीन बंद करण्याचे आदेश
अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद...
Sansad Bhavan Park | अमित शाह संसदेत का नाही?; प्रियांका गांधी, खर्गेंसह विरोधकांचा संसद भवनाबाहेर आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले...
रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
NEET आंदोलनानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांची पत्रकार परिषद; रक्ताने माखलेल्या गणवेशाची कहाणी सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर
हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
ब्रेकिंग: हिंगोलीत कयाधू नदीला पूर! पुढील 48 तास अतिमहत्त्वाचे; प्रशासनाचा इशारा
जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले
Jalgaon | जळगावमध्ये पावसाचा कहर! हतनूर धरणाचे तब्बल 36 दरवाजे उघडले; नद्यांना पूर
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे...
Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा