AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारत बांगलादेश सीमेवर तणाव, थेट उचचली शस्त्र, सीमेवरील नागरिकांना…

India Bangladesh : मागच्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात दिसत आहेत. आता थेट सीमेवरच हालचाली वाढल्या आहेत. बांगलादेशाना आपल्या सीमेवरील सुरक्षा वाढवली आहे, यासोबतच सीमेजवळील नागरिकांना भारताविरोधात भडकावले जात आहे

मोठी बातमी! भारत बांगलादेश सीमेवर तणाव, थेट उचचली शस्त्र, सीमेवरील नागरिकांना...
India Bangladesh border
| Updated on: May 27, 2026 | 12:57 PM
Share

भारत आणि बांगलादेश सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात आहेत. बांगलादेश पाकिस्तानसोबत जवळीकता वाढवत आहे. हेच नाही तर आपल्या अधिकाऱ्यांना त्यांनी बैठकीकरिता पाकिस्तानात पाठवले. गंगा नदीचा करार भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही देशांचे संबंध तणावात आहेत. यादरम्यानच बांगलादेशाने मोठा निर्णय घेत सीमेवरील गस्त वाढवली आहे. दोन्ही देशातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेवरही तणाव आहे. बॉर्डर गार्ड बांगलादेशचे (बीजीबी) जवान भारतासोबतच्या सीमेवर सशस्त्र निगराणी ठेवत आहेत. बीजीबी लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सीमेजवळ राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना भारताच्या विरोधात सातत्याने भडकावले जात आहे. मात्र, त्यांनी ही एक जनजागृती मोहीम असल्याचा दावा केला.

बांगलादेशच्या सीमेवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. सतत हालचाली होत आहेत. त्यामुळे भारतीय सैन्य देखील अलर्ट मोडवर आहे. बीजीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असा आरोप केला आहे की, भारत बेकायदेशीरपणे लोकांना बांगलादेशात पाठवत आहे, हीच त्यांची मोठी चिंता आहे. गंगा नदीचे पाणी रोखण्याकरिता बांगलादेश मोठे धरण सीमेजवळ बांधत आहे. पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीरपणे राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे.

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी नोंदणी, कागदपत्रातून नाव काढून टाकणे आणि हद्दपार करणे या धोरणाची कठोर अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. तेव्हापासूनच आंतरराष्ट्रीय सीमेजवळील 24 परगणा जिल्ह्यातील हकीमपूर तपासणी नाक्यावर बांगलादेशी घुसखोरांचे गट आपल्या देशात परत जाण्यासाठी एकत्र जमलेले आहेत. पण बांगलादेशाचे म्हणणे आहे की, भारत आमच्यादेशात चुकीच्या पद्धतीने लोकांना पाठवत आहे.

भारताकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे लोकांना पाठवत आहे. त्यामुळे बांगलादेशाने आपल्या सीमेवरील सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. हे बेकायदेशीरपणे पश्चिम बंगालमध्ये राहत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामध्येच आता तणाव अधिक वाढताना दिसत आहे. पाकिस्तान भारत आणि बांगलादेशातच्या नात्यात आग लावत आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला