AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशातील हिंसाचारामागे ‘या’ देशाचा हात, शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर आरोप

Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान यांना ज्या प्रकारे देश सोडावा लागला ती परिस्थिती कोणावर ही येऊ नये. पण यामागे कोणाचा तरी हात आहे अशी शंका शेख हसीना यांच्या मुलाने उपस्थित केली आहे. बांगलादेशमधील आंदोलन भ़डतवण्यामागे कोणाचा हात आहे यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बांगलादेशातील हिंसाचारामागे 'या' देशाचा हात, शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर आरोप
| Updated on: Aug 09, 2024 | 4:56 PM
Share

माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी देश ही सोडावा लागला. यानंतर आता देशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं आहे. यादरम्यान शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी बांगलादेशातील हिंसाचार आणि सत्तापालट कशामुळे झाला याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, काही गट आंदोलकांना भडकवत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आमच्या सरकारने दोन-तीन वर्षांपूर्वी आरक्षणाचा कोटा काढला होता, पण स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय न्यायालयात पोहोचले होते, त्यामुळे आंदोलने सुरू झाली. हा एक छोटासा निषेध होता, परंतु पाश्चात्य गटांनी त्यांना भडकवले. ज्यामुळे आंदोलन हिंसक झाले आणि माझ्या आईच्या सुरक्षिततेचा मुद्दा तयार झाला. आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढत होते. माझ्या आईला शेवटच्या क्षणीही देश सोडायचा नव्हता. ती मिलिटरी एअरबेसवर गेली तेव्हा ती तिच्या बहिणीला म्हणाली की तिला जायचे नाही, पण तू जर गेली नाही तर हे लोकं तिला मारतील असं सांगितल्यानंतर ती तयार झाली.

आंदोलनामागे कोणाचा हात?

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाश्चात्य गटांचा या आंदोलनामागे सहभाग असल्याचा संशय आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, चीनचा यात सहभाग आहे असे मला वाटत नाही, कारण तो कधीही आमच्या अंतर्गत बाबींमध्ये गुंतलेला नाही. आम्ही प्रत्येक देशाचे मित्र होतो. चीन आणि भारताशी आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही भारताला आमचा चांगला मित्र मानतो. अमेरिकेशीही आमचे चांगले संबंध होते, पण पाकिस्तान (ISI) नेहमीच बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या विरोधात राहिला आहे. आम्ही त्यांच्यापासून स्वातंत्र्यासाठी लढलो, म्हणून मला शंका आहे की विरोध भडकावण्यात आयएसआयचा हात होता.

विद्यार्थ्यांकडे बंदुका कुठून आल्या?

आंदोलन शांततेत सुरू असताना या विद्यार्थ्यांकडे बंदुका कशा आणि कुठून आल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बंदुका हाती घेतल्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला. यानंतरही आमच्या सरकारने त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले, मात्र हा संपूर्ण प्रकार चिथावणी देण्यासाठी रचण्यात आला होता. निदर्शने वाढत गेली आणि त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांनी बंदुकांसह पोलीस ठाण्यांवर हल्ला केला. त्यांच्याकडे बंदुका कुठून आल्या? हा मोठा प्रश्न आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.