AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौदी अरबचा भारताला झटका, पाकिस्तानवरील निर्बंध हटवले मात्र भारतीयांना प्रवेशबंदी कायम

सौदी अरेबियाने (Saudi Arabia) भारताला मोठा झटका दिला आहे. सौदी अरेबियाने एकिकडे पाकिस्तानमधील नागरिकांवर प्रवेशबंदीचे निर्बंध कमी केले आहेत, मात्र दुसरीकडे भारतासाठी हेच निर्बंध कायम ठेवलेत.

सौदी अरबचा भारताला झटका, पाकिस्तानवरील निर्बंध हटवले मात्र भारतीयांना प्रवेशबंदी कायम
| Updated on: May 18, 2021 | 4:53 PM
Share

रियाध : सौदी अरेबियाने (Saudi Arabia) भारताला मोठा झटका दिला आहे. सौदी अरेबियाने एकिकडे पाकिस्तानमधील नागरिकांवर प्रवेशबंदीचे निर्बंध कमी केले आहेत, मात्र दुसरीकडे भारतासाठी हेच निर्बंध कायम ठेवलेत. त्यामुळे सौदी अरेबियात काम करणाऱ्या भारतीयांच्या अडचणी कायम राहणार आहेत. मागील वर्षी कोरोना संसर्गाचा धोका पाहता सौदी अरेबियाने इतर देशांमधील नागरिकांना येण्यास बंदी घातली होती. मात्र, आता पाकिस्तानसह अनेक देशांवरील हे निर्बंध हटवण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. मात्र, भारतीयांच्या प्रवेशावरील निर्बंध कायम आहेत (Saudi Arabia allow Pakistan but travel Ban on Indian citizens amid corona).

सौदीने भारतावर निर्बंध कायम ठेवण्यामागे भारताताल कोरोना संसर्गाचं कारण दिलंय. भारतच नाही तर भारतासह आणखी काही देशांवरही सौदीने प्रवेश बंदी केलीय. यात लीबिया, सीरिया, लेबनान, यमन, ईरान, तुर्की, आर्मेनिया, सोमालिया, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, अफगाणिस्तान, वेनेझुएला आणि बेलारूसचा समावेश आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. तरीही पाकिस्तानच्या नागरिकांना सौदीत येण्याची परवानगी देण्यात आलीय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सौदी अरेबियाचा दौरा केल्यानंतर पाकिस्तानला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

प्रवेश बंदीवर सौदी अरेबियाची भूमिका काय?

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने 17 मेपासून आपल्या देशाच्या सीमा सुरु होणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे सौदीने परवागनी दिलेल्या देशांच्या नागरिकांना जमीन, हवा आणि समुद्र अशा तिन्ही प्रकारच्या मार्गाने येता येणार आहे. सौदीच्या मंत्रालयानं म्हटलं, “ज्यांनी कोरोना लस घेतलीय आणि ज्या रुग्णांनी 6 महिन्याच्या आत कोरोनावर मात केलीय त्यांना सौदीत प्रवेशास परवानगी असेल. याशिवाय 18 पेक्षा कमी वय असलेल्या आणि कोरोनापासून संरक्षण देणारी विमा योजना असलेल्या नागरिकांनाही प्रवेश देण्यात येणार आहे.”

सौदीत सर्व विमानतळं सुरु होणार

सौदी अरेबियाने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार आता तेथील सर्व 43 आंतरराष्ट्रीय विमानतळं सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे या विमानतळावरुन जगभरातील 71 ठिकाणी हवाई प्रवास करता येईल. मात्र, ज्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त आहे त्या देशांना सौदीत अजूनही प्रवेश बंदी आहे, असं सौदीने सांगितलं. सौदीच्या या निर्णयाचा अनेक भारतीयांना फटका बसलाय. सध्या सौदीत 4 लाख 30 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच 7 हजारपेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

हेही वाचा :

Mars: नासाच्या रोव्हरचं मंगळ ग्रहावरील काम सुरु, लेझरच्या सहाय्यानं जीवसृष्टीचा शोध घेणार

इस्रायलविरुद्ध लढण्यासाठी जमले पण, मुस्लिम देशांची आपापसांतच जुंपली

PHOTOS : इस्राईल-हमास युद्धाचे अंगावर काटा आणणारे प्रसंग, असा विद्ध्वंस पाहिलाय?

व्हिडीओ पाहा :

Saudi Arabia allow Pakistan but travel Ban on Indian citizens amid corona

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.