जगातील एकाही देशाला जमले नाही भारताने करून दाखवल, आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी आनंदाची बातमी, थेट..
अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. आज 18 दिवस या युद्धाला पूर्ण झाली. या युद्धात इस्त्रायलकडून मोठी जखम इराणला देण्यात आली. युद्ध लवकर संपणार नसल्याचे संकेत असतानाच भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

होर्मुज खाडीत तणाव वाढला आहे. होर्मुज खाडी इराणकडून काही देशांकरिता बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात आहेत. गॅस आणि कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा आहे. काही देशात आणीबाणी लावण्याची वेळ आली. इराणकडून जवळपास देशांकरिता ही खाडी बंद करण्यात आली. पण भारताच्या मदतीकरिता इराण उभा आहे. आतापर्यंत भारताचे काही जहाज सोडण्यात आली. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. सध्याच्या घडीला इराण भारताची मदत करताना दिसत आहे. यादरम्यानच भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी पुढे येताना दिसत आहे. साैदी अरेबियाकडून मोठा निर्णय घेण्यात आला. सौदी अरेबियाने आता लाल समुद्रामार्गे भारताला कच्च्या तेलाची निर्यात पुन्हा सुरू केली आहे. ही बातमी भारतासाठी अत्यंत दिलासाजनक आहे. सौदी अरेबियाच्या यान्बू बंदरातून अनेक टँकर भारतासाठी आधीच रवाना झाले आहेत.
होर्मुज खाडीतून प्रवास करणे अधिक घातक बनले असतानाच साैदी अरेबियाकडून हा निर्णय घेण्यात आला. नुकताच मिळालेल्या केप्टरच्या रिपोर्टनुसार, सध्या चार टँकर 6 दशलक्ष बॅरल तेल घेऊन भारताच्या दिशेने निघाले आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत देखील 10 दशलक्ष बॅरल तेल भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. ही भारतीयांसाठी दिलासादायक बातमी आहे.
होर्मुज, बाब अल मंदेबच्या सामुद्रधुनीमध्ये धोका कायम आहे. मुळात म्हणजे लाल समुद्र सुरक्षित मानला जात नाही. तरीही भारताकडून हे पाऊस उचलण्यात आले. तेलाचा पुरवठा अविरत सुरू राहिला तर ऊर्जा संकट कमी होण्यास मदत होईल. यादरम्यानच्या काळात अनेक देश भारताच्या मदतीला धावून आली आहेत.
आखाती देशांकडून एक महत्वाची बैठक घेतली जात आहे. कारण इराण अमेरिका युद्धात त्यांना सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला. हळूहळू करून भारताच्या दिशेने एलपीजी गॅसचे जहाज येताना दिसत आहेत. भारतात व्यावसायिक सिलेंडर बंद करण्यात आल्याने अनेक व्यवसाय संकटात आहेत. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
