मोठी बातमी! भारत बांगलादेश सीमेवर तणाव, थेट उचचली शस्त्र, सीमेवरील नागरिकांना…
India Bangladesh : मागच्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात दिसत आहेत. आता थेट सीमेवरच हालचाली वाढल्या आहेत. बांगलादेशाना आपल्या सीमेवरील सुरक्षा वाढवली आहे, यासोबतच सीमेजवळील नागरिकांना भारताविरोधात भडकावले जात आहे

भारत आणि बांगलादेश सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात आहेत. बांगलादेश पाकिस्तानसोबत जवळीकता वाढवत आहे. हेच नाही तर आपल्या अधिकाऱ्यांना त्यांनी बैठकीकरिता पाकिस्तानात पाठवले. गंगा नदीचा करार भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही देशांचे संबंध तणावात आहेत. यादरम्यानच बांगलादेशाने मोठा निर्णय घेत सीमेवरील गस्त वाढवली आहे. दोन्ही देशातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेवरही तणाव आहे. बॉर्डर गार्ड बांगलादेशचे (बीजीबी) जवान भारतासोबतच्या सीमेवर सशस्त्र निगराणी ठेवत आहेत. बीजीबी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सीमेजवळ राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना भारताच्या विरोधात सातत्याने भडकावले जात आहे. मात्र, त्यांनी ही एक जनजागृती मोहीम असल्याचा दावा केला.
बांगलादेशच्या सीमेवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. सतत हालचाली होत आहेत. त्यामुळे भारतीय सैन्य देखील अलर्ट मोडवर आहे. बीजीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असा आरोप केला आहे की, भारत बेकायदेशीरपणे लोकांना बांगलादेशात पाठवत आहे, हीच त्यांची मोठी चिंता आहे. गंगा नदीचे पाणी रोखण्याकरिता बांगलादेश मोठे धरण सीमेजवळ बांधत आहे. पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीरपणे राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे.
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी नोंदणी, कागदपत्रातून नाव काढून टाकणे आणि हद्दपार करणे या धोरणाची कठोर अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. तेव्हापासूनच आंतरराष्ट्रीय सीमेजवळील 24 परगणा जिल्ह्यातील हकीमपूर तपासणी नाक्यावर बांगलादेशी घुसखोरांचे गट आपल्या देशात परत जाण्यासाठी एकत्र जमलेले आहेत. पण बांगलादेशाचे म्हणणे आहे की, भारत आमच्यादेशात चुकीच्या पद्धतीने लोकांना पाठवत आहे.
भारताकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे लोकांना पाठवत आहे. त्यामुळे बांगलादेशाने आपल्या सीमेवरील सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. हे बेकायदेशीरपणे पश्चिम बंगालमध्ये राहत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामध्येच आता तणाव अधिक वाढताना दिसत आहे. पाकिस्तान भारत आणि बांगलादेशातच्या नात्यात आग लावत आहे.
