AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाने पाठ फिरवलेल्या देशात पंतप्रधान मोदी पोहोचले, भारतासाठी ‘हा’ दौरा का महत्त्वाचा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा श्रीलंका दौरा द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर केंद्रित आहे. संरक्षण सहकार्य, ऊर्जा, व्यापार आणि कनेक्टिव्हिटी हे प्रमुख अजेंडे आहेत. चीनचा वाढता प्रभाव पाहता भारतासाठी हा दौरा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. हंबनटोटा बंदरावरील चीनचे नियंत्रण कमी करण्यात आणि श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या भेटीतून अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.

जगाने पाठ फिरवलेल्या देशात पंतप्रधान मोदी पोहोचले, भारतासाठी ‘हा’ दौरा का महत्त्वाचा?
PM narendra Modi (
| Edited By: | Updated on: Apr 05, 2025 | 3:24 PM
Share

श्रीलंकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सायंकाळी कोलंबोत दाखल झाले. श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्री विजिता हेराथ, आरोग्यमंत्री नलिंदा जयतिसा आणि मत्स्यव्यवसाय मंत्री रामलिंगम चंद्रशेखर हे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते.

एकूणच द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचे मार्ग शोधणे हा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा उद्देश आहे. गेल्या सात महिन्यांत परदेशी नेत्याचा हा पहिलाच श्रीलंका दौरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये शेवटचा श्रीलंकेचा दौरा केला होता आणि 2015 नंतर त्यांचा हा चौथा श्रीलंका दौरा आहे. पंतप्रधानांचा हा दौरा अनेक अर्थांनी खास आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील संरक्षण संबंध मजबूत करणे तसेच ऊर्जा, व्यापार आणि कनेक्टिव्हिटीमध्ये सहकार्य वाढविणे हा या कराराचा उद्देश आहे.

पंतप्रधान मोदींचा श्रीलंका दौरा का आहे खास?

द्विपक्षीय संरक्षण संबंध वाढविणे आणि ऊर्जा, व्यापार आणि कनेक्टिव्हिटी क्षेत्रातील भागीदारी मजबूत करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंकेच्या दौऱ्याचे उद्दीष्ट आहे. मोदी आणि राष्ट्राध्यक्ष दिसानायका यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण संरक्षण सहकार्य कराराला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 10 क्षेत्रांमध्ये करार होण्याची शक्यता आहे.

त्यातच संरक्षण कराराकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. यामागचं कारण म्हणजे भारत आणि श्रीलंकेत पहिल्यांदाच संरक्षण करार होणार आहे. त्यामुळेच या दोघांच्या कराराकडे साऱ्या जगाच्या नजरा खिळल्या आहेत.

श्रीलंका दौऱ्यासाठी चीनही ठरला कारण

हंबनटोटा हिंदी महासागराच्या महत्त्वाच्या सागरी व्यापार मार्गांजवळ वसलेले आहे. हे बंदर जगातील सर्वात वर्दळीच्या बंदरांपैकी एक आहे. दीड अब्ज डॉलर्स खर्चकरून बांधण्यात आलेले हंबनटोटा बंदर चीनकडून कर्ज घेऊन बांधण्यात आले होते. पण हे कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्यानंतर श्रीलंकेने ते 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर चीनला दिले. हे तेच बंदर आहे ज्याचा वापर चीन आता आपल्या सामरिक कारवायांसाठी करत आहे.

सात महिन्यांत परदेशी नेत्याचा पहिला दौरा

यामुळे भारत आणि श्रीलंकेच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता अशा परिस्थितीत भारत या कराराच्या माध्यमातून श्रीलंकेतील चीनचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. एकूणच द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचे मार्ग शोधणे हा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा उद्देश आहे. गेल्या सात महिन्यांत परदेशी नेत्याचा हा पहिलाच श्रीलंका दौरा आहे.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.