AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh Crisis : इंधनाचे दर अचानक 50 टक्क्याने वाढवले, आर्थिक संकटामुळे बांगलादेशींचं रस्त्यावर ‘तांडव’; आता बांगलादेशही श्रीलंकेच्या वाटेवर

Bangladesh Crisis : रशिया आणि युक्रेनचं युद्ध तसेच कोरोनामुळे तेलाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे बांगलादेशात पेट्रोलच्या दरात 51 तर डिझेलच्या दरात 42 टक्के वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्धामुळे मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण बिघडलं.

Bangladesh Crisis : इंधनाचे दर अचानक 50 टक्क्याने वाढवले, आर्थिक संकटामुळे बांगलादेशींचं रस्त्यावर 'तांडव'; आता बांगलादेशही श्रीलंकेच्या वाटेवर
इंधनाचे दर अचानक 50 टक्क्याने वाढवले, आर्थिक संकटामुळे बांगलादेशींचं रस्त्यावर 'तांडवImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 07, 2022 | 1:48 PM
Share

ढाका : श्रीलंकेपाठोपाठ (sri lanka) आता बांगलादेशालाही (Bangladesh Crisis) आर्थिक संकटाने घेरले आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बांगलादेश सरकारने पेट्रोलच्या (petrol price) दरात 50 टक्क्याने वाढ केली आहे. बांगलादेशाच्या निर्मितीनंतरचीही सर्वात मोठी दरवाढ आहे. त्यामुळे लोक संतापले असून लोकांनी रस्त्यावर उतरून तांडव करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बांगलादेशात श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईच्याविरोधात बांगलादेशी नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. देशातील अनेक शहरात निदर्शने सुरू आहेत. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य केलं आहे. बांगलादेशातील जनता ज्या पद्धतीने प्रक्षुब्ध झाली आहे, त्यावरून बांगलादेशातील स्थिती अधिकच बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे बांगलादेशाच्या अर्थमंत्र्यांनी जागतिक नाणे निधीकडे 4.5 अब्ज डॉलरचं 450 कोटीचं कर्ज मागितलं आहे.

एवढेच नव्हे तर बांगलादेशाची आर्थिक स्थिती बिघडल्याने बांगलादेशात इतर देशातून येत असलेला तेल पुरवठाही बाधित झाला आहे. त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या पॉवर प्लांटला टाळा लागला आहे. देशातील केंद्रीय बँकांच्या खजानामध्येही प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे अनेक वस्तूंच्या आयातींवर बंदी घालण्यात आली आहे.

आयात वाढली, निर्यात घटली

बांगलादेशातील आर्थिक स्थिती बिघडण्याचे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आयातीत झालेली वाढ आणि निर्यातीत झालेली घट. केंद्रीय बँकांच्या अहवालातही तसे नमूद करण्यात आलं आहे. आयात वाढल्याने त्याचा देशाच्या तिजोरीला फटका बसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या अहवालानुसार, जुलै 2021 पासून मे 2022च्या दरम्यान 81.5 अब्ज डॉलरची आयात करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही आयात 39 टक्क्याने वाढली आहे.

आयातीवर अधिक खर्च

बांगलादेशाने दुसऱ्या देशातून सामान मागवण्यात अधिक पैसा खर्च केला आहे. तसेच आपल्या देशातील निर्यात कमी केली आहे. त्यामुळे बांगलादेशाला घाटा झाला आहे. आयात निर्यातीबाबतचं नियोजन नसल्यामुळे बांगलादेशावर ही परिस्थिती ओढावल्याचं सांगितलं जात आहे.

वर्षभरात विदेशी मुद्रा भंडारला फटका

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षापासून विदेशात काम करणाऱ्या बांगलादेशींच्या उत्पन्नातही घट झाली आहे. विदेशी मुद्रा भंडारमध्ये घट येण्याचं हे ही एक कारण आहे. त्यातच आयातीचा मारा करण्यात आल्याने देशाची स्थिती अधिकच डबघाईला आली आहे. विदेशी मुद्रा भंडाराच्या आकड्यानुसार विदेशी मुद्रा भंडारात गेल्या वर्षी जुलैपर्यंत 45 अब्ज डॉलर होते. आता जुलैमध्ये हा आकडा कमी होऊन 39 अब्ज डॉलर झाला आहे.

रशिया आणि युक्रेनचं युद्ध तसेच कोरोनामुळे तेलाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे बांगलादेशात पेट्रोलच्या दरात 51 तर डिझेलच्या दरात 42 टक्के वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनचं युद्धामुळे मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण बिघडलं. तसेच कोरोनामुळे ओपेक देशांनी तेलाचा पुरवठा बंद केला. त्यामुळे देशभरात त्याचा परिणाम जाणवला. बांगलादेशही त्याला अपवाद राहिला नाही. मात्र, अचानक इंधनाचे दर वाढल्याने बांगलादेशातील जनता संतप्त झाली असून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.