AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी सैन्याने आपल्याच देशात कोणाशी युद्ध छेडले? जाणून घ्या

पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडतंय? सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे आणि अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. पण, नेमकं काय घडलंय, याविषयी पुढे वाचा

पाकिस्तानी सैन्याने आपल्याच देशात कोणाशी युद्ध छेडले? जाणून घ्या
Pakistani Army Operation Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 13, 2025 | 3:39 PM
Share

खैबर पख्तुनख्वाच्या बाजौर जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. तालिबानी कमांडर्सशी शांतता चर्चा नुकतीच अपयशी ठरल्यानंतर ‘ऑपरेशन सरबकाफ’ पुन्हा सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने 27 भागात 12 तासांपासून 72 तासांपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीमुळे सुमारे चार लाख लोक आपापल्या घरात अडकले आहेत आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यास असमर्थ आहेत. विस्थापितांच्या गरजांसाठी सरकारने पुरेशी व्यवस्था केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. याविषयी पुढे विस्ताराने वाचा.

दहशतवादाविरोधातील मोहिमेत आपल्याच लोकांवर अत्याचार करण्याचा पाकिस्तानच्या लष्कराचा मोठा इतिहास आहे. पाकिस्तानचे लष्कर पुन्हा तेच करत आहे. खैबर पख्तुनख्वाच्या बाजौर जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली असून यामध्ये हजारो लोकांना त्यांच्या घरातून विस्थापित व्हावे लागले आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेविरोधात पाकिस्तानी लष्कराने मोठी मोहीम हाती घेतली असून सुमारे 55 हजार लोक विस्थापित झाले आहेत.

यापूर्वी TTP चा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लोई मामंड आणि वार मामंड तालुक्यात ही कारवाई करण्यात येत आहे. तालिबानी कमांडर्सशी शांतता चर्चा नुकतीच अपयशी ठरल्यानंतर ‘ऑपरेशन सरबकाफ’ पुन्हा सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने 27 भागात 12 तासांपासून 72 तासांपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

अवामी नॅशनल पार्टीचे खासदार निसार बाज यांनी खैबर पख्तुनख्वा विधानसभेत सांगितले की, संचारबंदीमुळे सुमारे चार लाख लोक आपापल्या घरात अडकले आहेत आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यास असमर्थ आहेत. विस्थापितांच्या गरजांसाठी सरकारने पुरेशी व्यवस्था केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. वाहतुकीअभावी परिस्थिती बिकट झाली असताना अनेक कुटुंबांना तंबू किंवा सार्वजनिक इमारतींमध्ये रात्र काढावी लागत आहे.

मात्र, बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत असून अन्न व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार मुबारक खान जैब यांनी सांगितले की, शाळांना तात्पुरते निवारा म्हणून घोषित करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने खार तालुक्यातील 107 शैक्षणिक संस्था मदत छावण्या म्हणून निश्चित केल्या आहेत. 29 जुलैपासून या मोहिमेला सुरुवात झाली होती. पण एक दिवसानंतर आदिवासी जिरगा समाजाच्या मध्यस्थीमुळे ही चर्चा रद्द करण्यात आली. दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात पाठवणे हा या चर्चेचा उद्देश होता, मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही शुक्रवारी असे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर लष्कराने पुन्हा कारवाई सुरू केली.

Follow Us
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची...
पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची....
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज
साखरपुड्यापेक्षा दहापट भव्य लग्न! भलामोठा मंडप अन्... इंदुरीकर महाराज.
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ
'2029 ची निवडणूक भाजप-शिवसेना स्वबळावर...', शिरसाटांचं महायूतीबाबत मोठ.
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार.....
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, एक किलोमीटरच्या आतील कोंबड्या ठार......
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात...
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात....
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ.