AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशातील हिंसाचारामागे ‘या’ देशाचा हात, शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर आरोप

Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान यांना ज्या प्रकारे देश सोडावा लागला ती परिस्थिती कोणावर ही येऊ नये. पण यामागे कोणाचा तरी हात आहे अशी शंका शेख हसीना यांच्या मुलाने उपस्थित केली आहे. बांगलादेशमधील आंदोलन भ़डतवण्यामागे कोणाचा हात आहे यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बांगलादेशातील हिंसाचारामागे 'या' देशाचा हात, शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर आरोप
| Updated on: Aug 09, 2024 | 4:56 PM
Share

माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी देश ही सोडावा लागला. यानंतर आता देशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं आहे. यादरम्यान शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी बांगलादेशातील हिंसाचार आणि सत्तापालट कशामुळे झाला याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, काही गट आंदोलकांना भडकवत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आमच्या सरकारने दोन-तीन वर्षांपूर्वी आरक्षणाचा कोटा काढला होता, पण स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय न्यायालयात पोहोचले होते, त्यामुळे आंदोलने सुरू झाली. हा एक छोटासा निषेध होता, परंतु पाश्चात्य गटांनी त्यांना भडकवले. ज्यामुळे आंदोलन हिंसक झाले आणि माझ्या आईच्या सुरक्षिततेचा मुद्दा तयार झाला. आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढत होते. माझ्या आईला शेवटच्या क्षणीही देश सोडायचा नव्हता. ती मिलिटरी एअरबेसवर गेली तेव्हा ती तिच्या बहिणीला म्हणाली की तिला जायचे नाही, पण तू जर गेली नाही तर हे लोकं तिला मारतील असं सांगितल्यानंतर ती तयार झाली.

आंदोलनामागे कोणाचा हात?

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाश्चात्य गटांचा या आंदोलनामागे सहभाग असल्याचा संशय आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, चीनचा यात सहभाग आहे असे मला वाटत नाही, कारण तो कधीही आमच्या अंतर्गत बाबींमध्ये गुंतलेला नाही. आम्ही प्रत्येक देशाचे मित्र होतो. चीन आणि भारताशी आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही भारताला आमचा चांगला मित्र मानतो. अमेरिकेशीही आमचे चांगले संबंध होते, पण पाकिस्तान (ISI) नेहमीच बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या विरोधात राहिला आहे. आम्ही त्यांच्यापासून स्वातंत्र्यासाठी लढलो, म्हणून मला शंका आहे की विरोध भडकावण्यात आयएसआयचा हात होता.

विद्यार्थ्यांकडे बंदुका कुठून आल्या?

आंदोलन शांततेत सुरू असताना या विद्यार्थ्यांकडे बंदुका कशा आणि कुठून आल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बंदुका हाती घेतल्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला. यानंतरही आमच्या सरकारने त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले, मात्र हा संपूर्ण प्रकार चिथावणी देण्यासाठी रचण्यात आला होता. निदर्शने वाढत गेली आणि त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांनी बंदुकांसह पोलीस ठाण्यांवर हल्ला केला. त्यांच्याकडे बंदुका कुठून आल्या? हा मोठा प्रश्न आहे.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....