AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मोदीजी यांच्यापासून इम्प्रेस…, ‘ नेपाळचे नेतृत्व सांभाळू पाहणाऱ्या सुशीला कार्की काय म्हणाल्या ?

नेपाळ धुमसतच असून तेथे आता नवे सरकार बनवण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. या दरम्यान काळजीवाहू सरकारच्यावतीने संभाव्य प्रमुख सुशीला कार्की यांनी एका खाजगी चॅनलला मुलाखत दिली आहे.

'मोदीजी यांच्यापासून इम्प्रेस..., ' नेपाळचे नेतृत्व सांभाळू पाहणाऱ्या सुशीला कार्की काय म्हणाल्या ?
Sushila Karki
| Updated on: Sep 10, 2025 | 8:10 PM
Share

भारताचा शेजारी नेपाळमध्ये गेली तीन दिवस अक्षरश: अराजक माजले आहे. आता तेथे नवे सरकार येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नव्या सरकारचे नेतृत्वा एका महिलेच्या हाती जाण्याची चिन्हे आहेत. या नेपाळच्या काळजीवाहू सरकारच्या संभाव्य प्रमुख सुशीला कार्की यांनी भारताशी असलेल्या नात्या संदर्भात एका खाजगी वृत्तवाहिनीशी चर्चा केली आहे.

नेपाळच्या नेत्या सुशीला कार्की यांनी भारताशी असलेल्या नेपाळच्या संबंधात विषयी मोकळेपणे चर्चा केलेली आहे. त्या म्हणाल्या भारत आणि नेपाळेचे नाते खुप जुने आहे. नेपाळ आणि भारताच्या जनतेचा एकमेकांशी असलेले नाते गहीरे आहे. भारत आमचा नातलगही आणि दोस्तही आहे. भारताने नेपाळला नेहमीच मदत केली आहे. परंतू जशी किचनमध्ये भांडी एकमेकांशी आपटतात तशी आमच्या नात्यात कधीतरी अधून मधून खटपट सुरु होते. परंतू भारत आणि नेपाळचे नाते मजबूत आहे असेही सुशीला कार्की यांनी सांगितले.

या मुलाखती दरम्याने सुशीला कार्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव घेतले. त्या म्हणाल्या मी मोदी यांच्या कार्यशैलीने प्रभावीत झाले आहे. त्या म्हणाल्या की मोदीजी यांना नमस्कार, माझ्या मनात मोदी यांच्याबद्दल चांगले इम्प्रेशन आहे. कार्की यांनी भारतातील इतर नेत्यांचेही कौतूक केले, परंतू कोणाचे थेट नाव घेतले नाही. अंतरिम सरकार संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर कार्की यांनी माझ्या नावाचा प्रस्ताव आहे. परंतू अजूनही निश्चित झालेले नाही असेही त्यांनी सांगितले.

सुशीला कार्की यांनी सांगितले की त्यांचे घर सीमेजवळ आहे. नेहमी सीमेजवळील मार्केटमध्ये मी येत जात असते असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या नेपाळच्या परिस्थितीबाबत कार्की म्हणाल्या काठमांडूची परिस्थिती संपूर्णपणे खराब झालेली नाही. परंतू २० विद्यार्थ्यांचा मृ्त्यू झाला हे दु:खद आहे. मी दुसऱ्यादिवशी मुलांना पाहायला गेले तर गोळीबार सुरु होता. लष्कराने परिस्थिती आपल्या हातात घेतली आहे. आता राजकारणापेक्षा शांततेची आधी गरज आहे. माझे नाव घेतले आहे, परंतू अजून काही निश्चित नाही.उद्या बदलही होऊ शकतो असेही त्या म्हणाल्या.

Follow Us
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?